भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 17:28 IST2025-06-08T17:27:05+5:302025-06-08T17:28:19+5:30

एका २९ वर्षीय भारतीय इंजिनिअरचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला. दुबईमध्ये ही घटना घडली. स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंगदरम्यान ही घटना घडली. 

Indian engineer dies while scuba diving in Dubai, what happened after he went into the water or did he die? | भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?

भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?

दुबईमध्ये इंजिनिअर असलेल्या एका भारतीय अभियंत्याचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू झाला.  शुक्रवारी ही घटना घडली. २९ वर्षीय भारतीय इंजिनिअर सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंबासोबत जुमैरा समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आला होता. त्यावेळी स्कुबा डायव्हिंग करत असताना त्याचा मृत्यू झाला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इसाक पॉल ओलक्केंगिल असे मृत्यू झालेल्या भारतीयाचे नाव आहे. इसाकच्या काकांनी सांगितले की, दुबईतील स्कुबा डायव्हिंग क्षेत्रात ट्रेनिंग सुरू असताना ही घटना घडली.   

इसाकचा मृत्यू कसा झाला?

इसाकच्या काकांनी सांगितले की, ते प्रथमच स्कुबा डायव्हिंग करत होते. त्यामुळे ते ट्रेनिंग सेशनमध्ये सहभागी झाले होते. इसाक पाण्याखाली गेला. त्यावेळी त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यातच तो स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या ग्रुपमधील इतरांपासून दूर दूर गेला. 

त्यानंतर त्याला तातडीने बाहेर काढण्यात आले. लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे इसाकच्या काकाने सांगितले. पाण्याखाली गेल्यानंतर इसाक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यातच त्याला कार्डियाक अरेस्ट झटका आला, असे डॉक्टरांनी सांगितले. 

इसाक मूळचा केरळचा आहे. तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंजिनिअर म्हणून कामाला आहे. 

Web Title: Indian engineer dies while scuba diving in Dubai, what happened after he went into the water or did he die?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.