शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 08:14 IST

रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानी नौदल, एअरफोर्स आणि सैन्य अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली

कराची - पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर हाती घेण्यात आले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. त्यात पुलवामा हल्ल्यातील युसूफ अजहर, अब्दुल मलिक रौफ, मुदस्सिर अहमद यांचा समावेश आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डाच उद्ध्वस्त केला आहे. भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानला मोठे नुकसान झाल्याने पाकिस्तानकडून युद्धविरामसाठी भारताकडे तयारी दाखवण्यात आली. 

९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

रविवारी रात्री उशिरा पाकिस्तानी नौदल, एअरफोर्स आणि सैन्य अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यात भारतासोबत संघर्षात त्यांचे एक लढाऊ विमान पाडले गेले अशी कबुली दिली. मात्र कोणत्या विमानाला किती नुकसान झाले, त्याचे नाव काय याचा उल्लेख त्यांनी टाळला. पीटीआयनुसार, पाक सैन्याचे प्रवक्ते लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितले की, ही पत्रकार परिषद ऑपरेशन बुनयान-उल-मरसूसची कारवाई आणि त्याच्या निष्कर्षावर आधारित आहे. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या विमानाचं नुकसान झाले. त्याबाबत सविस्तर माहिती शेअर करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने कुणी भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात आहे का असा सवाल विचारला त्यावर कुठलाही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही असं त्यांनी स्पष्ट केले.

तसेच पाक सैन्याची कारवाई अचूक, संयमित आणि संतुलित होती. भारताकडून केलेल्या कारवाईला उत्तर देत पाकिस्तानी सैन्याने भारतातील २६ सैन्य तळांवर हल्ला केला. ज्यात वायूसेना आणि एविशन बेस यांचा समावेश होता असा पोकळ दावाही लेफ्टिनंट जनरल अहमद शरीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. भारतातील सूरतगड, सिरसा, भुज, नालिया, उधमपूर, भटिंडा, बरनाला, अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, अंबाला आणि पठाणकोट इथल्या भारतीय सैन्य ठिकाणांवर पाकिस्तानने हल्ला केला. त्याशिवाय ब्यास आणि नगरोटा इथल्या ब्रह्मोस मिसाइल स्टोअरेज केंद्रावरही हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याने केला. परंतु पाकिस्तानी सैन्याचा हा खोटा दावा भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह फेटाळला होता. 

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमुळे लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदच्या खालिद उर्फ अब्बू आकाशा, मुदस्सिर खाद्यान, मोहम्मद रसम खान आणि हाफिज मोहम्मद जमीलसह १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. या टॉपच्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानी सैन्याचे बडे अधिकारीही उपस्थित झाल्याने जगासमोर पाकचा खरा चेहरा उघड झाला. पाकिस्तानच्या डीजीएमओने १० मे रोजी केलेल्या विनंतीमुळे भारताने युद्धविराम करण्याची सहमती दर्शवली. मात्र यापुढे दहशतवाद हा भारताविरोधात युद्ध म्हणून मानले जाणार आहे. तसेच सिंधु जल करारावरील स्थगितीही भारताने उठवली नाही. पाकिस्तान आणि भारत यांच्यात चर्चेनंतर पुढील निष्कर्ष काढले जाणार आहेत. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरterroristदहशतवादी