शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:57 IST

पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत. 

नवी दिल्ली - भारताविरोधात काहीही झाले तरी त्यामागे चीनचा हात बऱ्याचदा समोर येतो. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानपेक्षा जास्त चीन बिथरल्याचे दिसून येते. भारत-पाकिस्तान संघर्षात चिनी शस्त्रे कामी आले नाहीत. पाकिस्तान जर कमकुवत झाला तर चीनची ताकद कमी होईल. त्यासाठीच जिनपिंगने ऑपरेशन सिंदूर संपताच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना बोलावले. त्यासोबत तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना बीजिंगला येण्याचे निमंत्रण दिले. पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत. 

१) बीजिंगमध्ये चीनने मोठी बैठक घेतली. या बैठकीत अफगाणिस्तान-पाकिस्तानला एकत्रित आणत या दोन्ही देशांमधील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. 

२) चीन भारताच्या वॉटर स्ट्राईकमधून पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चीनने लवकरच पाकिस्तान खैबरपख्तूनख्वा येथे मोहम्मद धरणाचे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिले आहे. हे धरण बनताच पाकिस्तानला वीज मिळेल आणि पेशावर शहरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

३) भारताविरोधात चीनची तिसरी चाल, पाकिस्तानला J35A डिलिवरी लवकर देणार आहे. J35 A चीनचं लढाऊ विमान आहे ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याची नाचक्की झाली. त्यामुळे चीन त्रस्त आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला सर्वात खतरनाक लढाऊ विमान लवकर देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

४) चीनचा डाव भारताला घेरण्याचा आहे. त्यासाठी तो बांगलादेशात एअरफिल्ड बनवत आहे. पाकिस्तानसारखेच मोहम्मद युनूस सरकार चीनच्या इशाऱ्यावर चालत आहे. भारतीय सीमेजवळ लालमोनिहराट एअरबेस विकसित करण्याची चीन तयारी करत आहे. जो चिकन नेकच्या खूप जवळ आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनला दणका

ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानी सैन्य प्रमुख असीम मुनीरची बोबडी वळली नाही तर शी जिनपिंग यांच्यासमोरही आव्हान उभे केले. चीनला अमेरिकेसारखे शस्त्र निर्यातदार देश बनायचे होते. परंतु भारताने चिनी शस्त्रांची ४ दिवसांत पोल उघडली. त्यामुळे आता चीनकडून J35 A पुढे आणले आहे. परंतु भारतानेही चीनच्या डाव उलथावून लावण्याचा उपाय शोधला आहे. ज्या J35A विमानाला पाकिस्तान भारताविरोधात सर्वात मोठे शस्त्र समजून खुश होत आहे, त्यावर भारतानेही आधीच तयारी केली आहे. 

२५ वर्षापूर्वी रडार तंत्रज्ञानात भारत पिछाडीवर होता. आधी AESA म्हणजे एक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड रडारचा वापर होत होता. भारताकडे तंत्रज्ञान नव्हते, परदेशातून खरेदी करून विमानावर लावणे ते महागात होते. त्यासाठी भारताने त्यावर काम करणे सुरू केले आणि स्वदेशी रडार बनवले. याच रडारच्या भरवशावर भारताने चीनच्या सर्वात धोकादायक लढाऊ विमानाला उद्ध्वस्त करण्याची तयारी करून ठेवली आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन