शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:57 IST

पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत. 

नवी दिल्ली - भारताविरोधात काहीही झाले तरी त्यामागे चीनचा हात बऱ्याचदा समोर येतो. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानपेक्षा जास्त चीन बिथरल्याचे दिसून येते. भारत-पाकिस्तान संघर्षात चिनी शस्त्रे कामी आले नाहीत. पाकिस्तान जर कमकुवत झाला तर चीनची ताकद कमी होईल. त्यासाठीच जिनपिंगने ऑपरेशन सिंदूर संपताच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना बोलावले. त्यासोबत तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना बीजिंगला येण्याचे निमंत्रण दिले. पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत. 

१) बीजिंगमध्ये चीनने मोठी बैठक घेतली. या बैठकीत अफगाणिस्तान-पाकिस्तानला एकत्रित आणत या दोन्ही देशांमधील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. 

२) चीन भारताच्या वॉटर स्ट्राईकमधून पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चीनने लवकरच पाकिस्तान खैबरपख्तूनख्वा येथे मोहम्मद धरणाचे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिले आहे. हे धरण बनताच पाकिस्तानला वीज मिळेल आणि पेशावर शहरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

३) भारताविरोधात चीनची तिसरी चाल, पाकिस्तानला J35A डिलिवरी लवकर देणार आहे. J35 A चीनचं लढाऊ विमान आहे ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याची नाचक्की झाली. त्यामुळे चीन त्रस्त आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला सर्वात खतरनाक लढाऊ विमान लवकर देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

४) चीनचा डाव भारताला घेरण्याचा आहे. त्यासाठी तो बांगलादेशात एअरफिल्ड बनवत आहे. पाकिस्तानसारखेच मोहम्मद युनूस सरकार चीनच्या इशाऱ्यावर चालत आहे. भारतीय सीमेजवळ लालमोनिहराट एअरबेस विकसित करण्याची चीन तयारी करत आहे. जो चिकन नेकच्या खूप जवळ आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनला दणका

ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानी सैन्य प्रमुख असीम मुनीरची बोबडी वळली नाही तर शी जिनपिंग यांच्यासमोरही आव्हान उभे केले. चीनला अमेरिकेसारखे शस्त्र निर्यातदार देश बनायचे होते. परंतु भारताने चिनी शस्त्रांची ४ दिवसांत पोल उघडली. त्यामुळे आता चीनकडून J35 A पुढे आणले आहे. परंतु भारतानेही चीनच्या डाव उलथावून लावण्याचा उपाय शोधला आहे. ज्या J35A विमानाला पाकिस्तान भारताविरोधात सर्वात मोठे शस्त्र समजून खुश होत आहे, त्यावर भारतानेही आधीच तयारी केली आहे. 

२५ वर्षापूर्वी रडार तंत्रज्ञानात भारत पिछाडीवर होता. आधी AESA म्हणजे एक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड रडारचा वापर होत होता. भारताकडे तंत्रज्ञान नव्हते, परदेशातून खरेदी करून विमानावर लावणे ते महागात होते. त्यासाठी भारताने त्यावर काम करणे सुरू केले आणि स्वदेशी रडार बनवले. याच रडारच्या भरवशावर भारताने चीनच्या सर्वात धोकादायक लढाऊ विमानाला उद्ध्वस्त करण्याची तयारी करून ठेवली आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन