शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 18:57 IST

पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत. 

नवी दिल्ली - भारताविरोधात काहीही झाले तरी त्यामागे चीनचा हात बऱ्याचदा समोर येतो. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानपेक्षा जास्त चीन बिथरल्याचे दिसून येते. भारत-पाकिस्तान संघर्षात चिनी शस्त्रे कामी आले नाहीत. पाकिस्तान जर कमकुवत झाला तर चीनची ताकद कमी होईल. त्यासाठीच जिनपिंगने ऑपरेशन सिंदूर संपताच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना बोलावले. त्यासोबत तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांना बीजिंगला येण्याचे निमंत्रण दिले. पाकिस्तानला मजबूत करण्यासाठी चीनने भारताविरोधात ४ नवे डाव टाकले आहेत. 

१) बीजिंगमध्ये चीनने मोठी बैठक घेतली. या बैठकीत अफगाणिस्तान-पाकिस्तानला एकत्रित आणत या दोन्ही देशांमधील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. 

२) चीन भारताच्या वॉटर स्ट्राईकमधून पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी चीनने लवकरच पाकिस्तान खैबरपख्तूनख्वा येथे मोहम्मद धरणाचे काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिले आहे. हे धरण बनताच पाकिस्तानला वीज मिळेल आणि पेशावर शहरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

३) भारताविरोधात चीनची तिसरी चाल, पाकिस्तानला J35A डिलिवरी लवकर देणार आहे. J35 A चीनचं लढाऊ विमान आहे ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याची नाचक्की झाली. त्यामुळे चीन त्रस्त आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला सर्वात खतरनाक लढाऊ विमान लवकर देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

४) चीनचा डाव भारताला घेरण्याचा आहे. त्यासाठी तो बांगलादेशात एअरफिल्ड बनवत आहे. पाकिस्तानसारखेच मोहम्मद युनूस सरकार चीनच्या इशाऱ्यावर चालत आहे. भारतीय सीमेजवळ लालमोनिहराट एअरबेस विकसित करण्याची चीन तयारी करत आहे. जो चिकन नेकच्या खूप जवळ आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनला दणका

ऑपरेशन सिंदूरने केवळ पाकिस्तानी सैन्य प्रमुख असीम मुनीरची बोबडी वळली नाही तर शी जिनपिंग यांच्यासमोरही आव्हान उभे केले. चीनला अमेरिकेसारखे शस्त्र निर्यातदार देश बनायचे होते. परंतु भारताने चिनी शस्त्रांची ४ दिवसांत पोल उघडली. त्यामुळे आता चीनकडून J35 A पुढे आणले आहे. परंतु भारतानेही चीनच्या डाव उलथावून लावण्याचा उपाय शोधला आहे. ज्या J35A विमानाला पाकिस्तान भारताविरोधात सर्वात मोठे शस्त्र समजून खुश होत आहे, त्यावर भारतानेही आधीच तयारी केली आहे. 

२५ वर्षापूर्वी रडार तंत्रज्ञानात भारत पिछाडीवर होता. आधी AESA म्हणजे एक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड रडारचा वापर होत होता. भारताकडे तंत्रज्ञान नव्हते, परदेशातून खरेदी करून विमानावर लावणे ते महागात होते. त्यासाठी भारताने त्यावर काम करणे सुरू केले आणि स्वदेशी रडार बनवले. याच रडारच्या भरवशावर भारताने चीनच्या सर्वात धोकादायक लढाऊ विमानाला उद्ध्वस्त करण्याची तयारी करून ठेवली आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन