शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 10:36 IST

पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे. भारत या सुरक्षा परिषदेचा भाग नाही.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहे. त्यातच घाबरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक घेण्याची मागणी केली. त्या मागणीवरून UNSC ची बंद दाराआड बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तान यांच्या तणावावर चर्चा करण्याचा पाकचा प्रयत्न होता. मात्र या बैठकीत ना कुठला निर्णय झाला, ना कुठला ठराव समंत करण्यात आला. त्याउलट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इतर सदस्यांनी जे कठीण सवाल उपस्थित केले त्यातून पाकिस्तानची बोलती बंद झाली.

'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत

पहलगाम हल्ल्यात लश्कर ए तोयबाचा हात आहे का असा सवाल पाकिस्तानला विचारण्यात आला. त्याशिवाय धर्म विचारून पर्यटकांना गोळी झाडली असंही काही सदस्यांनी म्हटलं. सूत्रांनुसार, UNSC च्या बैठकीत सदस्यांनी २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध करत त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. पर्यटकांना धर्माच्या आधारे टार्गेट करण्याचा मुद्दा उचलण्यात आला. अनेक सदस्यांनी पाकिस्तानकडून मिसाईल चाचणी आणि अणुहल्ल्याच्या धमकीनं तणाव वाढल्याची चिंता व्यक्त केली. पाकिस्तानला द्विपक्षीय पद्धतीनेच हा मुद्दा सोडवण्याचा सल्ला इतर सदस्यांनी दिला. 

पाकिस्तानची झाली फजिती

पाकिस्तानला UNSC बैठकीकडून फार अपेक्षा होती. या बैठकीत खोटा बनाव सदस्य मान्य करतील असं पाकला वाटत होते. परंतु तसे काही झाले नाही. बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर सुरक्षा परिषदेकडून निवेदन जारी केले जाईल असंही पाकिस्तानला वाटत होते. परंतु तेही घडले नाही.यूएनएससीने कुठलेही निवेदन जारी न केल्याने पाकची फजिती झाली. 

भारताच्या गैरहजेरीत पाकला अजेंडा चालवायचा होता

पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य आहे. भारत या सुरक्षा परिषदेचा भाग नाही. अशावेळी भारताच्या गैरहजेरीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आपला अजेंडा पुढे रेटता येईल असं पाकिस्तानला वाटत होते. परंतु भारताच्या रणनीतीनं इतर सदस्यांनी पाकिस्तानला बैठकीत घेरले. पाकिस्तानकडून होणाऱ्या चिथावणीखोर विधानांवरही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. भारताविरोधात खोटे आरोप आणि काश्मीर मुद्दा उचलण्यासाठी या बैठकीचा पाकिस्तानने वापर केला परंतु सुरक्षा परिषदेतील सदस्यांनी पाकिस्तानला अनेक सवाल विचारले. त्यामुळे बैठकीत काहीच निष्पन्न झाले नाही.   

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला