शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:58 IST

India-Pakistan: परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही मदत पूर्णपणे मानवतेच्या आधारावर करण्यात आली आहे.

India-Pakistan:भारताने नेहमीच आपल्या शेजाऱ्यांबद्दल मोठे मन ठेवले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले, मात्र आता पाकिस्तानमधील नागरिकांसाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडोय, ज्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. भारताने जम्मू-काश्मीरमधील संभाव्य पुराबाबत पाकिस्तानला माहिती दिली आणि सतर्क केले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही माहिती पूर्णपणे मानवतेच्या आधारावर शेअर करण्यात आली आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला. यामुळे भारत आता पाकिस्तानला पाण्याच्या प्रवाहाचा डेटा आणि तांत्रिक माहिती देण्यास बांधील नाही. मात्र, आता मानवतेच्या आधारावर भारताने पाकिस्तानला पुराबाबत महत्वाची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात आलेल्या विविध पुरांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळेच भारताने पाकिस्तानची मदत केली आहे.

उच्चायुक्तांशी पहिल्यांदाच संपर्कअशा विषयावर संवाद साधण्यासाठी उच्चायुक्ताच्या माध्यमाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्ताने रविवारी या प्रकरणाची माहिती पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाला दिली. सहसा पूर्वी सिंधू पाणी करारांतर्गत अशी माहिती शेअर केली जात असे. परंतु हा करार स्थगित करण्यात आल्यामुळे उच्चायुक्ताच्या माध्यमातून माहिती शेअर केली.

तावी नदीबाबत अलर्टभारताने पाकिस्तानला तावी नदीतील संभाव्य पुराच्या धोक्याबद्दल सतर्क केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तावी नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. अहवालानुसार, भारताकडून माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानने आपल्या नागरिकांना पुराचा इशारा दिला. तसेच, सखल भागातील लोकांना इतर सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानfloodपूर