शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 18:46 IST

India Pakistan Ceasefire, Indus Water Treaty: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणीवाटप करार निलंबित केला.

India Pakistan Ceasefire, Indus Water Treaty: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला लष्करी संघर्ष अखेर थांबवण्याचा निर्णय सहमतीने घेण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या DGMO यांनी एकमेकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबत सांगितले की, पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) यांनी भारताच्या DGMO यांच्याशी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी फोन करून संवाद साधला. या दोघांमधील संवादात सहमतीने असे ठरवण्यात आले की एकमेकांच्या जमीनीवर, हवाई क्षेत्रात आणि सागरी क्षेत्रात दोन्ही बाजूने होत असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाया या आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्यात येतील. याबाबत दोन्ही देशांच्या संबंधित विभागांना आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. दोन्ही देशांचे DGMO १२ मे रोजी १२:०० वाजता एकमेकांशी फोनवरून पुन्हा संवाद साधणार आहेत, असेही सांगण्यात आले. अशा परिस्थितीत सिंधू जल कराराबाबत काय निर्णय घेतला जाणार ते जाणून घेऊया.

भारत पुन्हा पाकिस्तानला पाणी देणार?

सिंधू जलवाटप करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील समझोता होता. आता संघर्ष थांबवण्याची घोषणा झाल्यामुळे, भारताकडून पुन्हा पाकिस्तानला पाणी दिले जाणार का, असा सवाल विचारला जात आहे. यावर काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधू जल करार हा भारताने लष्करी हल्ल्यांच्या आधीच निलंबित केला होता. भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधीला सहमती दर्शवली आहे. याचा अर्थ दोन्ही बाजूने होणारे हल्ले किंवा लष्करी कारवाया हे पूर्णपणे बंद करण्यात येतील असा त्याचा अर्थ आहे. भारताने त्याआधी जे निर्णय घेतलेत, त्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही.

जलवाटप करारावरून आधीच पाकिस्तानला दोन वेळा नोटीस

सिंधू जलवाटप करार निलंबित करण्यात आला आहे त्याच्याबद्दल पुढचा निर्णय घेण्याबद्दल कुठलीही चर्चा करण्यात आलेली नाहीये. हा लष्करी संघर्ष सुरू होण्यापूर्वीच भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली होती. या करार मुळातच पक्षपाती स्वरूपाचा असून भारताने गेल्या दोन वर्षात या करारात फेरबदलाची गरज असल्याचे पाकिस्तानला दोन वेळा सांगितले आहे. पण पाकिस्तानकडून काहीही उत्तर आलेले नाही. या जलकरारात अनेक त्रुटी आहेत. पाकिस्तानला ७० टक्के आणि भारताला ३० टक्के पाणी असे त्याचे वाटप आहे. तसेच, या कराराला डेडलाईन नाही, बाहेर येण्याचा मार्ग नाही. त्यामुळे या कराराबद्दल फेरविचार व्हायला हवा असे भारताने पाकिस्तानला सातत्याने सांगितले आहे. त्यामुळे सध्याच्या क्षणाला झालेला युद्धविराम हा केवळ लष्करी कारवाया आणि हल्ले थांबवण्यासाठी करण्यात आला आहे. सिंधू जलवाटप करार अद्यापही निलंबितच असणार आहे.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानWaterपाणीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प