१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:36 IST2025-06-25T14:35:13+5:302025-06-25T14:36:07+5:30

India-Mauritius Relation: हिंदी महासागरात वर्चस्व वाढवण्यासाठी भारत सरकार आपली सागरी धोरणे अधिक मजबूत करत आहे.

India-Mauritius Relation: Population of only 1.2 million, 5 thousand km away from India...Why is PM Modi giving so much importance to this small country? | १२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

१२ लाख लोकसंख्या, भारतापासून ५ हजार किमी दूर...PM मोदी या छोट्या देशाला इतके महत्त्व का देताहेत?

India-Mauritius Relation:भारतापासून ५१०० किमी अंतर, फक्त १२ लाख लोकसंख्येचा देश, त्यापैकी ४८ टक्के लोक हिंदू धर्मीय, हिंद महासागर क्षेत्रात भारताच्या धोरणात्मक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा भागीदार...आम्ही ज्या देशाबद्दल बोलत आहोत, तो मॉरिशस आहे. केंद्रातील मोदी सरकार या लहान देशावर विशेष लक्ष देत आहे. पंतप्रधान मोदी स्वतः भारत आणि मॉरिशसमधील संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधान मोदीं मंगळवारी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी संवाद साधला आणि भारत-मॉरिशस संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला. मॉरिशससोबतचे संबंध भारताच्या व्हिजन ओशन पॉलिसीचा एक महत्त्वाचा भाग असून, यामुळे हिंद महासागर क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढतो. कोव्हिड काळासह भारताने अडचणींच्या काळात अनेकदा मॉरिशसला मदत केली आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधही मजबूत होत आहेत.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे सांगितले की, "माझे मित्र पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी बोलून मला आनंद झाला. भारत-मॉरिशस धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक विकास अधिक मजबूत करण्याबाबत आम्ही विचारांची देवाणघेवाण केली. भारताच्या 'व्हिजन ओशन' आणि आमच्या नेबरहूड फर्स्ट धोरणात मॉरिशस हा एक महत्त्वाचा भागीदार आहे.

पंतप्रधान मोदींचा मॉरिशस दौरा
पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान रामगुलाम यांना लवकरच भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. मार्चच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या मॉरिशसला गेले होते. पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांदा मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या समारंभाचा भाग म्हणून, मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखूल यांनी पंतप्रधान मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. एखाद्या भारतीय नेत्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याची ही पहिलीच वेळ होती.

भारताने आखली रणनीती
असे म्हटले जाते की, जो महासागरांवर नियंत्रण ठेवतो तोच जग चालवतो. जागतिक व्यापार, ऊर्जा आणि लष्करी रणनीतीसाठी हिंदी महासागर महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन, भारत या प्रदेशावरील आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आपली सागरी धोरणे सतत मजबूत करत आहे. गेल्या दशकात भारताने आपली सागरी रणनीती बदलली आहे. इंडो-पॅसिफिक आणि हिंद महासागर प्रदेशात चीनच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी भारत रणनीती आखत आहे.

मॉरिशस हा व्हिजन ओशनचा एक महत्त्वाचा भाग 
महासागरा धोरणांमुळे मॉरिशससारख्या लहान बेट देशांसोबत भारताची भागीदारी मजबूत होत आहे. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सागरी सुरक्षा मजबूत करणे. भारतीय नौदलाचे वाढलेले सराव, माहितीची देवाणघेवाण, संरक्षण सहकार्य आणि हिंदी महासागरावरील देखरेख चाचेगिरी, बेकायदेशीर मासेमारी, लष्करी विस्तार आणि इतर धोक्यांपासून संरक्षण करते. व्हिजन ओशन भारताची प्रादेशिक सुरक्षा भूमिका मजबूत करते आणि समुद्रात आपली उपस्थिती धोरणात्मकरित्या वाढवते.

Web Title: India-Mauritius Relation: Population of only 1.2 million, 5 thousand km away from India...Why is PM Modi giving so much importance to this small country?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.