शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 07:11 IST

पाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल.

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रे महासभेत (यूएनजीए) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवल्यावर भारताने प्रत्युत्तरात हल्लाबोल केला की, पाकिस्तान एक असा देश आहे जिथे अतिरेकी बिनधास्त ये-जा करतात. हा देश आग लावणारा आहे. मात्र, स्वत:ला आग विझविणारा असल्याचा दिखावा करतो. त्यांच्या धोरणांमुळे पूर्ण जगाचे नुकसान होत आहे. कारण, ते अतिरेक्यांना आश्रय देत आहेत. 

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे महासभेत बोलताना म्हणाल्या, आम्ही असे ऐकत आलो आहोत की, पाकिस्तान दहशतवादाचा शिकार आहे. वस्तुस्थिती ही आहे की, या देशाने स्वत: आग लावली आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना केवळ या अपेक्षेने आश्रय देतो की, जेणेकरून शेजारी देशांचे नुकसान करता येईल. आपल्या देशातील जातीय हिंसाचाराला ते अतिरेकी कारवायांचे नाव देत लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय आणि पाकिस्तान समर्थक फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाबाबत चर्चा केली होती. यावर बोलताना दुबे म्हणाल्या की, जम्मू- काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. यात पाकिस्तानच्या अवैध ताब्यातील भागाचाही समावेश आहे. तो भाग त्यांनी त्वरित रिकामा करावा, असे आवाहन आम्ही करतो. 

दुबे म्हणाल्या की, पाकिस्तानात अल्पसंख्याक शीख, हिंदू, ख्रिश्चन सतत भीतीच्या छायेत आहेत. याउलट भारत अल्पसंख्याकांच्या मोठ्या लोकसंख्येचा लोकशाही देश आहे. भारत एक स्वतंत्र मीडिया आणि न्यायपालिकेचा देश आहे. 

कोण आहेत स्नेहा दुबे? 

  • संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले आहे. त्यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. पुण्याच्या फर्ग्यूसनमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर नवी दिल्लीत जेएनयूतून जियॉग्राफीत मास्टर्सची पदवी प्राप्त केली.
  • जेएनयूतून स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये एमफिल पूर्ण केले. २०११ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण केली. 
  • वडील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. आई शिक्षिका आहे. तर, भाऊ व्यावसायिक आहेत. आयएफएस होण्याचे स्वप्न साकार करत आज त्या संयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

अतिरेक्यांना मदत करणे हा त्यांचा इतिहास९/११ च्या अतिरेकी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करून दुबे म्हणाल्या की, या घटनेचा कट करणारा ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय मिळाला होता हे जग विसरलेले नाही.

आजही पाकिस्तानी नेतृत्व त्याला शहीद संबोधते. अतिरेक्यांना आश्रय देणे, त्यांना मदत करणे आणि त्यांचे उघड समर्थन करणे हा पाकिस्तानचा इतिहास आहे. पाकिस्तानकडून अतिरेक्यांना प्रशिक्षण आणि पैसा, शस्त्र दिले जातात हेही जगाला ठाऊक आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ