शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 07:11 IST

पाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल.

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रे महासभेत (यूएनजीए) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवल्यावर भारताने प्रत्युत्तरात हल्लाबोल केला की, पाकिस्तान एक असा देश आहे जिथे अतिरेकी बिनधास्त ये-जा करतात. हा देश आग लावणारा आहे. मात्र, स्वत:ला आग विझविणारा असल्याचा दिखावा करतो. त्यांच्या धोरणांमुळे पूर्ण जगाचे नुकसान होत आहे. कारण, ते अतिरेक्यांना आश्रय देत आहेत. 

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे महासभेत बोलताना म्हणाल्या, आम्ही असे ऐकत आलो आहोत की, पाकिस्तान दहशतवादाचा शिकार आहे. वस्तुस्थिती ही आहे की, या देशाने स्वत: आग लावली आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना केवळ या अपेक्षेने आश्रय देतो की, जेणेकरून शेजारी देशांचे नुकसान करता येईल. आपल्या देशातील जातीय हिंसाचाराला ते अतिरेकी कारवायांचे नाव देत लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय आणि पाकिस्तान समर्थक फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाबाबत चर्चा केली होती. यावर बोलताना दुबे म्हणाल्या की, जम्मू- काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. यात पाकिस्तानच्या अवैध ताब्यातील भागाचाही समावेश आहे. तो भाग त्यांनी त्वरित रिकामा करावा, असे आवाहन आम्ही करतो. 

दुबे म्हणाल्या की, पाकिस्तानात अल्पसंख्याक शीख, हिंदू, ख्रिश्चन सतत भीतीच्या छायेत आहेत. याउलट भारत अल्पसंख्याकांच्या मोठ्या लोकसंख्येचा लोकशाही देश आहे. भारत एक स्वतंत्र मीडिया आणि न्यायपालिकेचा देश आहे. 

कोण आहेत स्नेहा दुबे? 

  • संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले आहे. त्यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. पुण्याच्या फर्ग्यूसनमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर नवी दिल्लीत जेएनयूतून जियॉग्राफीत मास्टर्सची पदवी प्राप्त केली.
  • जेएनयूतून स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये एमफिल पूर्ण केले. २०११ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण केली. 
  • वडील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. आई शिक्षिका आहे. तर, भाऊ व्यावसायिक आहेत. आयएफएस होण्याचे स्वप्न साकार करत आज त्या संयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

अतिरेक्यांना मदत करणे हा त्यांचा इतिहास९/११ च्या अतिरेकी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करून दुबे म्हणाल्या की, या घटनेचा कट करणारा ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय मिळाला होता हे जग विसरलेले नाही.

आजही पाकिस्तानी नेतृत्व त्याला शहीद संबोधते. अतिरेक्यांना आश्रय देणे, त्यांना मदत करणे आणि त्यांचे उघड समर्थन करणे हा पाकिस्तानचा इतिहास आहे. पाकिस्तानकडून अतिरेक्यांना प्रशिक्षण आणि पैसा, शस्त्र दिले जातात हेही जगाला ठाऊक आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ