शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

पाकिस्तान आग लावणारा देश; संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 07:11 IST

पाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या धोरणामुळे संपूर्ण जगाचं नुकसान होत असल्याचं म्हणत दुबे यांचा हल्लाबोल.

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रे महासभेत (यूएनजीए) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवल्यावर भारताने प्रत्युत्तरात हल्लाबोल केला की, पाकिस्तान एक असा देश आहे जिथे अतिरेकी बिनधास्त ये-जा करतात. हा देश आग लावणारा आहे. मात्र, स्वत:ला आग विझविणारा असल्याचा दिखावा करतो. त्यांच्या धोरणांमुळे पूर्ण जगाचे नुकसान होत आहे. कारण, ते अतिरेक्यांना आश्रय देत आहेत. 

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे महासभेत बोलताना म्हणाल्या, आम्ही असे ऐकत आलो आहोत की, पाकिस्तान दहशतवादाचा शिकार आहे. वस्तुस्थिती ही आहे की, या देशाने स्वत: आग लावली आहे. पाकिस्तान अतिरेक्यांना केवळ या अपेक्षेने आश्रय देतो की, जेणेकरून शेजारी देशांचे नुकसान करता येईल. आपल्या देशातील जातीय हिंसाचाराला ते अतिरेकी कारवायांचे नाव देत लपविण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या भाषणात काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय आणि पाकिस्तान समर्थक फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाबाबत चर्चा केली होती. यावर बोलताना दुबे म्हणाल्या की, जम्मू- काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. यात पाकिस्तानच्या अवैध ताब्यातील भागाचाही समावेश आहे. तो भाग त्यांनी त्वरित रिकामा करावा, असे आवाहन आम्ही करतो. 

दुबे म्हणाल्या की, पाकिस्तानात अल्पसंख्याक शीख, हिंदू, ख्रिश्चन सतत भीतीच्या छायेत आहेत. याउलट भारत अल्पसंख्याकांच्या मोठ्या लोकसंख्येचा लोकशाही देश आहे. भारत एक स्वतंत्र मीडिया आणि न्यायपालिकेचा देश आहे. 

कोण आहेत स्नेहा दुबे? 

  • संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले आहे. त्यांना प्रवासाची प्रचंड आवड आहे. पुण्याच्या फर्ग्यूसनमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यानंतर नवी दिल्लीत जेएनयूतून जियॉग्राफीत मास्टर्सची पदवी प्राप्त केली.
  • जेएनयूतून स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये एमफिल पूर्ण केले. २०११ मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण केली. 
  • वडील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. आई शिक्षिका आहे. तर, भाऊ व्यावसायिक आहेत. आयएफएस होण्याचे स्वप्न साकार करत आज त्या संयुक्त राष्ट्रांत भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

अतिरेक्यांना मदत करणे हा त्यांचा इतिहास९/११ च्या अतिरेकी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख करून दुबे म्हणाल्या की, या घटनेचा कट करणारा ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात आश्रय मिळाला होता हे जग विसरलेले नाही.

आजही पाकिस्तानी नेतृत्व त्याला शहीद संबोधते. अतिरेक्यांना आश्रय देणे, त्यांना मदत करणे आणि त्यांचे उघड समर्थन करणे हा पाकिस्तानचा इतिहास आहे. पाकिस्तानकडून अतिरेक्यांना प्रशिक्षण आणि पैसा, शस्त्र दिले जातात हेही जगाला ठाऊक आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतTerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरladakhलडाखunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ