शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

भारताला अतिरेक्यांकडील रासायनिक अस्त्रांची चिंता

By admin | Updated: October 21, 2016 03:16 IST

दहशतवादी गट रासायनिक अस्त्रे मिळवत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून भारताने या अस्रांचा भविष्यात वापर होणार नाही यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने

संयुक्त राष्ट्रे : दहशतवादी गट रासायनिक अस्त्रे मिळवत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून भारताने या अस्रांचा भविष्यात वापर होणार नाही यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने परिणामकारक कृती करावी, असे आवाहन केले. कोणत्याही परि स्थितीत, कोणाहीकडून व कुठेही रासायनिक अस्त्रांचा वापर न्याय ठरवला जाऊ शकत नाही या आमच्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही व त्यामुळेच असले घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे भारताचे राजदूत डी. बी. वेंकटेश वर्मा यांनी म्हटले. ते बुधवारी मोठ्या प्रमाणावरील विध्वंस विषयावरील चर्चेत बोलत होते. जीनिव्हातील नि:शस्त्रीकरण परिषदेवर वर्मा हे स्थायी प्रतिनिधी आहेत. दहशतवाद्यांनी रासायनिक अस्त्रे व ते वापरण्याची व्यवस्था प्राप्त केल्याच्या वृत्तांमुळे तसेच दहशतवाद्यांकडून सिरिया आणि इराकमध्ये रासायनिक अस्त्रे व विषारी रसायनांचा सतत वापर होत असल्याबद्दल भारताला खूपच काळजी वाटत आहे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या सत्रात ते बोलत होते. वर्मा म्हणाले, रासायनिक अस्त्रांचा भविष्यात वापर होणार नाही, यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय तातडीने कृती करील असा आम्हाला विश्वास आहे. (वृत्तसंस्था)