शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

India china faceoff : वाद वाढेल असं काही करायचं नाही!; डोवालांसोबतच्या चर्चेनंतर 'असं' आलं चीनचं निवेदन - म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 19:07 IST

सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेअंतर्गत चिनी सैन्य 1.5 किमी मागे हटले आहे. यातच आता, चीनचे परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांनी एक सविस्तर निवेदन जारी केले आहे.

ठळक मुद्देभारत आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 15 जूनला पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात जबरदस्त हिंसक झटापट झाली होती.सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेअंतर्गत चिनी सैन्य 1.5 किमी मागे हटले आहे.एकत्रितपणे संबंधांचे संरक्षण करू - चीन

 पेइचिंग - भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गेल्या 15 जूनला पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात जबरदस्त हिंसक झटापट झाली होती. यानंतर आता, म्हणजेच जवळपास 3 आठवड्यांनंतर चीन नरमला आहे. आता चीनने सीमेवर शांततेसंदर्भात बोलायला सुरुवात केली आहे. तसेच भारताच्या सोबतीने सीमावर्ती भागात विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासंदर्भात पुरुच्चार केला आहे. 

सैन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसएंगेजमेन्ट प्रक्रियेअंतर्गत चिनी सैन्य 1.5 किमी मागे हटले आहे. यातच आता, चीनचे परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांनी एक सविस्तर निवेदन जारी केले आहे. या निवेदना, दोन्ही पक्षांकडून, असे कुठल्याही प्रकारचे पाऊल उचलले जाणार नाही, ज्यामुळे वाद वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

'70 वर्षांत अनेक चढ-उतार पाहिले' -भारताचे विशेष प्रतिनिधि आणि राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार अ‍जीत डोवाल यांनी वान्ग यांच्याशी रविवारी सीमा मुद्द्यावर चर्चा केली होती. यानंतर चीनने सविस्तर निवेद जारी करत म्हटले आहे, की चीन आणि भारत यांच्यातील हे  डिप्लोमॅटिक संबंधाचे 70वे वर्ष आहे. चीन आणि भारतीय संबंधांनी अनेक चढ-उतार पाहिले. तसेच आज जो विकास झाला आहे, तो साध्य करणे सोपे नाही.

'चीन सार्वभौमत्वाचे संरक्षण करत राहील' -निवेदनात म्हणण्यात आले आहे, की भारत आणि चीनदरम्यान गलवान खोऱ्यात जे झाले ते स्पष्ट आहे. चीन आपले क्षेत्रीय सार्वभौमत्व, सीमावर्ती भाग आणि शांततेचे प्रभावीपणे संरक्षण करत राहील. तसेच विकास आणि नूतनीकरण चीन आणि भारतासाची प्राथमिकता आहे. त्यामुळे एकमेकांना धोका निर्माण होणार नाही, या दृष्टाने दोघांनीही रणनीतीक निर्णयांचे पालन करायला हवे. तसेच विकासाच्या संधीही उपलब्ध करून द्याव्यात, या मुद्द्यांवरही वान्ग यांनी जोर दिला.

'एकत्रितपणे संबंधांचे संरक्षण करू' -सध्य स्थितीनंतर, दोन्ही देशांतील सहकार्य आणि सर्वसाधारण एक्सचेंज सुरू ठेवला जावा. असे कुठलेही पाऊल उचलू नये. ज्यामुळे वाद वाढेल. तसेच, एकत्रितपणे दोघांच्याही संबंधांचे सरक्षण केले जावे. याशिवाय, दोन्ही पक्षांच्या वतीने झालेल्या करारावर सहमती दर्शवण्यात आली आणि सीमेवरील स्थिती व्यवस्थीत राहील यासंदर्भात दोघांकडूनही प्रयत्न केले जातील हे निश्चित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या -

चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनIndiaभारतAjit Dovalअजित डोवालSoldierसैनिकladakhलडाख