शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांचा पाकिस्तानात सरकारी पाहुणचार, भारताचा परखड आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 03:58 IST

भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे महावीर सिंघवी यांनी गुरुवारी दहशतवादी विरोधी डिजिटल सप्ताहादरम्यान वेबिनारमध्ये ही टिप्पणी केली.

संयुक्त राष्ट्रे : मुंबईत १९९६ मधील साखळी बॉम्बस्फोट आणि २००८ मध्ये मुंबईत करण्यात आलेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांबाबत ठोस पुरावे देऊनही कारवाई न केल्याने भारतानेपाकिस्तानवर परखड टीका केली. भीषण दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर संयुक्त राष्टÑाने बंदी घातलेली असली तरी हे दोषी मात्र पाकिस्तानात सरकारी पाहुणचाराचा आनंद घेत आहेत, याकडे भारताने जगाचे लक्ष वेधले आहे.भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे महावीर सिंघवी यांनी गुरुवारी दहशतवादी विरोधी डिजिटल सप्ताहादरम्यान वेबिनारमध्ये ही टिप्पणी केली.मानवी हक्कांचे रक्षण करणे अािण ते शाबूत राखण्यासाठी सामूहिक निर्धाराचा पुनरुच्चार करण्याची ही वेळ आहे. दुर्दैवाने सीमापार दहशतवादाचा प्रायोजक असलेल्या पाकिस्तानने मात्र खोडसाळपणा करीत भारताविरुद्ध खोटे आरोप करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला आहे.जम्मू-काश्मिरचा भारताचा अंतर्गत भाग असून भारताचाच कायम राहिल, असा पुनरुच्चार करतांना सिंघवी वेबिनारमध्ये म्हणाले की, पाकिस्तानने जम्मू-काश्मिरची अभिलाषा बाळगणे सोडून द्यावी.हा तर निव्वळ ढोंगीपणामानवी हक्क आणि समानतावादाचे प्रवर्तक असल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न निव्वळ ढोंग आहे. कारण पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांसह सिंध आणि बलुचिस्तानवासीयांवर अत्याचार होत आहे, असा परखड आरोपही सिंघवी यांनी केला.पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या विविध व्यासपीठांवरून जम्मू-काश्मीरसह भारतातील अंतर्गत मुद्दे उपस्थित करण्याचा खटाटोप सातत्याने करीत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारताने दहशतवादविरोधी व्यासपीठावरून भारताचे देशांतर्गत धोरण आणि अंतर्गत मुद्दे उपस्थित केल्यावरून पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला होता.दहशतवादाला सातत्याने रसदविदेश मंत्रालयातील दहशतवादविरोधी विभागाचे सहसचिव असलेले सिंघवी यावेळी म्हणाले की, पाकिस्तान सीमापार दहशतवादासाठी लष्करी, वित्तीय आणि रसदपुरवठा सातत्याने करीत आहे; परंतु १९९३ मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट आणि २००८ मधील मुंबईतील भयानक दहशतवादी हल्ल्यासह भारतात करण्यात आलेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांबाबत ठोस पुरावे देऊनही कारवाई न करता पाकिस्तानने दहशतवादपीडितांना मूलभूत हक्कांपासून वंचित केले आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ