शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Facebook, Google ही पाकिस्तानला कंटाळले, दिला 'हा' इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 14:14 IST

गुगल, फेसबुक आणि ट्विटर या तिन्ही कंपन्या पाकिस्तानला कंटाळल्या आहेत.

ठळक मुद्देगुगल, फेसबुक आणि ट्विटर या तिन्ही कंपन्या पाकिस्तानला कंटाळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने सोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. नियमांमध्ये बदल न केल्यास पाकिस्तानमध्ये सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - Facebook, Twitter, Google याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र आता गुगल, फेसबुक आणि ट्विटर या तिन्ही कंपन्या पाकिस्तानला कंटाळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननेसोशल मीडियासाठी काही नवे नियम लागू केले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सेवा पुरवण्यात समस्या निर्माण होत आहेत. 'एशिया इंटरनेट कॉलिशन'तर्फे (AIC) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पत्राद्वारे नव्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. नियमांमध्ये बदल न केल्यास पाकिस्तानमध्ये सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

डिजिटल कायद्यावरून या तीन कंपन्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. फेसबुक, गुगल आणि ट्विटर यासारख्या कंपन्यांवर सेन्सॉरशीप लावण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'जर पाकिस्तानने डिजिटल सेन्सॉरशीप कायद्यात बदल केला नाही तर पाकिस्तानमधील आपली सेवा बंद करण्यात येईल' असं इम्रान खान यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच नव्या नियमांनुसार या कंपन्यांना इस्लामाबादमध्ये आपलं कार्यालय सुरू करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच त्यांना पाकिस्तानमध्ये डेटा सेंटर सुरू करावं लागणार आहे. तसंच त्यांना युजर्सचा डेटाही सरकारसोबत शेअर करावा लागणार आहे. 

एआयसीतर्फे पाठवण्यात आलेल्या पत्रात कंपनी युजर्सचा कोणत्याही प्रकारचा डेटा शेअर करणार नाही कारण ते गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असेल असं नमूद करण्यात आलं आहे. कंपन्यांना नव्या कंपन्यांना या नव्या नियमांमुळे मोठी समस्या निर्माण होणार नाही. पाकिस्तानमध्ये पूर्वीपासूनच ऑनलाईन कंटेंटसाठी कठोर नियम आहेत. परंतु गोपनीयता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तक्रारीबाबत सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं गेलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं असल्याचं वृत्त न्यूज इंटरनॅशनलनं दिलं आहे. 

पाकिस्तानी रेग्युलेशनने दिलेल्या माहितीनुसार, जर कोणताही पाकिस्तानी नागरिक सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून सरकार आणि कोणत्याही संस्थेला लक्ष्य करत असल्यास दोषी सिद्ध झाला तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच  पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना संशयाच्या आधारावर कोणत्याही नागरिकाचं अकाऊंट तपासण्याचीही सुविधा याद्वारे देण्यात आली आहे. जर कोणतीही माहिती सरकार किंवा संस्थेच्या विरोधात असेल तर सोशल मीडिया कंपन्यांना त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढावं लागणार आहे. 15 दिवसांमध्ये संबंधितावर कारवाई न केल्यास सरकार त्यांच्यावर 500 दशलक्ष पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Breaking : सस्पेन्स सुटला, मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती

...तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा समजला नाही : चिदंबरम

Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Delhi Violence: 'CAA च्या विरोधात नाही अन् समर्थनातही, तरीही फातिमाचं सर्वस्व जळालं'

आजच उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मार्च महिन्यात 19 दिवस बँक बंद

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडियाgoogleगुगलFacebookफेसबुकTwitterट्विटर