शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

निवडणुका शेजारच्या देशात पण चॅलेंज भारतासमोर, नवनियुक्त परराष्ट्रसचिव विजय गोखले यांची लागणार कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 12:56 IST

शेजारी देशांमधील काही सत्ताधारी भारताच्या बाजूने तर काही विरोधात आहेत. विरोधात असणारे पक्ष, नेत्यांच्या हाती सत्ता गेल्यानंतर भारताचे हित साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

ठळक मुद्देनेपाळमध्ये डिसेंबर अखेरीस डाव्या आघाडीची सत्ता आली. के.पी.ओली पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. भूतानमध्ये निवडून येणा-या नव्या सरकारची भारताबद्दलची भूमिका, दृष्टीकोन यावर  संबंध ठरतील.

नवी दिल्ली - भारताचे नवनियुक्त परराष्ट्रसचिव विजय केशव गोखले यांच्यासाठी पुढच्या दीडवर्षाचा कालावधी आव्हानात्मक असणार आहे. डोकलामचा तिढा सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या विजय केशव गोखले यांची परराष्ट्रसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला. पुढच्या 16 महिन्यांमध्ये भारताच्या शेजारी देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. तेच गोखले यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. 

या देशांमधील काही सत्ताधारी भारताच्या बाजूने तर काही विरोधात आहेत. विरोधात असणारे पक्ष, नेत्यांच्या हाती सत्ता गेल्यानंतर भारताचे हित साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. नेपाळमध्ये डिसेंबर अखेरीस डाव्या आघाडीची सत्ता आली. के.पी.ओली पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. के.पी.ओली हे भारत विरोधी आणि चीन समर्थक नेते आहेत. सांस्कृतिकदुष्टया नेपाळ भारताच्या जवळ असला तरी नेपाळमध्ये झालेले हे सत्तापरिवर्तन भारताला मानवणारे नाही. नेपाळला चीनच्या जास्त जवळ जाण्यापासून रोखण्याचे आव्हान भारतासमोर असेल. 

जून 2018 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यातून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधात फार काही सुधारणा होतील अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. सप्टेंबर 2018 मध्ये मालदीवमध्येही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या देशाचे विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आतापासूनच भारतविरोधी सूर लावला आहे. भूतानमध्येही याचवर्षी संसदीय निवडणूक होणार आहे. तिथे निवडून येणा-या नव्या सरकारची भारताबद्दलची भूमिका, दुष्टीकोन यावर  संबंध ठरतील. सामरिकदुष्टीने भूतान भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. डोकलाम संघर्षात ते दिसून आले. 

2018 च्या अखेरीस बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत. भारताने बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या निवडणुका भारतासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. सलग दोनवेळा सत्ता संभाळणा-या शेख हसीना यांच्या सरकारला प्रस्थापितांविरोधातील लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेजारी देशांमधील या निवडणुका भारताच्या परराष्ट्र संबंधांच्या दुष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत. चीन गुंतवणूकीच्या माध्यमातून या सर्व देशांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. भौगोलिक स्थानामुळे हे देश भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या देशांमधील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याचे आव्हान आजच्याघडीला भारतासमोर आहे.                                                       

टॅग्स :Indiaभारत