शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका शेजारच्या देशात पण चॅलेंज भारतासमोर, नवनियुक्त परराष्ट्रसचिव विजय गोखले यांची लागणार कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 12:56 IST

शेजारी देशांमधील काही सत्ताधारी भारताच्या बाजूने तर काही विरोधात आहेत. विरोधात असणारे पक्ष, नेत्यांच्या हाती सत्ता गेल्यानंतर भारताचे हित साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

ठळक मुद्देनेपाळमध्ये डिसेंबर अखेरीस डाव्या आघाडीची सत्ता आली. के.पी.ओली पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. भूतानमध्ये निवडून येणा-या नव्या सरकारची भारताबद्दलची भूमिका, दृष्टीकोन यावर  संबंध ठरतील.

नवी दिल्ली - भारताचे नवनियुक्त परराष्ट्रसचिव विजय केशव गोखले यांच्यासाठी पुढच्या दीडवर्षाचा कालावधी आव्हानात्मक असणार आहे. डोकलामचा तिढा सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या विजय केशव गोखले यांची परराष्ट्रसचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला. पुढच्या 16 महिन्यांमध्ये भारताच्या शेजारी देशांमध्ये निवडणुका होणार आहेत. तेच गोखले यांच्यासमोर मुख्य आव्हान असेल. 

या देशांमधील काही सत्ताधारी भारताच्या बाजूने तर काही विरोधात आहेत. विरोधात असणारे पक्ष, नेत्यांच्या हाती सत्ता गेल्यानंतर भारताचे हित साधण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. नेपाळमध्ये डिसेंबर अखेरीस डाव्या आघाडीची सत्ता आली. के.पी.ओली पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. के.पी.ओली हे भारत विरोधी आणि चीन समर्थक नेते आहेत. सांस्कृतिकदुष्टया नेपाळ भारताच्या जवळ असला तरी नेपाळमध्ये झालेले हे सत्तापरिवर्तन भारताला मानवणारे नाही. नेपाळला चीनच्या जास्त जवळ जाण्यापासून रोखण्याचे आव्हान भारतासमोर असेल. 

जून 2018 मध्ये पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. त्यातून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधात फार काही सुधारणा होतील अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. सप्टेंबर 2018 मध्ये मालदीवमध्येही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्या देशाचे विद्यमान अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आतापासूनच भारतविरोधी सूर लावला आहे. भूतानमध्येही याचवर्षी संसदीय निवडणूक होणार आहे. तिथे निवडून येणा-या नव्या सरकारची भारताबद्दलची भूमिका, दुष्टीकोन यावर  संबंध ठरतील. सामरिकदुष्टीने भूतान भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. डोकलाम संघर्षात ते दिसून आले. 

2018 च्या अखेरीस बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत. भारताने बांगलादेशमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या निवडणुका भारतासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. सलग दोनवेळा सत्ता संभाळणा-या शेख हसीना यांच्या सरकारला प्रस्थापितांविरोधातील लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेजारी देशांमधील या निवडणुका भारताच्या परराष्ट्र संबंधांच्या दुष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहेत. चीन गुंतवणूकीच्या माध्यमातून या सर्व देशांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत आहे. भौगोलिक स्थानामुळे हे देश भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या देशांमधील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याचे आव्हान आजच्याघडीला भारतासमोर आहे.                                                       

टॅग्स :Indiaभारत