शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:49 IST

याआधी सोमवारी ५ मे रोजी पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल होती.

भारत पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या युद्धविरामनंतर पाकिस्तानात आणखी एक हादरा बसला आहे. हा हादरा कुठल्याही भारतीय मिसाईल अथवा ड्रोनने झाला नाही तर नैसर्गिक भूकंपामुळे पाकची जमीन हादरली आहे. पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल असून त्याचे केंद्र जमिनीपासून १० किमी अंतरावर होते. मागील आठवडाभरात पाकिस्तानात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 

याआधी सोमवारी ५ मे रोजी पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने पाकिस्तानातील भूकंपाची माहिती दिली आहे. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, घाबरलेले पाकिस्तानी नागरिक घरातून बाहेर पडले. हा भूकंप १ वाजून २६ मिनिटांनी झाला. शनिवारी १० मे रोजीही पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ४.० रिश्टर स्केल होती. या भूकंपाचे केंद्र पश्चिम भागातील क्वेटा येथे होते. 

अलीकडच्या काळात देश-विदेशात अनेक ठिकाणी भूकंपाच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. आपल्या जमिनीत ७ टेक्टोनिक प्लेट्स होते. ते सातत्याने आपल्या स्थानावर फिरत असतात. कधी कधी त्यात टक्कर होऊन घर्षण होते. त्यामुळेच भूकंपाचे धक्के जाणवू लागतात. त्यातून सर्वाधिक नुकसान पृथ्वीला होते. भूकंपामुळे इमारती कोसळतात, ज्यात ढिगाऱ्याखाली अडकून लोकांचा मृत्यू होतो. भारतातील एकूण ५९ टक्के भाग भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. वैज्ञानिकानुसार भूकंप क्षेत्र झोन २, झोन, ३, झोन ४ आणि झोन ५ या ४ भागात विभाजित केलेत. झोन ५ सर्वाधिक धोकादायक समजला जातो. भारतात झोन ४ मध्ये भारताची राजधानी दिल्ली येते. जिथे ७ हून अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवतात. ज्यातून मोठे नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :EarthquakeभूकंपPakistanपाकिस्तान