शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अमेरिकेकडून भारताला आणखी एक धक्का?; हजारो विद्यार्थ्यांना मायदेशी परतावं लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 09:25 IST

एच-१बी व्हिसानंतर आता विद्यार्थ्यांचे व्हिसादेखील रद्द; अमेरिकेच्या निर्णयाचा भारताला मोठा फटका

वॉशिंग्टन: कुवेतमधील जवळपास ७ ते ८ लाख भारतीयांना लवकरच देश सोडावा लागण्याची दाट शक्यता आहे. त्यातच आता अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनादेखील माघारी परतावं लागू शकतं. आधीच एच-१बी व्हिसा रद्द करणाऱ्या अमेरिकेनं आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन भरत असल्यास त्यांना देशात राहण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. त्यामुळे शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना लवकरच मायदेशी परतावं लागू शकतं. 

'नॉनइमिग्रंट एफ-१ आणि एम-१ स्टुडंट व्हिसाधारक विद्यार्थ्यांचे वर्ग पूर्णपणे ऑनलाईन भरत असल्यास त्यांना अमेरिका सोडावा लागेल. त्यांना अमेरिकेतून बाहेर जायचं नसल्यास इतर शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश घ्यावा लागेल. तरच त्यांचा व्हिसा वैध राहील,' असे अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम संचलनालयानं (आयसीई) स्पष्ट केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर योग्य पावलं न उचलल्यास त्यांना परिणामांचा सामना करावा लागेल, असंदेखील आयसीईनं म्हटलं आहे. 'पूर्णपणे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील सेमिस्टरसाठी व्हिसा देण्यात येणार नाही. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अमेरिकेचा जकात आणि सीमा सुरक्षा विभाग देशात प्रवेश देणार नाही,' अशी माहिती आयसीईनं दिली आहे. अमेरिकन सरकार शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एफ-१, तर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एम-१ व्हिसा देतं.अमेरिकेतल्या बऱ्याचशा महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी त्यांचा पुढील सेमिस्टरसाठीची योजना जाहीर केलेली नाही. काही शैक्षणिक संस्था ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांचा वापर करून हायब्रिड प्रारूप वापरण्याच्या विचारात आहेत. तर हावर्डसारख्या काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातून अमेरिकेत गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. यामध्ये चीनमधील विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कॅनडा यांचा क्रमांक लागतो.चिंता वाढणार? ...तर तब्बल ८ लाख भारतीयांना कुवेत सोडावा लागणार

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसाStudentविद्यार्थीEducationशिक्षण