शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 8:31 AM

बाहेरून लोक येत असल्यामुळे नेपाळमध्ये या विषाणूची लागण थांबविणे फार कठीण झाले आहे.

ठळक मुद्देचीन आणि इटलीच्या तुलनेत भारताकडून येणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक "प्राणघातक" आहे.भारतातून नेपाळमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्या लोकांमुळेच नेपाळमध्ये कोरोना संक्रमितांचं प्रमाण वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बाहेरून लोक येत असल्यामुळे नेपाळमध्ये या विषाणूची लागण थांबविणे फार कठीण झाले आहे.

काठमांडूः चीन आणि इटलीच्या तुलनेत भारताकडून येणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक "प्राणघातक" आहे, असं धक्कादायक विधान नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केलं आहे. भारतातून नेपाळमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्या लोकांमुळेच नेपाळमध्ये कोरोना संक्रमितांचं प्रमाण वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नेपाळमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित ४२७ रुग्ण समोर आले आहेत. ओलींनी मंगळवारी संसदेत सांगितले की, बाहेरून लोक येत असल्यामुळे नेपाळमध्ये या विषाणूची लागण थांबविणे फार कठीण झाले आहे. ते म्हणाले, "कोरोना विषाणूचे बरेच रुग्ण नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. हा विषाणू बाहेरून आला आहे, आमच्याकडे तो नव्हता. आम्ही सीमेपलीकडून येणाऱ्या लोकांची घुसखोरी रोखू शकलो नाही. "कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण हे आज देशासमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात लॉकडाऊनचं उल्लंघन करत अनेक भारतातल्या लोकांनी नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळेच नेपाळमध्ये कोरोनाग्रस्तांचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच भारतातून येणारा कोरोना व्हायरसचा संसर्ग चीन आणि इटलीपेक्षा जास्त घातक आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काठमांडू पोस्ट यांनी ओलींच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. काही स्थानिक प्रतिनिधी आणि पक्षनेते योग्य तपास न करता भारतातून नेपाळमध्ये आणत आहे. नेपाळमध्ये कोरोना पसरण्यासाठी तेच लोक जबाबदार असल्याचं ओली म्हणाले आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी नेपाळ सरकार खबरदारीचा उपाय घेत असून, देशाला कोरोनापासून मुक्त करणं यालाच आमचं प्राधान्य असल्याचं ओली म्हणाले आहेत.  आतापर्यंत देशात कोरोनानं दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.तत्पूर्वी भारत सरकारनं विरोध केल्यानंतरही नेपाळ सरकारनं नवा राजकीय आणि प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशातून नेपाळनं लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरामधल्या एकूण ३९५ चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर दावा सांगितला आहे. हा संपूर्ण भाग भारतीय हद्दीत येतो. नेपाळच्या भू व्यवस्थापन आणि सुधारणा मंत्री पद्मा अरयाल यांनी सरकारच्या वतीनं नवा नकाशा प्रसिद्ध केला. नवा नकाशा प्रसिद्ध करुन लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला आपल्या भागात दाखवू, अशी घोषणा नेपाळ सरकारनं आधी केली होती. त्यानंतर आज नेपाळनं नवा नकाशा जारी केला. आता सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळांमध्ये या नकाशाचा वापर केला जाईल. नवा नकाशा लवकरच संसदेसमोर ठेवला जाईल आणि त्याला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती अरयाल यांनी दिली. 

हेही वाचा

CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या