शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

टोळ विका अन् पैसे कमवा; पाकिस्तान सरकारची अजब-गजब ऑफर, देशभर राबवणार योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 14:59 IST

या टोळांना पकडून कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरण्याची पाकिस्तान सरकारची योजना आहे.

ठळक मुद्देटोळ किड्यांना पकडण्याचं आवाहन पाकिस्तान सरकारने केले आहे.टोळ पकडण्यासाठी देशव्यापी पायलट प्रकल्प तयार करणार शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल असा दावा

इस्लामाबाद - टोळ हल्ल्यापासून फक्त पाकिस्तानच नव्हे तर भारतातही बर्‍याच राज्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अलीकडेच पाकिस्तानातून भारतात घुसलेल्या टोळांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील पिकांना लक्ष्य केले आहे. टोळांच्या या हल्ल्याने शेतकरी चिंतेत असताना पाकिस्तान सरकारने त्यातून कमावण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.

या टोळांना पकडून कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरण्याची पाकिस्तान सरकारची योजना आहे. त्यासाठी टोळ किड्यांना पकडण्याचं आवाहन पाकिस्तान सरकारने केले आहे. पंतप्रधान इमरान खान म्हणाले की, टोळ पकडण्यासाठी देशव्यापी पायलट प्रकल्प तयार करणार आहोत, यात टोळांना पकडून देणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील. या योजनेमुळे देशातील काही गरीब भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल असा दावा करत पकडलेल्या टोळांपासून पॉल्टी फार्मसाठी प्रथिनेयुक्त चारा बनवला जाईल असं त्यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानचे मंत्री शिबली फराज यांनी सांगितले की, नागरिकांवर अन्नधान्याचं संकट असल्यामुळे टोळांना पकडून विकण्याची योजना आणली आहे. हा पायलट प्रोजेक्ट पंजाब प्रांतातील ओकरा येथे लागू करणार आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी २० रुपये किलो या भावाने पैसे दिले जाणार आहेत.

या टोळांच्या हल्ल्याने पाकिस्तानला मोठे नुकसान झाले आहे. याखेरीज या हल्ल्यांमुळे पूर्व आफ्रिका आणि दक्षिण आशियाच्या बर्‍याच देशांमध्ये हजारो हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली आहेत. टोळांची धाड यापुढे इराण आणि पश्चिम आफ्रिकेतील देशांवर हल्ला करेल असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. वाळवंटातील टोळ हे समूहात असताना त्यांचे वर्तन बदलतात. टोळ एका तासामध्ये १६ ते १९ किमी अंतर अंतर करू शकतात. वाऱ्यामुळे ते आणखी दूर जाऊ शकतात. एक किलोमीटर टोळाच्या समुहात सुमारे ४ कोटी टोळ असतात. एका दिवसात ३५ हजार लोक जेवतील इतकी ते पिक खातात.

ओमानच्या वाळवंटात जोरदार पाऊस पडल्यानंतर टोळ तयार होतात. हिंद महासागराच्या चक्रीवादळामुळे वाळवंटातही पाऊस पडला आहे, त्यामुळे टोळ देखील तयार झाले आहेत. एप्रिल महिन्यात भारतात राजस्थानमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पसरले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

.तर ‘त्यांना’ दीड लाखांचे बक्षीस देणार; हत्तीणीच्या मृत्यूनंतर वन्यप्राणी संघटनेचं आवाहन

तुम्ही माणुसकी सोडली पण आम्ही नाही; बुडणाऱ्या माणसाला पाहून हत्तीच्या पिल्लानं काय केलं? पाहा

संपत्तीच्या हवास्यापोटी सुपारी देऊन पोटच्या मुलानंच केली बापाची हत्या, तर सुनेनं...

कोरोना संकट काळातही ‘या’ वाहन कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली घसघशीत वाढ

कोरोनाग्रस्ताला घरी पाहून कुटुंबाला आनंद; पण मध्यरात्री पोलीस आले अन् रुग्णाला घेऊन गेले, कारण...

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानFarmerशेतकरी