शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:53 IST

जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही

सौदी अरेबियात एका भीषण बस दुर्घटनेत ४२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. उमरहा करण्यासाठी गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या बसची डिझेल टँकरला जोरदार धडक बसली. त्यातून आगीचा भडका उडाला ज्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात ४२ जण दगावल्याचे बोलले जाते. मात्र हे मृतदेह भारतात आणण्यासाठी सौदी अरेबियाने लावलेला हा नियम मोठा अडथळा ठरत आहे. 

सौदी अरेबियाने हज आणि उमरहा यात्रेबाबत स्पष्ट नियम बनवले आहेत. त्यानुसार, जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही. हा नियम कित्येक वर्षापासून लागू आहे, प्रत्येक भारतीय प्रवाशाला याबाबत माहिती दिली जाते. सौदीचा हज कायदा सांगतो की, हज आणि उमरहा धार्मिक यात्रा आहेत, कुठलीही विमा आधारित सरकारी सुविधा नाही. या यात्रेवेळी कुणाचाही मृत्यू झाला तर त्याला कुठलीही नुकसान भरपाई दिली जात नाही. जर भारतात कुणी खासगी विमा केला असेल तर त्यांच्या पॉलिसीनुसार अर्थसहाय्य मिळते. मात्र ही प्रक्रिया सौदी प्रशासनाकडून नव्हे तर संबंधित प्रवाशाच्या देशातून आणि विमा कंपनीच्या माध्यमातून केली जाते. 

हजला जाण्यापूर्वी भरावा लागतो फॉर्म

हज आणि उमरहा प्रवाशांसाठी एक अधिकृत फॉर्म स्वाक्षरी करून भरावा लागतो. या फॉर्मवर स्पष्ट शब्दात जर यात्रेवेळी प्रवाशाचा मृत्यू झाला, मग ते मक्काला असो, मदीनाला असो वा सौदीच्या कुठल्याही रस्त्यावर, विमानात असो. या मृतकावर अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच केले जातील. जर यावर कुटुंबाने आक्षेप घेतला तर कायदेशीरपणेही मृतदेह परत पाठवता येणे शक्य नाही, कारण प्रवाशांनी आधीच त्यासाठी परवानगी दिलेली असते. 

काय घडलं?

सौदी अरेबियात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. हे सर्व भारतीय उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते.  मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते. अपघातावेळी बसमध्ये कमीत कमी २० महिला आणि ११ मुले प्रवास करत होती. मक्का येथे आपली धार्मिक यात्रा करत ते मदीनाला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Rules Hinder Return of 42 Indian Pilgrims' Bodies

Web Summary : A bus accident in Saudi Arabia killed 42 Indian pilgrims. Saudi rules prevent repatriation of bodies of those who die during religious pilgrimages. Pilgrims sign a form agreeing to burial in Saudi Arabia.
टॅग्स :Accidentअपघातsaudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारत