शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:53 IST

जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही

सौदी अरेबियात एका भीषण बस दुर्घटनेत ४२ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. उमरहा करण्यासाठी गेलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या बसची डिझेल टँकरला जोरदार धडक बसली. त्यातून आगीचा भडका उडाला ज्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात ४२ जण दगावल्याचे बोलले जाते. मात्र हे मृतदेह भारतात आणण्यासाठी सौदी अरेबियाने लावलेला हा नियम मोठा अडथळा ठरत आहे. 

सौदी अरेबियाने हज आणि उमरहा यात्रेबाबत स्पष्ट नियम बनवले आहेत. त्यानुसार, जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही. हा नियम कित्येक वर्षापासून लागू आहे, प्रत्येक भारतीय प्रवाशाला याबाबत माहिती दिली जाते. सौदीचा हज कायदा सांगतो की, हज आणि उमरहा धार्मिक यात्रा आहेत, कुठलीही विमा आधारित सरकारी सुविधा नाही. या यात्रेवेळी कुणाचाही मृत्यू झाला तर त्याला कुठलीही नुकसान भरपाई दिली जात नाही. जर भारतात कुणी खासगी विमा केला असेल तर त्यांच्या पॉलिसीनुसार अर्थसहाय्य मिळते. मात्र ही प्रक्रिया सौदी प्रशासनाकडून नव्हे तर संबंधित प्रवाशाच्या देशातून आणि विमा कंपनीच्या माध्यमातून केली जाते. 

हजला जाण्यापूर्वी भरावा लागतो फॉर्म

हज आणि उमरहा प्रवाशांसाठी एक अधिकृत फॉर्म स्वाक्षरी करून भरावा लागतो. या फॉर्मवर स्पष्ट शब्दात जर यात्रेवेळी प्रवाशाचा मृत्यू झाला, मग ते मक्काला असो, मदीनाला असो वा सौदीच्या कुठल्याही रस्त्यावर, विमानात असो. या मृतकावर अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच केले जातील. जर यावर कुटुंबाने आक्षेप घेतला तर कायदेशीरपणेही मृतदेह परत पाठवता येणे शक्य नाही, कारण प्रवाशांनी आधीच त्यासाठी परवानगी दिलेली असते. 

काय घडलं?

सौदी अरेबियात मोठा अपघात झाला आहे. या अपघातात कमीत कमी ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. हे सर्व भारतीय उमराह करण्यासाठी सौदीला गेले होते.  मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते. अपघातावेळी बसमध्ये कमीत कमी २० महिला आणि ११ मुले प्रवास करत होती. मक्का येथे आपली धार्मिक यात्रा करत ते मदीनाला जात होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Rules Hinder Return of 42 Indian Pilgrims' Bodies

Web Summary : A bus accident in Saudi Arabia killed 42 Indian pilgrims. Saudi rules prevent repatriation of bodies of those who die during religious pilgrimages. Pilgrims sign a form agreeing to burial in Saudi Arabia.
टॅग्स :Accidentअपघातsaudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारत