शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2018 5:14 PM

भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे. 

बीजिंग- डोकलाम वादानंतर आता भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेश हे पुढच्या मोठ्या वादाचं कारण ठरू शकतं. भारताचं अभिन्न अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्ही कधीही स्वीकारलेलं नाही. तसेच अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, असं विधान चीननं केलं आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री गेंग शुआंग यांनी अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरीनंतर ही प्रतिक्रिया दिली आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये पीपल लिबरेशन आर्मीच्या सैन्यानं घुसखोरी केली होती. त्यावर चीन बोलायला तयार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, चिनी सैनिक भारताच्या अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात 200 मीटरपर्यंत आत घुसले होते. या घटनेनंतर गेंग शुआंग म्हणाले, सीमेच्या वादावर आमची भूमिका नेहमी स्पष्ट असते. आम्ही कधीही अरुणाचल प्रदेशचं अस्तित्व स्वीकारलेलं नाही. परंतु तुम्ही ज्याबाबत बोलत आहात, त्याची मला काही माहिती नाही. अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीन करतो आहे. चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा 3 हजार 488 किमी लांब आहे. या रेषेबाबतचा वाद सोडवण्यासाठी दोन्ही पक्षांनी आतापर्यंत विशेष प्रतिनिधींच्या माध्यमातून 19 फेऱ्यांतील चर्चा झाली आहे. चिनी सैनिकांनी शस्त्रास्त्रांसह गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय लष्करानं यांचा हा प्रयत्न हाणून पाडला होता.चीन आणि भारताच्या सीमेसंबंधी वाद सोडवण्यासाठी एक चांगल्या प्रकारची प्रणाली विकसित आहे. या प्रणालीअंतर्गत चीन आणि भारत सीमा वादाशी संबंधित प्रकरणं सोडवू शकतो. सीमेवर शांतता प्रस्थापित करणं हे चीन आणि भारत दोघांसाठीही गरजेचं आहे, असंही गेंग शुआंग म्हणाले आहेत. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येत असतो. तसेच भारतीय अधिकाऱ्यांकडून या प्रदेशावरील अधिकाराबाबत करण्यात येणाऱ्या दाव्यांवर चीनकडून सातत्याने सातत्याने विरोध करण्यात येतो. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन महिन्यांपूर्वी सिक्कीममधील भारत आणि चीन सीमेजवळील नथू ला भागाचा दौरा केला होता. त्यावेळी सीतारामन यांनी सीमेपलिकडे उभ्या असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांची भेटही घेतली होती.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत