शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

iran israel news: इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:15 IST

इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली.

तेहरान : इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली. भारताशी असलेल्या मैत्रीची जाणीव ठेवत इराणने युद्धाच्या धामधुमीत मानवतावादी निर्णय घेतला. त्याबद्दल या विद्यार्थ्यांनी इराणचे आभार मानले.

सध्या इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय विमानांना इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र, त्यास भारताचा अपवाद करण्यात आला. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार ‘ऑपरेशन सिंधू’ ही मोहीम राबवत आहे. त्याअंतर्गत १७ जून रोजी भारताच्या दूतावासाने इराणमधून ११० विद्यार्थ्यांना रस्त्याने आर्मेनियात नेले. तेथील येरेवन येथून १८ जून रोजी विशेष विमानाने हे विद्यार्थी भारतात रवाना झाले. इराण व इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणले जाणार आहे. अडकलेल्या भारतीयांना आता इराणमधील मशहद शहरातून भारतात आणले जाणार आहे.

इराणमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील भारतीयांना आणण्यासाठी गरज पडल्यास सरकार आणखी विमान फेऱ्यांची व्यवस्था करणार आहे. तसेच, तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबात शहरातूनही एक विमान भारतीयांना घेऊन दिल्लीला येणार आहे. 

नेमके कधी परतणार विद्यार्थी मायदेशी? विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे एक विमान शुक्रवारी रात्रीपर्यंत भारतात पोहोचेल आणि शनिवारी दुपारपर्यंत दोन विमाने भारतात पोहोचतील. या उड्डाणांची व्यवस्था भारत सरकारने केली आहे. ही उड्डाणे इराणमधील मशहद येथून उड्डाण करतील आणि दिल्लीत उतरतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत युद्धात किती झाले नुकसान?शुक्रवारी इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा आठवा दिवस होता. सकाळी इराणने इस्रायलच्या बेरशेबा शहरातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे अनेक गाड्यांना आग लागली. आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. आतापर्यंतच्या युद्धात २४ इस्रायली मारले गेले आहेत, तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, वॉशिंग्टनस्थित एका मानवाधिकार गटाने दावा केला आहे की, इराणमध्ये मृतांची संख्या आता ६३९ वर पोहोचली आहे आणि १,३२९ जखमी झाले आहेत.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायलIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय