शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

iran israel news: इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कधी मायदेशी आणलं जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:15 IST

इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली.

तेहरान : इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली. भारताशी असलेल्या मैत्रीची जाणीव ठेवत इराणने युद्धाच्या धामधुमीत मानवतावादी निर्णय घेतला. त्याबद्दल या विद्यार्थ्यांनी इराणचे आभार मानले.

सध्या इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय विमानांना इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यास बंदी आहे. मात्र, त्यास भारताचा अपवाद करण्यात आला. इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार ‘ऑपरेशन सिंधू’ ही मोहीम राबवत आहे. त्याअंतर्गत १७ जून रोजी भारताच्या दूतावासाने इराणमधून ११० विद्यार्थ्यांना रस्त्याने आर्मेनियात नेले. तेथील येरेवन येथून १८ जून रोजी विशेष विमानाने हे विद्यार्थी भारतात रवाना झाले. इराण व इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणले जाणार आहे. अडकलेल्या भारतीयांना आता इराणमधील मशहद शहरातून भारतात आणले जाणार आहे.

इराणमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याने सांगितले की, इराणमधील भारतीयांना आणण्यासाठी गरज पडल्यास सरकार आणखी विमान फेऱ्यांची व्यवस्था करणार आहे. तसेच, तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबात शहरातूनही एक विमान भारतीयांना घेऊन दिल्लीला येणार आहे. 

नेमके कधी परतणार विद्यार्थी मायदेशी? विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे एक विमान शुक्रवारी रात्रीपर्यंत भारतात पोहोचेल आणि शनिवारी दुपारपर्यंत दोन विमाने भारतात पोहोचतील. या उड्डाणांची व्यवस्था भारत सरकारने केली आहे. ही उड्डाणे इराणमधील मशहद येथून उड्डाण करतील आणि दिल्लीत उतरतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत युद्धात किती झाले नुकसान?शुक्रवारी इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा आठवा दिवस होता. सकाळी इराणने इस्रायलच्या बेरशेबा शहरातील मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला केला. यामुळे अनेक गाड्यांना आग लागली. आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. आतापर्यंतच्या युद्धात २४ इस्रायली मारले गेले आहेत, तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, वॉशिंग्टनस्थित एका मानवाधिकार गटाने दावा केला आहे की, इराणमध्ये मृतांची संख्या आता ६३९ वर पोहोचली आहे आणि १,३२९ जखमी झाले आहेत.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायलIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय