शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Topper Shubham Kumar : सहावीत असताना 'असं' काही घडलं की IAS टॉपर शुभमचं आयुष्यच बदललं; 'ती' घटना ठरली टर्निंग पॉईंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 15:09 IST

UPSC Topper Shubham Kumar : शुभम सहावीत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचं आयुष्यच बदललं आहे. शुभमने आपल्या मुलाखतीतून यशाची रहस्यं उलगडली. 

नवी दिल्ली - यूपीएससी लोकसेवा परीक्षा 2020 मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये बिहारचा रहिवासी असलेला शुभम कुमार (UPSC Topper Shubham Kumar ) देशातून पहिला आला आहे. आयआयटी मुंबईमधून त्याने (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतलेल्या शुभमने तिसऱ्या प्रयत्नात अव्वल क्रमांक मिळवला. याआधी त्याने 2018 आणि 2019 मध्ये परीक्षा दिली होती. 2019 मध्ये तो देशात 290 वा आला होता. 24 वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे. शुभम सहावीत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचं आयुष्यच बदललं आहे. शुभमने आपल्या मुलाखतीतून यशाची रहस्यं उलगडली. 

सहावीत शिकत असताना अशी एक घटना घडली होती की त्यामुळे त्याने कटिहार सोडून पाटणा (Patana) येथे शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. शुभमने "मी सहावीत असताना एका प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं होतं मात्र एका शिक्षकांनी माझं उत्तर चूक असल्याचं सांगितलं होतं. माझं उत्तर योग्य असल्याची मला खात्री आणि विश्वास होता. शिक्षकांच्या या कृत्यामुळे मी दुःखी झालो आणि तेव्हाच मी शिक्षणासाठी पाटण्याला जायचा मोठा निर्णय घेतला. मला पाटण्याला जाऊन चांगलं शिक्षण घ्यायचं आहे, असं मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं. त्यांनीही मला विरोध केला नाही. तेव्हाच माझ्या आयुष्याला वळण मिळालं. माझं पुढचं शिक्षण पाटणा आणि बाकीच्या शहरांत झालं. त्याचीच परिणाम म्हणून मला आज हे यश मिळालं आहे" असं म्हटलं आहे. 

शुभम भारावला... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट अमेरिकेतून 'पुण्यात कॉल'

परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर न्यूज 18 ने शुभमशी संवाद साधला. त्यावेळी त्याने आयुष्यातील अनेक गोष्टींची माहिती दिली आहे. "यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी मी दिल्लीला आलो पण कोणत्या तरी विशिष्ट शहरात जाऊन किंवा एखाद्या विशिष्ट कोचिंग क्लासमध्ये गेलं, तरच परीक्षेची तयारी होऊ शकते असं काही नाही. या परीक्षेची तयारी कोणीही विद्यार्थी कुठेही करू शकतो. फक्त त्या विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची तयारी असली पाहिजे. आता तर डिजिटल माध्यमांचा जमाना आहे. ऑनलाईन वेबसाईट्स किंवा यू-ट्यूबवर एकापेक्षा एक स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने विद्यार्थी तयारी करू शकतात. कोणाला असं वाटत असेल, की ते बिहारमध्ये तयारी करू शकत नाहीत, तर तसं अजिबात नाही हे लक्षात घ्यावं. विद्यार्थी कोणतंही शहर किंवा गावात राहूनही परीक्षेची तयारी करू शकतात. तसंच गेल्या काही वर्षांत या परीक्षेत बिहारच्या विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली होत आहे. अनेक विद्यार्थी परीक्षेत यश मिळवत आहेत" असं शुभमने सांगितलं. 

"ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवण्यावरही भर देणार"

आपण परीक्षेची तयारी कशी केली, याबद्दलही शुभमने माहिती दिली. तो दर दिवशी सात ते आठ तास अभ्यास करत असत. अशा प्रकारे त्यांनी जवळपास तीन वर्षं अभ्यास केला. तेव्हा हे यश मिळालं. विद्यार्थ्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली किंवा ऑनलाइन स्टडी मटेरियल वापरलं, तरी त्यांना सर्वांत जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं ते सेल्फ स्टडीवर.  भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातली 70 टक्के लोकसंख्या शेतीवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहे. त्यामुळे गावांच्या विकासावर आपला भर असेल असं म्हटलं आहे. तसेच, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवण्यावरही भर देणार असल्याचं त्याने सांगितलं.'मी ग्रामीण भागातला असल्यामुळे यूपीएससीच्या इंटरव्ह्यूतही मला ग्रामीण विकासासाठी काय करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता' असं देखील शुभमने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBiharबिहारEducationशिक्षणIndiaभारत