शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

Inspirational Story: दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:55 IST

अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे.

कठोर मेहनत, सातत्यानं प्रयत्न आणि अभ्यासाच्या जोरावर कोणत्याही कामात यश नक्की मिळतं. अत्यंत कठीण समजली जाणारी यूपीएससीची परीक्षादेखील (UPSC Exam) याला अपवाद नाही. यूपीएससीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एका लढाईसारखी मानली जाते. छोटीशी चूकदेखील विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकते. अनेकदा नशीब, श्रम आणि संधी या गोष्टींनी साथ दिली, तरी अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही; पण वारंवार प्रयत्न केल्यास यश  (Success Story) नक्कीच मिळतं. केवळ अव्वल विद्यार्थीच या परीक्षेत यश मिळवू शकतात, असा आपल्याकडे समज आहे; मात्र वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंजू शर्मा (Anju Sharma) यांनी हा समज पूर्णतः खोटा ठरवला आहे. अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे. त्याविषयीचं वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिलं आहे.

अंजू शर्मा यांनी जयपूरमधून बी. एस्सी. आणि एमबीए पूर्ण केलं. टॉपर म्हणून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी १९९१ साली राजकोट येथून असिस्टंट कलेक्टर (Assistant Collector) म्हणून करिअरला सुरुवात केली. सध्या अंजू गांधीनगर सचिवालयातल्या शासकीय शिक्षण विभागाच्या (उच्च व तंत्रशिक्षण) प्रधान सचिव (Principal Secretary) आहेत.

जीवनात हे यश मिळण्यासाठी दोन घटना कारणीभूत ठरल्याचं अंजू आवर्जून नमूद करतात. आयुष्यात पुढे यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या अंजू इयत्ता १२ वीच्या परीक्षेत अर्थशास्त्र (Economics) या विषयात नापास (Fail) झाल्या होत्या. तसंच इयत्ता १० वीच्या रसायनशास्त्र या विषयाच्या प्रीबोर्ड परीक्षेत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे अर्थशास्त्रात नापास झालेल्या अंजू यांना अन्य विषयांत डिस्टिंक्शन (Distinction) मिळालं होतं. `या दोन्ही घटनांमुळे माझ्या जीवनाची दिशा बदलली. अपयश माणसाला मोठ्या यशासाठी तयार करतं,` असं अंजू सांगतात.

अंजू शर्मा यांनी सांगितलं, `कठीण प्रसंगात पालक आपल्या मुलांना कधीही एकटं सोडत नाहीत. माझी आई माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली. कठीण प्रसंगी माझ्या आईनं मला धीर आणि प्रेरणा दिली. शेवटच्या क्षणी अभ्यासावर अवलंबून राहू नये, हा धडा मी अपयशातून घेतला. नापास होण्याचा अनुभव गाठीशी असल्यानं मी सुरुवातीपासूनच महाविद्यालयीन परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला महाविद्यालयात सुवर्णपदक (Gold Medal) मिळालं. हेच धोरण मला पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी पडलं.` अंजू यांनी वेळेपूर्वीच अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्या आयएएस टॉपर्सच्या यादीत समाविष्ट झाल्या.

एका प्रमुख दैनिकाशी बोलताना अंजू शर्मा यांनी सांगितलं, `प्री-बोर्ड परीक्षेदरम्यान माझा बराच अभ्यास बाकी होता. रात्रीचं जेवण झाल्यावर परीक्षेसाठी आपली पूर्ण तयारी झाली नसल्याने आपण नापास होणार, याची जाणीव झाल्याने मी घाबरून गेले होते. माझ्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती मला इयत्ता १०वीतली कामगिरी किती महत्त्वाची आहे, त्यावरून उच्च शिक्षणाची दिशा कशी ठरते, हे सांगत होती. त्यामुळे मी अधिकच घाबरून गेले होते; पण मला माझ्या आईने धीर दिला. पालकांच्या पाठिंब्यामुळे मी यशस्वी झाले,` असं अंजू सांगतात.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण