शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

Inspirational Story: दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:55 IST

अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे.

कठोर मेहनत, सातत्यानं प्रयत्न आणि अभ्यासाच्या जोरावर कोणत्याही कामात यश नक्की मिळतं. अत्यंत कठीण समजली जाणारी यूपीएससीची परीक्षादेखील (UPSC Exam) याला अपवाद नाही. यूपीएससीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एका लढाईसारखी मानली जाते. छोटीशी चूकदेखील विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकते. अनेकदा नशीब, श्रम आणि संधी या गोष्टींनी साथ दिली, तरी अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही; पण वारंवार प्रयत्न केल्यास यश  (Success Story) नक्कीच मिळतं. केवळ अव्वल विद्यार्थीच या परीक्षेत यश मिळवू शकतात, असा आपल्याकडे समज आहे; मात्र वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंजू शर्मा (Anju Sharma) यांनी हा समज पूर्णतः खोटा ठरवला आहे. अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे. त्याविषयीचं वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिलं आहे.

अंजू शर्मा यांनी जयपूरमधून बी. एस्सी. आणि एमबीए पूर्ण केलं. टॉपर म्हणून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी १९९१ साली राजकोट येथून असिस्टंट कलेक्टर (Assistant Collector) म्हणून करिअरला सुरुवात केली. सध्या अंजू गांधीनगर सचिवालयातल्या शासकीय शिक्षण विभागाच्या (उच्च व तंत्रशिक्षण) प्रधान सचिव (Principal Secretary) आहेत.

जीवनात हे यश मिळण्यासाठी दोन घटना कारणीभूत ठरल्याचं अंजू आवर्जून नमूद करतात. आयुष्यात पुढे यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या अंजू इयत्ता १२ वीच्या परीक्षेत अर्थशास्त्र (Economics) या विषयात नापास (Fail) झाल्या होत्या. तसंच इयत्ता १० वीच्या रसायनशास्त्र या विषयाच्या प्रीबोर्ड परीक्षेत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे अर्थशास्त्रात नापास झालेल्या अंजू यांना अन्य विषयांत डिस्टिंक्शन (Distinction) मिळालं होतं. `या दोन्ही घटनांमुळे माझ्या जीवनाची दिशा बदलली. अपयश माणसाला मोठ्या यशासाठी तयार करतं,` असं अंजू सांगतात.

अंजू शर्मा यांनी सांगितलं, `कठीण प्रसंगात पालक आपल्या मुलांना कधीही एकटं सोडत नाहीत. माझी आई माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली. कठीण प्रसंगी माझ्या आईनं मला धीर आणि प्रेरणा दिली. शेवटच्या क्षणी अभ्यासावर अवलंबून राहू नये, हा धडा मी अपयशातून घेतला. नापास होण्याचा अनुभव गाठीशी असल्यानं मी सुरुवातीपासूनच महाविद्यालयीन परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला महाविद्यालयात सुवर्णपदक (Gold Medal) मिळालं. हेच धोरण मला पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी पडलं.` अंजू यांनी वेळेपूर्वीच अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्या आयएएस टॉपर्सच्या यादीत समाविष्ट झाल्या.

एका प्रमुख दैनिकाशी बोलताना अंजू शर्मा यांनी सांगितलं, `प्री-बोर्ड परीक्षेदरम्यान माझा बराच अभ्यास बाकी होता. रात्रीचं जेवण झाल्यावर परीक्षेसाठी आपली पूर्ण तयारी झाली नसल्याने आपण नापास होणार, याची जाणीव झाल्याने मी घाबरून गेले होते. माझ्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती मला इयत्ता १०वीतली कामगिरी किती महत्त्वाची आहे, त्यावरून उच्च शिक्षणाची दिशा कशी ठरते, हे सांगत होती. त्यामुळे मी अधिकच घाबरून गेले होते; पण मला माझ्या आईने धीर दिला. पालकांच्या पाठिंब्यामुळे मी यशस्वी झाले,` असं अंजू सांगतात.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण