शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Inspirational Story: दहावीतही अन् बारावतही नापास! पण जिद्धीसमोर अपयश ठरले खुजे, झाल्या २२ व्या वर्षी IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 13:55 IST

अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे.

कठोर मेहनत, सातत्यानं प्रयत्न आणि अभ्यासाच्या जोरावर कोणत्याही कामात यश नक्की मिळतं. अत्यंत कठीण समजली जाणारी यूपीएससीची परीक्षादेखील (UPSC Exam) याला अपवाद नाही. यूपीएससीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एका लढाईसारखी मानली जाते. छोटीशी चूकदेखील विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकते. अनेकदा नशीब, श्रम आणि संधी या गोष्टींनी साथ दिली, तरी अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही; पण वारंवार प्रयत्न केल्यास यश  (Success Story) नक्कीच मिळतं. केवळ अव्वल विद्यार्थीच या परीक्षेत यश मिळवू शकतात, असा आपल्याकडे समज आहे; मात्र वयाच्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अंजू शर्मा (Anju Sharma) यांनी हा समज पूर्णतः खोटा ठरवला आहे. अंजू शर्मा यांचा यूपीएससी उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आणि परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी आहे. त्याविषयीचं वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिलं आहे.

अंजू शर्मा यांनी जयपूरमधून बी. एस्सी. आणि एमबीए पूर्ण केलं. टॉपर म्हणून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी १९९१ साली राजकोट येथून असिस्टंट कलेक्टर (Assistant Collector) म्हणून करिअरला सुरुवात केली. सध्या अंजू गांधीनगर सचिवालयातल्या शासकीय शिक्षण विभागाच्या (उच्च व तंत्रशिक्षण) प्रधान सचिव (Principal Secretary) आहेत.

जीवनात हे यश मिळण्यासाठी दोन घटना कारणीभूत ठरल्याचं अंजू आवर्जून नमूद करतात. आयुष्यात पुढे यूपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या अंजू इयत्ता १२ वीच्या परीक्षेत अर्थशास्त्र (Economics) या विषयात नापास (Fail) झाल्या होत्या. तसंच इयत्ता १० वीच्या रसायनशास्त्र या विषयाच्या प्रीबोर्ड परीक्षेत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे अर्थशास्त्रात नापास झालेल्या अंजू यांना अन्य विषयांत डिस्टिंक्शन (Distinction) मिळालं होतं. `या दोन्ही घटनांमुळे माझ्या जीवनाची दिशा बदलली. अपयश माणसाला मोठ्या यशासाठी तयार करतं,` असं अंजू सांगतात.

अंजू शर्मा यांनी सांगितलं, `कठीण प्रसंगात पालक आपल्या मुलांना कधीही एकटं सोडत नाहीत. माझी आई माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली. कठीण प्रसंगी माझ्या आईनं मला धीर आणि प्रेरणा दिली. शेवटच्या क्षणी अभ्यासावर अवलंबून राहू नये, हा धडा मी अपयशातून घेतला. नापास होण्याचा अनुभव गाठीशी असल्यानं मी सुरुवातीपासूनच महाविद्यालयीन परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला महाविद्यालयात सुवर्णपदक (Gold Medal) मिळालं. हेच धोरण मला पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उपयोगी पडलं.` अंजू यांनी वेळेपूर्वीच अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्या आयएएस टॉपर्सच्या यादीत समाविष्ट झाल्या.

एका प्रमुख दैनिकाशी बोलताना अंजू शर्मा यांनी सांगितलं, `प्री-बोर्ड परीक्षेदरम्यान माझा बराच अभ्यास बाकी होता. रात्रीचं जेवण झाल्यावर परीक्षेसाठी आपली पूर्ण तयारी झाली नसल्याने आपण नापास होणार, याची जाणीव झाल्याने मी घाबरून गेले होते. माझ्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती मला इयत्ता १०वीतली कामगिरी किती महत्त्वाची आहे, त्यावरून उच्च शिक्षणाची दिशा कशी ठरते, हे सांगत होती. त्यामुळे मी अधिकच घाबरून गेले होते; पण मला माझ्या आईने धीर दिला. पालकांच्या पाठिंब्यामुळे मी यशस्वी झाले,` असं अंजू सांगतात.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीEducationशिक्षण