शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

येलदरी जोत्याखाली;सिद्धेश्वर २१ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:52 AM

यंदा दुष्काळी परिस्थिती असताना विविध जलसाठेही झपाट्याने रिकामे होत चालले आहेत. येलदरी आताच जोत्याखाली गेले असून सिद्धेश्वर धरणात अवघा १७ दलघमी जिवंत साठा आहे. तर २२ लघुप्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा दुष्काळी परिस्थिती असताना विविध जलसाठेही झपाट्याने रिकामे होत चालले आहेत. येलदरी आताच जोत्याखाली गेले असून सिद्धेश्वर धरणात अवघा १७ दलघमी जिवंत साठा आहे. तर २२ लघुप्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे.हिंगोली जिल्हा यंदा दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये शासनाकडून अधिकृत दुष्काळ घोषित झाला. हिंगोली, सेनगाव व कळमनुरी तालुक्याचा यात समावेश आहे. वसमत व औंढा तालुक्यातही त्याची तीव्रता तेवढीच असताना वसमत तालुक्यातील केवळ दोन मंडळांमध्ये दुष्काळ घोषित झाला. मात्र त्यांच्या मदतीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. याच दोन तालुक्यांना लागून असलेल्या येलदरी व सिद्धेश्वर धरणातील जलसाठाही अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. येलदरी धरणाचे पाणी सोडल्याने हे धरण आताच जोत्याखाली गेले आहे. मृतसाठ्यात १0६ दलघमी पाणी आहे. तर सिद्धेश्वर धरणात २१.९0 टक्के पाणी असले तरीही जिवंतसाठा केवळ १७.७३ दलघमीच आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवणार असल्याचे दिसत आहे. आणखी तीन ते चार महिने याच पाण्यावर काढावे लागणार आहेत.हिंगोली तालुक्यातील हिरडी, हातगाव, सेनगाव तालुक्यातील पिंपरी, बाभूळगाव, औंढा तालुक्यातील सेंदूरसना, पूर्णा तालुक्यातील मरसूळ हे तलाव मात्र जोत्याखाली गेले आहेत.एक कोल्हापुरी बंधारा आटलाचारपैकी हिंगोली तालुक्यातील खेर्डा कोल्हापुरी बंधारा आटला आहे. तर सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा, जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा १00 टक्के भरलेले आहेत. परभणी तालुक्यातील राहाटी बंधारा ५६ टक्के भरलेला आहे.मोठ्या दोन धरणांचे हे चित्र असताना २६ लघुप्रकल्पांतील जलसाठाही आटत चालला आहे. सहा प्रकल्प तर जोत्याखाली गेले आहेत. १६ प्रकल्पांतील जलसाठा २५ टक्क्यांच्या आत गेला आहे. तर ४ प्रकल्पच ५0 टक्क्यांपर्यंत भरलेले आहेत. हिंगोली तालुक्यातील पारोळा-१६ टक्के, वडद-१२ टक्के, चोरजवळा-१७ टक्के, सवड-६ टक्के, पेडगाव-१२ टक्के, सेनगाव तालुक्यातील सवना-१७ टक्के, पिंपरी-९ टक्के, घोडदरी- ८ टक्के, औंढा तालुक्यातील वाळकी-१८ टक्के, सुरेगाव-१७ टक्के, औंढा-५0 टक्के, पुरजळ १२ टक्के, वंजारवाडी-१४ टक्के, पिंपळदरी-३९ टक्के, काकडदाबा-१८ टक्के, केळी १३ टक्के, कळमनुरी तालुक्यात बोथी-२९ टक्के, कळमनुरी-१८ टक्के, दांडेगाव-२५ टक्के, देवधरी-२१ टक्के, वसमत तालुक्यातील राजदरी ४३ टक्के असा जलसाठा आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई