शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

‘गोड बोला’ या शब्दांचा अर्थ तडजोड करणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:56 PM

दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दरवर्षी मकरसंक्रांती हा सण एक संदेश घेऊन येतो, तो संदेश म्हणजे गोड बोला! या शब्दांचा अर्थ तडजोड करुन गोड बोलणे हा नाही. तर मनाभावातून आपली प्रकृती, आपल्या विचारांना व्यक्त करण्यासाठी आपण तणावमुक्त होऊन गोड बोलले पाहिजे, असे साहित्यिक विलास वैद्य म्हणाले.भारतीय संस्कृतीत अनेक संदेश दडलेले आहेत. ते आत्मसात करुन जीवन व्यतीत केले तर उत्तम कार्य करण्यासाठी एक उर्जा मिळते. ही उर्जा केवळ माणसांच्या गोड बोलण्यातून मिळते. आपण किती बोलतो आणि कीती रागात येतो. याचे प्रत्येकाने आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. द्वेश, मत्सर, राग हे माणसाचे शत्रू आहेत. या शत्रूपांसून मुक्त होण्याचे काम संक्रांतीसारख्या सणाच्या माध्यमातून होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलवरुन संवाद वाढला आहे. संवादाविना माणूस माणसांपासून तुटत चालला आहे. आणि हाच तुटलेला संवाद जोडण्याचे काम संक्रांतीसारखा सण करतो. माणसांमध्ये वाद होतच असतात पण मतभेद होता कामा नये. वाद व्हावेत पण इतकेही नको की, माणूस पुन्हा एकमेंकाशी प्रेमाचे संबंध प्रस्थापित करु शकणार नाही. गोड बोलल्याने विचारांना प्रेरणा मिळते. यातून शांत जीवन व्यतित करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे शांत जीवन जगण्यासाठी ‘गोड बोला, गुड बोला’ हा उपक्रम मोठी भूमिका निभावत आहे.एका कविने म्हटले आहे. ‘हेलकावूनही शांत होई पाणी, ती माझी कहाणी’, म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात हेलकावे येत असतात पण या हेलकाव्यातून आपण स्थिर, स्थावर आणि शांत होण्याची कला आत्मसात करण्याची गरज आहे. मकरसंक्रांती हा सण परंपरेचा संदेश देतो.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटSocialसामाजिक