शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

शेतकऱ्यांची मागणी नसताना कृषी कायदे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

हिंगोली : गॅट करार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींमुळे शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द हाेणे अपेक्षित होते. तसे तर झाले नाही. ...

हिंगोली : गॅट करार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींमुळे शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द हाेणे अपेक्षित होते. तसे तर झाले नाही. मात्र, शेतकऱ्यांची मागणी नसतानाही केवळ भांडवलदार धार्जिणे सरकार असल्याने नवीन कृषी कायदे केले. यामुळे भारताचा शेतकरी जागतिक बाजारपेठेतून बाहेर फेकला गेला आहे, असे मत ज्येष्ठ शेतकरी नेते श्रीकांत तराळ यांनी जिजाऊ व्याख्यानमालेत व्यक्त केले.

मराठा सेवा संघ, जिजाऊ बिग्रेड, संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित ऑनलाइन जिजाऊ व्याख्यानमालेत ४ जानेवारी रोजी ते बोलत होते. येथील राजे संभाजी महाविद्यालयात दुसऱ्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी खंडेराव सरनाईक, उद्‌घाटक म्हणून प्राचार्य नामदेवराव सोळंके होते. यावेळी शिवाजीराव ढोकर पाटील, बाबूराव शृंगारे यांची उपस्थिती होती. तराळ म्हणाले की, १५ डिसेंबर १९९३ साली झालेल्या गॅट करारावर भारताने स्वाक्षरी केली. त्यामध्ये उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र यांचाही समावेश आहे. या करारानुसार शेतकरी विरोधी कोणते कायदे रद्द केले आहेत हे जगासमोर सादर करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यानंतर १९९८ साली स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. त्यानुसार शेतकरीविरोधी दहा कायदे रद्द करणे गरजेचे आहे; पण ते अद्यापपर्यंत रद्द केले नाही. शेड्यूल ३१ अ नुसार २८५ कायदे आहेत. यातील २३५ कायदे हे शेतकऱ्यांच्या संदर्भात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोर्टात जाता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच मोदी सरकारने शेतकऱ्यांची मागणी नसताना, देशात आणीबाणीची परिस्थिती नसताना, विरोधी पक्षाला विचारात न घेता शेतकरीविरोधी कायदे केले आहेत. या कायद्यात ४८ चुका होत्या. यातील २२ चुका मान्य केल्या असून ७ दुरुस्त केल्या आहेत. त्यामुळे या कायद्यातील वास्तव आता जनतेसमोर आले आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. मोदींना तर धर्माचे राज्य आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे, अशी टीकाही तराळ यांनी केली. नवीन कृषी कायद्यानुसार भारतीय शेतकऱ्यांना जागतिक व्यापाऱ्याचे जाळे बंद झाले असून व्यापाऱ्यांना आता हवा तेवढा माल साठवता येणार आहे. यासाठी सरकारने गोदामासाठी २ ते ७ कोटी रुपयांचे कर्जही उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी या नवीन कृषी कायद्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सूत्रसंचालन पंडित अवचार, जिजाऊ वंदना अर्चना मेटे यांनी केला. आभार माणिक ढोकळे, नामदेव सरकटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संदीप बोरकर, शुभम शेरकर पाटील, सुनील प्रधान, ज्ञानेश्वर लोंढे, गंगाधर लोंढे यांनी परिश्रम घेतले.