शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शेतकऱ्यांची मागणी नसताना कृषी कायदे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST

हिंगोली : गॅट करार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींमुळे शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द हाेणे अपेक्षित होते. तसे तर झाले नाही. ...

हिंगोली : गॅट करार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींमुळे शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द हाेणे अपेक्षित होते. तसे तर झाले नाही. मात्र, शेतकऱ्यांची मागणी नसतानाही केवळ भांडवलदार धार्जिणे सरकार असल्याने नवीन कृषी कायदे केले. यामुळे भारताचा शेतकरी जागतिक बाजारपेठेतून बाहेर फेकला गेला आहे, असे मत ज्येष्ठ शेतकरी नेते श्रीकांत तराळ यांनी जिजाऊ व्याख्यानमालेत व्यक्त केले.

मराठा सेवा संघ, जिजाऊ बिग्रेड, संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित ऑनलाइन जिजाऊ व्याख्यानमालेत ४ जानेवारी रोजी ते बोलत होते. येथील राजे संभाजी महाविद्यालयात दुसऱ्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानी खंडेराव सरनाईक, उद्‌घाटक म्हणून प्राचार्य नामदेवराव सोळंके होते. यावेळी शिवाजीराव ढोकर पाटील, बाबूराव शृंगारे यांची उपस्थिती होती. तराळ म्हणाले की, १५ डिसेंबर १९९३ साली झालेल्या गॅट करारावर भारताने स्वाक्षरी केली. त्यामध्ये उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र यांचाही समावेश आहे. या करारानुसार शेतकरी विरोधी कोणते कायदे रद्द केले आहेत हे जगासमोर सादर करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यानंतर १९९८ साली स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. त्यानुसार शेतकरीविरोधी दहा कायदे रद्द करणे गरजेचे आहे; पण ते अद्यापपर्यंत रद्द केले नाही. शेड्यूल ३१ अ नुसार २८५ कायदे आहेत. यातील २३५ कायदे हे शेतकऱ्यांच्या संदर्भात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोर्टात जाता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यातच मोदी सरकारने शेतकऱ्यांची मागणी नसताना, देशात आणीबाणीची परिस्थिती नसताना, विरोधी पक्षाला विचारात न घेता शेतकरीविरोधी कायदे केले आहेत. या कायद्यात ४८ चुका होत्या. यातील २२ चुका मान्य केल्या असून ७ दुरुस्त केल्या आहेत. त्यामुळे या कायद्यातील वास्तव आता जनतेसमोर आले आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. मोदींना तर धर्माचे राज्य आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे, अशी टीकाही तराळ यांनी केली. नवीन कृषी कायद्यानुसार भारतीय शेतकऱ्यांना जागतिक व्यापाऱ्याचे जाळे बंद झाले असून व्यापाऱ्यांना आता हवा तेवढा माल साठवता येणार आहे. यासाठी सरकारने गोदामासाठी २ ते ७ कोटी रुपयांचे कर्जही उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी या नवीन कृषी कायद्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सूत्रसंचालन पंडित अवचार, जिजाऊ वंदना अर्चना मेटे यांनी केला. आभार माणिक ढोकळे, नामदेव सरकटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संदीप बोरकर, शुभम शेरकर पाटील, सुनील प्रधान, ज्ञानेश्वर लोंढे, गंगाधर लोंढे यांनी परिश्रम घेतले.