शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

हिंगोलीत अर्ध्यावरच गुंडाळली पाणीटंचाई आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:51 IST

येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला पाठविलेल्या प्रतिनिधीलाही काहीच माहिती नसल्याने ‘तुम्ही नेमके येथे येता तरी कशाला? असा सवाल करीत आ.रामराव वडकुते यांनी अर्ध्यावर बैठकच बरखास्त केली.

ठळक मुद्दे विविध गावांतील पाणीसमस्येने गाजली आढावा बैठक; सूचना दिलेले अधिकारीही होते गायब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला पाठविलेल्या प्रतिनिधीलाही काहीच माहिती नसल्याने ‘तुम्ही नेमके येथे येता तरी कशाला? असा सवाल करीत आ.रामराव वडकुते यांनी अर्ध्यावर बैठकच बरखास्त केली.बैठकीस जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, आ. डॉ. संतोष टारफे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता भागानगरे, तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी ए. एल. बोंदरे, यांच्यासह जि. प व पं. स सदस्यांची उपस्थिती होती. हिंगोली तालुक्यात पाणी प्रश्न हा दरवर्षी गंभीर बनत असल्याने तो प्रत्येक टंचाई आढावा बैठकीत चर्चेचा ठरतो. तो याही बैठकीत चर्चेला आला होता. प्रारंभी पं. स. पाणीपुरवठा विभागाचे मुकूंद कारेगावकर यांनी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित योजनांची गावनिहाय माहिती सांगितली. ती माहिती संपते न संपते तोच जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल यांनी भारत निर्माण योजनांची परिस्थिती सांगून मागील १० वर्षांपासून किती योजना बंद आहेत, याचा आढावा घेण्याचे सांगितले. त्यातच मुख्य म्हणजे हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील २००८ -२००९ मध्ये २० लाख रुपयांतून करण्यात आलेली योजना धूळखात पडण्याचीही कारणे विचारली त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ती योजना बंद असल्याची सांगित असलेली कारणे मान्यच केले जात नव्हते. तसेच बहुतांश गावातील सरपंचानीही पाणीसमस्या प्रत्यक्ष उभे राहून सांगितल्या. तसेच मागील वर्षीच्या अधिग्रहणाची देयकेही अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळालेली नसल्याचे सांगितल्यावर ती बिले लवकर देण्याचे ग्रामीण पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना आ. तान्हाजी मुटकूळे यांनी सांगितले. तर उपस्थित असलेल्या सरपंचाला आप-आपल्या गावातील पाण्याच्या समस्या सांगण्यास सुचविले होते.मात्र दोन ते तीन सरपंच वगळता एकही सरपंच समस्या सांगण्यास पुढे आले नसल्याने निदान आप- आपल्या गावातील समस्या लिखित स्वरुपात तरी शिक्का मारुन देण्याचे कळविले. तेव्हा कुठे लिखित समस्या घेऊन सरपंच पतीच्या रांगा लागल्याचे दिसून आले. तर विहिरीसाठी अंतराचे प्रमाणपत्र कोणी द्यावे? हाही गुंता ग्रासेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खरात यांनी मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन ते प्रमाणपत्र केवळ भुजल सर्व्हेक्षण विभागाने देण्याचेच ठरले. त्यामुळे ग्रामसेवकांवरील प्रमाणपत्रांचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.चर्चा : सभापती, उपसभापतींची दांडीपंचायत समितीची पाणीटंचाई बैठक असल्याने त्या बैठकीस पं. स. सभापती व उपसभापती यांनी उपस्थित राहणे गरजेचे असतानाही तेच या बैठकीस हजर राहिले नसल्याने त्यांची पाठी मागे बसलेल्या सरंपचामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच याही बैठकीस जास्तीत जस्त पतीराजही उपस्थित होते.त्याचबरोबर एका गावची सरपंच महिला वगळता इतर सर्वच गावच्या सरपंचाचेच पती बैठकीस उपस्थित असल्याने ते आप- आपल्या गावातील पाणी समस्या सांगण्यासाठी पुढे येण्याचे टाळत असल्याचेही चित्र टंचाई आढावा बैठकीत दिसून आले.पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी४हिंगोली तालुक्याला मग्रारोहयो अंतर्गत एकूण १० हजार विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विहिरींची कामे वेळीच करण्यासाठी वरिष्ठ विभागाने लक्ष देवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र पं.स.कार्यालयात पैसे घेऊन कामे होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करीत असल्याचे आ.मुटकुळे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे कोणत्याही शेतकºयाने विहिरीच्या मंजुरीसाठी किंवा मस्टरसाठी कोणत्याही अधिकाºयाला पैसे देण्याची गरज नाही. कुणी मागणी केल्यास ‘आम्हा तीन्हीही आमदारांना निसंकोच पणे फोन करा’ असे आ. तानाजी मुटकुळे यांनी उपस्थितांना आवाहन केले.टारफे यांचे नाव सुचविताच बैठकही संपली४बैठकीस उपस्थित असलेले आ. संतोष टारफे यांचे आ. मुटकुळे यांनी मार्गदर्शनासाठी नाव सुचविताच आ. वडकुते यांनी बैठक बरखास्त करण्याचे सुचविले. त्यामुळे आ. टारफे यांना उपस्थित ग्रामसेवक व सरपंचाना मार्गदर्शन करता आले नाही.बीडीओंची खुर्ची रिकामीच४गटविकास अधिकारी कधीही कार्यालयात हजर राहत नसल्याचा आरोप भटसावंगी तांडा येथील सरपंच श्रावण चव्हाण यांनी केला होता. त्यावर बीडीओ बोंदरे यांनी कदाचित मी कुठे बैठकीस गेलो असावा किंवा आजारी असेल म्हणून कार्यालयात नसेल, असे सांगितले. तर आ. मुटकूळे यांनी इतर सरपंचांनाही विचारणा करत बीडीओंना घरी न बसता कार्यालयात बसून कामे करण्याचे सुचविले.‘टँकरचाही आढावा घ्या’४सध्या पाणीटंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ज्या गावातील टँकरचे प्रस्ताव आल्यास तेथील चौकशी करून टँकर वेळीच सुरू करण्याचे तहसीलदारांना आ.मुटकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूकHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद