शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

हिंगोलीत अर्ध्यावरच गुंडाळली पाणीटंचाई आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:51 IST

येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला पाठविलेल्या प्रतिनिधीलाही काहीच माहिती नसल्याने ‘तुम्ही नेमके येथे येता तरी कशाला? असा सवाल करीत आ.रामराव वडकुते यांनी अर्ध्यावर बैठकच बरखास्त केली.

ठळक मुद्दे विविध गावांतील पाणीसमस्येने गाजली आढावा बैठक; सूचना दिलेले अधिकारीही होते गायब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला पाठविलेल्या प्रतिनिधीलाही काहीच माहिती नसल्याने ‘तुम्ही नेमके येथे येता तरी कशाला? असा सवाल करीत आ.रामराव वडकुते यांनी अर्ध्यावर बैठकच बरखास्त केली.बैठकीस जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, आ. डॉ. संतोष टारफे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता भागानगरे, तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी ए. एल. बोंदरे, यांच्यासह जि. प व पं. स सदस्यांची उपस्थिती होती. हिंगोली तालुक्यात पाणी प्रश्न हा दरवर्षी गंभीर बनत असल्याने तो प्रत्येक टंचाई आढावा बैठकीत चर्चेचा ठरतो. तो याही बैठकीत चर्चेला आला होता. प्रारंभी पं. स. पाणीपुरवठा विभागाचे मुकूंद कारेगावकर यांनी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित योजनांची गावनिहाय माहिती सांगितली. ती माहिती संपते न संपते तोच जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल यांनी भारत निर्माण योजनांची परिस्थिती सांगून मागील १० वर्षांपासून किती योजना बंद आहेत, याचा आढावा घेण्याचे सांगितले. त्यातच मुख्य म्हणजे हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील २००८ -२००९ मध्ये २० लाख रुपयांतून करण्यात आलेली योजना धूळखात पडण्याचीही कारणे विचारली त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ती योजना बंद असल्याची सांगित असलेली कारणे मान्यच केले जात नव्हते. तसेच बहुतांश गावातील सरपंचानीही पाणीसमस्या प्रत्यक्ष उभे राहून सांगितल्या. तसेच मागील वर्षीच्या अधिग्रहणाची देयकेही अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळालेली नसल्याचे सांगितल्यावर ती बिले लवकर देण्याचे ग्रामीण पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना आ. तान्हाजी मुटकूळे यांनी सांगितले. तर उपस्थित असलेल्या सरपंचाला आप-आपल्या गावातील पाण्याच्या समस्या सांगण्यास सुचविले होते.मात्र दोन ते तीन सरपंच वगळता एकही सरपंच समस्या सांगण्यास पुढे आले नसल्याने निदान आप- आपल्या गावातील समस्या लिखित स्वरुपात तरी शिक्का मारुन देण्याचे कळविले. तेव्हा कुठे लिखित समस्या घेऊन सरपंच पतीच्या रांगा लागल्याचे दिसून आले. तर विहिरीसाठी अंतराचे प्रमाणपत्र कोणी द्यावे? हाही गुंता ग्रासेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खरात यांनी मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन ते प्रमाणपत्र केवळ भुजल सर्व्हेक्षण विभागाने देण्याचेच ठरले. त्यामुळे ग्रामसेवकांवरील प्रमाणपत्रांचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.चर्चा : सभापती, उपसभापतींची दांडीपंचायत समितीची पाणीटंचाई बैठक असल्याने त्या बैठकीस पं. स. सभापती व उपसभापती यांनी उपस्थित राहणे गरजेचे असतानाही तेच या बैठकीस हजर राहिले नसल्याने त्यांची पाठी मागे बसलेल्या सरंपचामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच याही बैठकीस जास्तीत जस्त पतीराजही उपस्थित होते.त्याचबरोबर एका गावची सरपंच महिला वगळता इतर सर्वच गावच्या सरपंचाचेच पती बैठकीस उपस्थित असल्याने ते आप- आपल्या गावातील पाणी समस्या सांगण्यासाठी पुढे येण्याचे टाळत असल्याचेही चित्र टंचाई आढावा बैठकीत दिसून आले.पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी४हिंगोली तालुक्याला मग्रारोहयो अंतर्गत एकूण १० हजार विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विहिरींची कामे वेळीच करण्यासाठी वरिष्ठ विभागाने लक्ष देवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र पं.स.कार्यालयात पैसे घेऊन कामे होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करीत असल्याचे आ.मुटकुळे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे कोणत्याही शेतकºयाने विहिरीच्या मंजुरीसाठी किंवा मस्टरसाठी कोणत्याही अधिकाºयाला पैसे देण्याची गरज नाही. कुणी मागणी केल्यास ‘आम्हा तीन्हीही आमदारांना निसंकोच पणे फोन करा’ असे आ. तानाजी मुटकुळे यांनी उपस्थितांना आवाहन केले.टारफे यांचे नाव सुचविताच बैठकही संपली४बैठकीस उपस्थित असलेले आ. संतोष टारफे यांचे आ. मुटकुळे यांनी मार्गदर्शनासाठी नाव सुचविताच आ. वडकुते यांनी बैठक बरखास्त करण्याचे सुचविले. त्यामुळे आ. टारफे यांना उपस्थित ग्रामसेवक व सरपंचाना मार्गदर्शन करता आले नाही.बीडीओंची खुर्ची रिकामीच४गटविकास अधिकारी कधीही कार्यालयात हजर राहत नसल्याचा आरोप भटसावंगी तांडा येथील सरपंच श्रावण चव्हाण यांनी केला होता. त्यावर बीडीओ बोंदरे यांनी कदाचित मी कुठे बैठकीस गेलो असावा किंवा आजारी असेल म्हणून कार्यालयात नसेल, असे सांगितले. तर आ. मुटकूळे यांनी इतर सरपंचांनाही विचारणा करत बीडीओंना घरी न बसता कार्यालयात बसून कामे करण्याचे सुचविले.‘टँकरचाही आढावा घ्या’४सध्या पाणीटंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ज्या गावातील टँकरचे प्रस्ताव आल्यास तेथील चौकशी करून टँकर वेळीच सुरू करण्याचे तहसीलदारांना आ.मुटकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूकHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद