शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

हिंगोलीत अर्ध्यावरच गुंडाळली पाणीटंचाई आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:51 IST

येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला पाठविलेल्या प्रतिनिधीलाही काहीच माहिती नसल्याने ‘तुम्ही नेमके येथे येता तरी कशाला? असा सवाल करीत आ.रामराव वडकुते यांनी अर्ध्यावर बैठकच बरखास्त केली.

ठळक मुद्दे विविध गावांतील पाणीसमस्येने गाजली आढावा बैठक; सूचना दिलेले अधिकारीही होते गायब

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील न. प. कल्याण मंडपम्मध्ये ४ एप्रिल रोजी पंचायत समितीच्या वतीने आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तर आ. डॉ. संतोष टारफे यांच्या सहअध्यक्षतेखाली घेतलेल्या पाणीटंचाई आढावा बैठक झाली. त्यात यांत्रिकीकरण विभागाच्या गैरहजर अधिकाऱ्यांनी बैठकीला पाठविलेल्या प्रतिनिधीलाही काहीच माहिती नसल्याने ‘तुम्ही नेमके येथे येता तरी कशाला? असा सवाल करीत आ.रामराव वडकुते यांनी अर्ध्यावर बैठकच बरखास्त केली.बैठकीस जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, आ. डॉ. संतोष टारफे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता भागानगरे, तहसीलदार गजानन शिंदे, गटविकास अधिकारी ए. एल. बोंदरे, यांच्यासह जि. प व पं. स सदस्यांची उपस्थिती होती. हिंगोली तालुक्यात पाणी प्रश्न हा दरवर्षी गंभीर बनत असल्याने तो प्रत्येक टंचाई आढावा बैठकीत चर्चेचा ठरतो. तो याही बैठकीत चर्चेला आला होता. प्रारंभी पं. स. पाणीपुरवठा विभागाचे मुकूंद कारेगावकर यांनी टंचाई आराखड्यातील प्रस्तावित योजनांची गावनिहाय माहिती सांगितली. ती माहिती संपते न संपते तोच जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल यांनी भारत निर्माण योजनांची परिस्थिती सांगून मागील १० वर्षांपासून किती योजना बंद आहेत, याचा आढावा घेण्याचे सांगितले. त्यातच मुख्य म्हणजे हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील २००८ -२००९ मध्ये २० लाख रुपयांतून करण्यात आलेली योजना धूळखात पडण्याचीही कारणे विचारली त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ती योजना बंद असल्याची सांगित असलेली कारणे मान्यच केले जात नव्हते. तसेच बहुतांश गावातील सरपंचानीही पाणीसमस्या प्रत्यक्ष उभे राहून सांगितल्या. तसेच मागील वर्षीच्या अधिग्रहणाची देयकेही अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळालेली नसल्याचे सांगितल्यावर ती बिले लवकर देण्याचे ग्रामीण पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना आ. तान्हाजी मुटकूळे यांनी सांगितले. तर उपस्थित असलेल्या सरपंचाला आप-आपल्या गावातील पाण्याच्या समस्या सांगण्यास सुचविले होते.मात्र दोन ते तीन सरपंच वगळता एकही सरपंच समस्या सांगण्यास पुढे आले नसल्याने निदान आप- आपल्या गावातील समस्या लिखित स्वरुपात तरी शिक्का मारुन देण्याचे कळविले. तेव्हा कुठे लिखित समस्या घेऊन सरपंच पतीच्या रांगा लागल्याचे दिसून आले. तर विहिरीसाठी अंतराचे प्रमाणपत्र कोणी द्यावे? हाही गुंता ग्रासेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खरात यांनी मांडल्यानंतर त्यावर चर्चा होऊन ते प्रमाणपत्र केवळ भुजल सर्व्हेक्षण विभागाने देण्याचेच ठरले. त्यामुळे ग्रामसेवकांवरील प्रमाणपत्रांचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे.चर्चा : सभापती, उपसभापतींची दांडीपंचायत समितीची पाणीटंचाई बैठक असल्याने त्या बैठकीस पं. स. सभापती व उपसभापती यांनी उपस्थित राहणे गरजेचे असतानाही तेच या बैठकीस हजर राहिले नसल्याने त्यांची पाठी मागे बसलेल्या सरंपचामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच याही बैठकीस जास्तीत जस्त पतीराजही उपस्थित होते.त्याचबरोबर एका गावची सरपंच महिला वगळता इतर सर्वच गावच्या सरपंचाचेच पती बैठकीस उपस्थित असल्याने ते आप- आपल्या गावातील पाणी समस्या सांगण्यासाठी पुढे येण्याचे टाळत असल्याचेही चित्र टंचाई आढावा बैठकीत दिसून आले.पैसे घेतल्याशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी४हिंगोली तालुक्याला मग्रारोहयो अंतर्गत एकूण १० हजार विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विहिरींची कामे वेळीच करण्यासाठी वरिष्ठ विभागाने लक्ष देवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र पं.स.कार्यालयात पैसे घेऊन कामे होत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकरी करीत असल्याचे आ.मुटकुळे यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे कोणत्याही शेतकºयाने विहिरीच्या मंजुरीसाठी किंवा मस्टरसाठी कोणत्याही अधिकाºयाला पैसे देण्याची गरज नाही. कुणी मागणी केल्यास ‘आम्हा तीन्हीही आमदारांना निसंकोच पणे फोन करा’ असे आ. तानाजी मुटकुळे यांनी उपस्थितांना आवाहन केले.टारफे यांचे नाव सुचविताच बैठकही संपली४बैठकीस उपस्थित असलेले आ. संतोष टारफे यांचे आ. मुटकुळे यांनी मार्गदर्शनासाठी नाव सुचविताच आ. वडकुते यांनी बैठक बरखास्त करण्याचे सुचविले. त्यामुळे आ. टारफे यांना उपस्थित ग्रामसेवक व सरपंचाना मार्गदर्शन करता आले नाही.बीडीओंची खुर्ची रिकामीच४गटविकास अधिकारी कधीही कार्यालयात हजर राहत नसल्याचा आरोप भटसावंगी तांडा येथील सरपंच श्रावण चव्हाण यांनी केला होता. त्यावर बीडीओ बोंदरे यांनी कदाचित मी कुठे बैठकीस गेलो असावा किंवा आजारी असेल म्हणून कार्यालयात नसेल, असे सांगितले. तर आ. मुटकूळे यांनी इतर सरपंचांनाही विचारणा करत बीडीओंना घरी न बसता कार्यालयात बसून कामे करण्याचे सुचविले.‘टँकरचाही आढावा घ्या’४सध्या पाणीटंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. ज्या गावातील टँकरचे प्रस्ताव आल्यास तेथील चौकशी करून टँकर वेळीच सुरू करण्याचे तहसीलदारांना आ.मुटकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूकHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद