शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवा ! संतप्त नागरिकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:41 PM

शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिका-यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील अण्णा भाऊ साठे नगर येथे उभारण्यात येत असलेल्या कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबवावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोर २४ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन केले.शहरातील अण्णा भाऊ साठे नगरातील महिला, पुरूष व युवक नगपालिकेत मंगळवारी मोठ्या संख्येने जमले होते. येथे उभारण्यात येणारा कत्तलखाना हा गैरकायदेशीर आहे. वसाहतीपासून पाच किमी अंतरावर कत्तलखाना असायला पाहिजे; परंतु तो आमच्याच वसाहतीमध्ये सार्वजनिक ठिकाणी सुरू केला जात आहे. कत्तलखान्यामुळे येथील नागरिक व चिमुकल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.कत्तलखान्यातील सांडपाणी व टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शकतेनुसार करणे बंधनकारक असतानाही या नगरातील मागील पंचवीस वर्षांपासून बंद पडलेल्या जनावरांचा कत्तलखाना नागरिकांची संमती न घेताच सुरू केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरूष व युवक नगरपालिकेत जमले होते. यावेळी संतप्त महिलांनी न. प. प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कत्तलखान्याचे काम तात्काळ थांबविण्यात आले नाही तर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर प्रदीप खंदारे, जय घोडे, अक्षय डाखोरे, कैलास शिखरे, दिगंबर हानवते, उत्तम चांदणे, अनिल खडसे, नितीन गालफाडे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.दरम्यान, या नागरिकांनी साईटवरही काम थांबविण्यासाठी दबाव आणला होता.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMorchaमोर्चा