शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

सेंद्रिय डीएपीचा कहर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:10 AM

डीएपी हे महागडे खत शेतकऱ्यांना परवडत नसल्याने त्याला पर्याय म्हणून सेंद्रिय डीएपीच्या नावाखाली अनेक कंपन्यांनी खते बाजारात आणली आहेत. मात्र त्यांना परवाना आहे की नाही, याचा संभ्रम सुरू असून छापे मारल्यानंतर गायब झालेला माल पुन्हा बाजारात विक्रीला येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डीएपी हे महागडे खत शेतकऱ्यांना परवडत नसल्याने त्याला पर्याय म्हणून सेंद्रिय डीएपीच्या नावाखाली अनेक कंपन्यांनी खते बाजारात आणली आहेत. मात्र त्यांना परवाना आहे की नाही, याचा संभ्रम सुरू असून छापे मारल्यानंतर गायब झालेला माल पुन्हा बाजारात विक्रीला येत आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यात कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात छापे मारले. यामध्ये वसमत तालुक्यात २, औंढा तालुक्यात ३, हिंगोली तालुक्यातील ३ दुकानांत छापे मारल्यानंतर ३२५ बॅग सेंद्रीय डीएपी जप्त करण्यात आली होती. यामध्ये खरोखरच डीएपीसारखे कंटेंट आहे का? हा प्रश्न आहे. मात्र त्याची कोणतीच तपासणी केलेली नसते. शिवाय सेंद्रीय खतांच्या पोत्यांवरही तसे कुठेच लिहिलेले नाही. शासनाने यंदा बियाणे व खते कंपन्यांच्या नावाची यादीच जारी केली आहे. या यादीत ज्या कंपन्यांची व त्यांच्या उत्पादनाची नावे नाहीत, त्यांची उत्पादने बाजारात आल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र तरीही बाजारात अशाप्रकारे खते येत असल्याने कृषी विभागाने पुढाकार घेत कारवाई केली होती. डीएपी हे मूळ खत महागडे असल्याने शेतकºयांना या सेंद्रीय डीएपीची भुरळ घालण्यासाठी एक साखळीच कार्यरत केली जात होती. यात तीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत मनाला वाटेल त्या दरात ही डीएपी मिळत होती, असे शेतकºयांनीच सांगितले. त्यामुळे काहींना संशय आल्याने त्यांनीही कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई झाली. अजूनही असे प्रकार थांबले नसून काहींनी छाप्यामुळे थांबवलेली विक्री पुन्हा सुरू केल्याचे दिसते.खते, बियाणे :तालुकानिहाय नमुन्यांची आकडेवारीकृषि अधीक्षक कार्यालयाने ६ तर उपसंचालकाने ५, तालुका कृषिअधिकारी हिंगोली ५, औंढानागनाथ ८, कळमनुरी ५, वसमत ६, सेनगाव ५, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांनी ६५ असे एकूण १०५ बियाणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. तर खताचे यामध्ये जि. प. कृषिविभागाने १, औंढा ८, वसमत ६, कळमनुरी ९, सेनगाव ९ असे एकूण ३३ नमुने घेतले.तर जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयाने खताचे २, उपसंचालकाने २, तालुका कृषि अधिकारी औंढा ४, वसमत २, हिंगोली २० असे एकूण ३० खताचे नमुने घेतले आहेत. जि. प. कृषि विभागाने १२, तालुका कृषि अधिकारी औंढा २०, वसमत १८, हिंगोली १८, कळमनुरी २१, सेनगाव २१ असे एकूण १९ बियाणांचे नमुने घेतले.जर सेंद्रीय डीएपी अथवा परवाना नसलेल्या कंपनीची खते बाजारात आल्याची शंका शेतकºयास असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधीक्षक विजय लोखंडे, कृषी विकास अधिकारी अंकुश डुब्बल यांनी केले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी