शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शेतकऱ्यांकडून सहा कोटींपैकी केवळ ५३ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:54 IST

पीएम किसान योजनेत सुरुवातीपासूनच महसूल विभागाने काम केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यासाठी त्या वेळी मोठा दबाव ...

पीएम किसान योजनेत सुरुवातीपासूनच महसूल विभागाने काम केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम पडण्यासाठी त्या वेळी मोठा दबाव प्रशासनावर होता. त्यानंतरही एक लाख खातेदार शेतकऱ्यांच्या नोंदी करताना अनेक त्रुटी राहिल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांना नावातील तफावत, खाते क्रमांक आदी अनेक बाबींमुळे रक्कम मिळत नव्हती. त्यानंतर शासनाने बाहेरूनच शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची मुभा दिली. यानंतर नोंदणीचा वेग वाढला. मात्र यात अनेक अपात्रांनी शेतकरी म्हणून अर्ज भरत पीएम किसान योजनेत चार महिन्यांनी मिळणारे २ हजारांचे पेन्शन लाटल्याचे समोर आले आहे. या योजनेत आयकर भरणाऱ्या २३९० शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याने त्यांना पात्र ठरविले आहे. यापैकी २३०६ शेतकऱ्यांच्या खात्यावर किमान एक तरी हप्ता जमा झालेला आहे. एकूण १० हजार ८१९ हप्ते या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. ही रक्कम २ कोटी १६ लाख ३८ हजार रुपये एवढी होते. मात्र यापैकी ४४१ शेतकऱ्यांनी २ हजार ६७ हप्ते परत केले असून ही रक्कम ४१ लाख ३४ हजार एवढी आहे.

अपात्र असतानाही शेतकरी म्हणून नोंदणी केलेल्या ६४९५ जणांना पात्र ठरविले गेले होते. यापैकी ५८८५ जणांच्या खात्यावर किमान एका हप्त्याची तरी रक्कम जमा झाली आहे. एकूण २१ हजार ८४२ हप्त्यांतून ४ कोटी ३६ लाख ८४ हजारांची रक्कम या खात्यांवर जमा झाली आहे. यापैकी केवळ १६० जणांनी ५८८ हप्ते परत केले असून ही रक्कम ११ लाख ७६ हजार एवढी आहे. अपात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असूनही रक्कम परत करणाऱ्यांची संख्या कमी आहे. आयकर भरणारे शेतकरी मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून ही रक्कम परत करीत आहेत. यापैकी अनेक जण कर्मचारी किंवा इतर हुद्द्यावरही आहेत. अशांना अडचण नको म्हणून ही रक्कम भरणे क्रमप्राप्त ठरत आहे.

तलाठ्यांचेही काम बंद

राज्यात पीएम किसान योजनेत चांगले काम केल्याचे श्रेय पूर्णपणे कृषी विभागाने लाटल्याचा राग महसूलमधील इतर सर्व घटकांना आला आहे. त्यामुळे ही योजनाच कृषी विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे. तसेही तलाठ्यांनी ऑनलाइन काम बंद आंदोलन केले आहे. तलाठी पीएम किसानमधील वसुलीकडे लक्ष देत असल्याने वसुलीचे प्रमाण वाढते होते. आता त्यांनीही वसुली बंद केल्याने आणखी १० ते १५ लाखांपेक्षा जास्त रक्कम मार्च एण्डला होईल, असे दिसत नाही. कृषी विभागाकडे हस्तांतरण झाले तर त्यांनाही हे लाभार्थी शोधण्याची कसरत पुन्हा करावी लागणार आहे. आयकर भरणारे सापडतील, मात्र अपात्र लाभार्थी सापडतील का? सापडले तर पैसे भरतील काय? हा प्रश्न आहे. मात्र कृषी व महसूलच्या वादात ही मोठी रक्कम अडकून पडणार असल्याचे दिसत आहे.