शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

उद्योग नसलेला ‘हिंगोली’ जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:49 AM

जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सुविधांचा अभाव, भूखंड नसल्याने उद्योग सुरू होत नाहीत. तर जिल्ह्यात सुरू आहेत तेही उद्योग सध्या दुष्काळामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

दयाशिल इंगोले ।हिंगोली : जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सुविधांचा अभाव, भूखंड नसल्याने उद्योग सुरू होत नाहीत. तर जिल्ह्यात सुरू आहेत तेही उद्योग सध्या दुष्काळामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.हिंगोली जिल्ह्यातील आहे त्या उद्योगांनाच घरघर लागली आहे. दुष्काळामुळे पिके गेली शेतकरी हतबल झाला.त्यामुळे जिनींग व दालमिल अडचणीत आल्या आहेत. उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागासलेल्या हिंगोली जिल्ह्याला ना उद्योग जिल्हा म्हणून घोषित केले होते. परंतु सध्या जिल्हा उद्योगात प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचे भासिवले जात आहे. एमआयडीसी व सहकारी औद्यागिक वसाहतीमधील भुखंडावर उभारलेले उद्योग अस्तीत्त्वात आहेत का? हेही सांगणे कठीण आहे. हिंगोली येथे २७३ पैकी २६६ भूखंड वाटप आहेत. येथे १९८ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र केवळ ४० भूखंडावरच उद्योग उभारले आहेत. तर वसमत ४० पैकी ३८ भूखंड वाटप आहेत. येथे २२ भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात मात्र केवळ १० ठिकाणीच उद्योग सुरू आहेत. कळमनुरी ३२ पैकी १२ भूखंड वाटप असून एकाच ठिकाणी उद्योग आहे. हिंगोली येथील सहकारी औद्योगिक वसाहतमधील ६६ पैकी ६६ भूखंड वाटप केले आहेत. या ठिकाणी ३० भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ८ भूखंडावर उद्योग सुरू आहेत.असोसिएशनचा पाठपुरावाजिल्ह्यातील उद्योगासंदर्भात येणाऱ्या अडी-अडचणी व समस्यांवर हिंगोली जिल्हा इंडस्ट्रीज असोसिएशन मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहे. परंतु असोसिएशनच्या मागण्यांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचे असोसिएशनचे सचिव नंदकिशोर तोष्णीवाल यांनी सांगितले. उद्योग घटकांचा आकडा फुगविला जात असून भविष्यात याचे उद्योग व बेरोजगांवर विपरित परिणाम होणार असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करते. पुर्वी सामुहिक प्रोत्सहान योजना २००७ मध्ये भांडवली अनुदान एक रक्कमी मिळत असे. त्यामुळे उद्योगाला चालना मिळायची.

टॅग्स :Hingoliहिंगोलीbusinessव्यवसाय