शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत वंचित आघाडी पूर्ववैभवाकडे जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 15:32 IST

एकेकाळी हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारिपचे माधवराव नाईक यांच्याशीच प्रमुख उमेदवाराची टक्कर असायची. मात्र त्यांनाही कधी जिंकता आले नाही.  मात्र ते वैभव लयाला गेले अन् उभारी घेण्याइतपत दुसरे सक्षम नेतृत्वही मिळाले नाही. आता वंचित आघाडीचा प्रयोग काय साध्य करील? याकडे लक्ष लागले आहे.

- विजय पाटील 

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निश्चित आकडेवारी सांगणे अवघड असले तरीही दलित, मुस्लिम, ओबीसी मतदारसंख्या ३५ टक्क्यांपेक्षा निश्चितपणे जास्त आहे. मात्र ही गठ्ठा मते कुणा एकाच्या पारड्यात जातील, असे म्हणने धाडसाचे ठरणार आहे.

या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर येथे १९९६ मध्ये माधवराव नाईक यांनी भारिपकडून १ लाख २४ हजार एवढी प्रभावी मते घेवून दुसरे स्थान मिळविले होते. १९९८ ला विश्राम घेवून त्यांनीच पुन्हा १९९९ ला दोन लाख ८ हजारांचा पल्ला गाठत पराभव पत्करला. २00४ ला भारिपकडून संजय राठोड होते. त्यांना २५ हजार मतांवरच समाधान मानावे लागले. त्यानंतर भारिपला उतरती कळा लागली अन् बसपा पुढे आली. २00९ मध्ये नाईक यांना ५२ हजार तर बसपाचे बी.डी. चव्हाण यांना १ लाख ११ हजार मते होती. २0१४ मध्येही बसपाचे चुन्नीलाल जाधवांना २५ हजार तर भारिपच्या रामराव राठोड यांना ९५७७ मते होती. यावरून भारिपची सातत्याने पिछेहाट होत गेल्याचे दिसते. तर ही मते कधी बसपाकडे झुकली तर कधी काँग्रेसच्या पारड्यात गेली. 

प्रभावी यंत्रणा उभारणे गरजेचे मोहन राठोड हे किनवटचे आहेत. किनवट वगळता इतरत्र प्रभावी यंत्रणा उभारणे हेच त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. जर यात त्यांना यश मिळाले तर ही बाब काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणार आहे.   च्यावेळी पुन्हा वंचित आघाडीच्या रुपाने मुस्लिम, दलित, ओबीसी मतांवर डोळा असला तरीही माधवराव नाईकांएवढा प्रभावी चेहरा यावेळी मैदानात नाही.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhingoli-pcहिंगोलीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी