शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चालक - वाहकांची रात्र डासांसोबत एस. टी.तच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:30 IST

जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान ...

जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान सात दिवसांची संचारबंदी केली होती. या दरम्यान, तिन्ही आगारातील एस. टी. बसेस बंदच होत्या. या सात दिवसांमध्ये मात्र डासांपासून चालक - वाहकांची सुटका झाली. परंतु परजिल्ह्यातील एस. टी. बसेस सुरू होत्या. एस. टी. सुरु झाल्याने आता मुक्कामी राहणाऱ्या चालक - वाहकांना डासांसोबत एस. टी. बसेसमध्ये निद्रा घ्यावी लागणार आहे.

खरे पाहिले तर ग्रामपंचायतीने चालक - वाहकांची जेवण व चहा-पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु, तसे काही होताना दिसून येत नाही. चालक - वाहक गेल्या कित्येक वर्षांपासून एस. टी.मध्येच डासांसोबत रात्र काढतात. सद्यस्थितीत हिंगोली आगाराच्या ७, तर वसमत आगाराच्या ९ बसेस मुक्कामी आहेत. कळमनुरी आगाराने ग्रामीण भागात अजून तरी मुक्कामी बसेस सुरु केलेल्या नाहीत.

प्रतिक्रिया

अनेक समस्यांचा करावा लागतो सामना

ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून एस. टी. महामंडळाच्या वतीने बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. खरे पाहिले तर ग्रामपंचायतीने चालक - वाहकांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु मुक्कामी राहणाऱ्या गावांमध्ये चालक - वाहकांना बसचा आधार घ्यावा लागत आहे. बसमधील आसन व्यवस्थेवरच रात्र काढावी लागत आहे.

सहा गावांमध्ये अजूनही शौचालय नाही

वसमत आगारातून ९ ठिकाणी मुक्कामी बसेस सोडण्यात येत आहेत. ९ गावांपैकी पिंपराळा, नर्सी, बाराशिव या गावांमध्येच शौचालयाची व्यवस्था आहे. धानोरा, वारंगा, सिंदगी, कानोसा, येलदरी, लोहरा येथे मात्र शौचालयाची व्यवस्था नाही. यामुळे चालक - वाहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एरव्हीची गोष्ट वेगळी आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढू लागले आहेत. त्यामुळे दुसराच आजार उद्‌भवेल, याची भीती चालक - वाहकांना आहे.

कोरोनामुळे पुढे येण्यास कोणीही धजत नाही

२३ मार्च २०२०पासून कोरोना आजाराने सर्वत्र डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वच जण दूरदूर राहू लागले आहेत. जेवण सोडा, साधे पाणीही चालक - वाहकांना ग्रामीण भागात मुक्कामाच्या ठिकाणी मिळत नाही. कोरोना आजारापासून चालक - वाहकांचे संरक्षण व्हावे म्हणून महामंडळाने मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे.

भीती वाटते ती कोरोना व्हायची

कोरोना होऊ नये म्हणून सर्वच प्रवाशांना मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना दिल्या जातात. परंतु, काही प्रवासी असे असतात की, जे मास्क घालतच नाहीत. वेळ कधी सांगून येत नसते. कोरोना होऊ नये म्हणून मुक्कामाच्या ठिकाणी काळजी घेत असतो. परंतु, कोरोनाची भीती वाटत आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार ग्रामीण भागात एस. टी. महामंडळ बसेस सुरु करते. परंतु, म्हणावी तशी व्यवस्था चालक - वाहकांची केली जात नाही. एरव्हीची गोष्ट वेगळी आहे. सध्या कोरोना आजार असल्याने थोडी भीती वाटत आहे. ग्रामपंचायतीने कोरोना काळात तरी चालक आणि वाहकांची काळजी करुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

- रा. य. मुपडे, आगारप्रमुख, वसमत