शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

वाळूघाट परवानगी मिळेना; दंडावरच भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 01:11 IST

जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातच वाळूघाट लिलावास वारंवार न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांमुळे अडसर येत आहे. त्यामुळे वाळू चोरीचे प्रकारही वाढीस जात असून ते थांबविणेही यंत्रणेला शक्य नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातच वाळूघाट लिलावास वारंवार न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांमुळे अडसर येत आहे. त्यामुळे वाळू चोरीचे प्रकारही वाढीस जात असून ते थांबविणेही यंत्रणेला शक्य नाही. मात्र अधून-मधून होणाºया कारवाईतही कोट्यवधीचा दंड वसूल झाला आहे.पर्यावरणावर होणा-या परिणामांचा दाखला देत वाळू उपशावर निर्बंधासाठी वारंवार याचिका दाखल होत आहेत. एका प्रकरणाचा निकाल लागला की, दुसरी याचिका दाखल होत आहे. त्यात महसूल विभागाने केलेली तयारी दोनदा वाया गेली. एकदा तर जाहिरातही प्रकाशित झाली होती. मात्र नंतर त्याला स्थगिती द्यावी लागली. २६ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया त्यामुळे अडकून पडली आहे. यामुळे जिल्ह्यात वैध वाळू मिळत नसल्याने अवैध वाळूउपसा करणाºयांचे प्रमाण मात्र कमी झाले नाही. महसूल प्रशासनाच्या तावडीत सापडल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो, याची खात्री असतानाही हा उपसा होत आहे. चुकून कधीतरी अशी चोरी करणारे हाती लागत आहेत. अन्यथा बिनबिभोटपणे त्यांचा हा व्यवसाय सुरु असल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही अशी चोरीची वाळू येत आहे. यावर कारवाईसाठी तलाठी मंडळी पुढाकार घेत नाही. तर वरिष्ठ अधिकारी बैठका व इतर बाबींतच हैराण आहेत. त्यामुळे आता अधिकृतरीत्या वाळूघाट लिलाव झालाच तर त्यातही कोणी सहभागी होते की नाही, हा प्रश्न आहे. तसाही याचा महसूल वसुलीला फटका बसत आहे. यंदाही वाळूच्या दंडाव्यतिरिक्त फारसा महसूल प्रशासनाला मिळणार नाही. राष्ट्रीय महामार्गांच्या कामामुळे इतर गौण खनिजापोटी मिळणाºया स्वामित्व धनामुळे उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल चालू असल्याचे मात्र चित्र आहे. त्यातही काही कंत्राटदार मोफतच उपसा करीत असल्याची ओरड असून प्रशासनाचीच त्यावर नजर पडणे आवश्यक आहे.हिंगोली जिल्ह्यात वाळूघाट लिलावात गेलेले नसल्याने अवैध उपशावर निर्बंध आणताना प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे. वाहने पकडण्यासाठी कधी रात्री तर कधी दिवसा कवायत करावी लागत आहे. यातून डिसेंबरअखेरपर्यंत १.४९ कोटींचा दंड वसूल केला होता. यात हिंगोली तालुक्यात १६ प्रकरणांत २४.६४ लाख, सेनगावात १६ प्रकरणांत २१.१५ लाख, कळमनुरीत ३९ प्रकरणांत २६.८७ लाख, वसमतला ९ प्रकरणांत १५.२९ लाख तर औंढ्यात ४७ प्रकरणांत ६१ लाखांची दंड वसुली केली. सर्वाधिक औंढ्यात तर सर्वांत कमी वसमतला कारवाई झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीRevenue Departmentमहसूल विभाग