शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

आचारसंहितेत पाणी प्यायचेच नाही का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:15 IST

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाने आता टंचाईचा मुद्दा त्यांच्या कामाच्या यादीतून जणू वगळूनच टाकल्याचे दिसत आहे. ज्या मतदारांना लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यांच्यावर सध्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. उमेदवार त्यांना मतदारराजा म्हणत असले तरीही त्यांची अवस्था फकिरासारखी झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाने आता टंचाईचा मुद्दा त्यांच्या कामाच्या यादीतून जणू वगळूनच टाकल्याचे दिसत आहे. ज्या मतदारांना लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यांच्यावर सध्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. उमेदवार त्यांना मतदारराजा म्हणत असले तरीही त्यांची अवस्था फकिरासारखी झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे. टंचाईची तीव्रता झपाट्याने वाढत चालली आहे. उन्हाचा पाराही आता चांगलाच वाढला आहे. दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. निवडणुकांमुळे कसेतरी पुढारी मात्र चेहऱ्यावरचा रंग उडेपर्यंत जोरात फिरत आहेत. तर दुसरीकडे मतदार गावात पाण्याचा थेंब नसल्याने रानोमाळ भटकत आहेत. टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागू नये म्हणून उमेदवारही दुपारी नाहीतर रात्री गावात जाऊन मतदारांना साकडे घालताना दिसत आहेत. तर टंचाईचा मुद्दा काढला की, आचारसंहितेमुळे विलंब होत असेल. मात्र पाणी मिळेल, असे सांगितले जात आहे. खरेतर टंचाईच्या कामांना आचारसंहितेची अडचण नाही. मात्र तरीही गोरगरीब, भाबड्या जनतेला हेच कारण ऐकावे लागत आहे. आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय कडेकोट बंदोबस्तात आहे. तेथे पोलीस कुणालाच आतमध्ये एन्ट्री करू देत नसल्याने टंचाईचा प्रश्न घेऊन येणारे बिचारे आल्या पावली परत जात होते.जिल्हा परिषदेत गेल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविणार आहोत, एवढेच ऐकायला मिळते. त्यामुळे उद्विग्नपणे नागरिक ‘आचारसंहितेत आम्ही पाणीच प्यायचे नाही का’, असा सवाल करीत आहेत.२८ नळयोजना दुरुस्ती, १00 विंधन विहिरींचे प्रस्तावहिंगोली जिल्हा परिषदेकडून दुरुस्ती व पूरक नळयोजनांचे जवळपास २८ प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर अद्याप निर्णय नाही.नव्याने विंधन विहिरींचेही शंभरावर प्रस्ताव दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. पहिलेच मार्गी नसल्याने यांचे काय होणार, हा तर त्याहून गंभीर प्रश्न आहे.हिंगोली जिल्ह्यातील अधिग्रहणांची संख्याही आता वाढली आहे. जवळपास १७ अधिग्रहणे ही टँकरसाठी करण्यात आली आहेत. तर याशिवाय १५४ जलस्त्रोतांचे अधिग्रहण गावातील टंचाई दूर करण्यासाठी करण्यात आले आहे. यात सर्वाधिक ४२ अधिग्रहणे वसमतमध्ये आहेत. तर हिंगोली २७, कळमनुरी ३८, सेनगाव २५, औंढा नागनाथ २२ अशी संख्या आहे. मात्र अनेक गावांत अशा स्त्रोतांचीही मर्यादा पडत असून गावाच्या शिवारातील काही स्त्रोत असल्याने पायपीट करावी लागत आहे. त्याचा फटका बसत आहे.टंचाईच्या झळा वाढल्या असून आता ३६ हजार ६४८ लोकसंख्या टँकरचे पाणी पित आहे. यात हिंगोली-३000, कळमनुरी-११२८३, सेनगाव-१४५७0, वसमत ३0२५, औंढा ४७७0 अशी तालुकानिहाय संख्या आहे.टँकर पोहोचले २६ वरहिंगोली जिल्ह्यात उपाययोजनांपैकी टँकर ही उपाययोजना तेवढी काही ठिकाणी जलदगतीने केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टँकरर्सची संख्या आता २६ वर पोहोचली आहे. त्याद्वारे दररोज ६0 खेपा मंजूर आहेत. १५ गावांना टँकर लागले आहेत. यात हिंगोलीत ३ गावांसाठी ४, कळमनुरीत ६ गावांसाठी ८, सेनगावात ३ गावांसाठी ८, वसमतला एकएक गावासाठी दोन, औंढा नागनाथ तालुक्यातील २ गावे व तीन वाड्यांसाठी ४ टँकर सुरू आहेत.हिंगोलीत कनका, लोहगाव, कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवनी खु., पोतरा, सिंदगी, हातमाली, सेनगावात जयपूर, कहाकर खु. व सेनगाव, वसमतला बाभूळगाव, औंढ्यात रामेश्वर, येहळेगाव सोळंके या दोन गावांसह संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, लक्ष्मणनाईक तांडा या गावांत टँकर सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईElectionनिवडणूक