शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

आचारसंहितेत पाणी प्यायचेच नाही का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:15 IST

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाने आता टंचाईचा मुद्दा त्यांच्या कामाच्या यादीतून जणू वगळूनच टाकल्याचे दिसत आहे. ज्या मतदारांना लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यांच्यावर सध्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. उमेदवार त्यांना मतदारराजा म्हणत असले तरीही त्यांची अवस्था फकिरासारखी झाली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाने आता टंचाईचा मुद्दा त्यांच्या कामाच्या यादीतून जणू वगळूनच टाकल्याचे दिसत आहे. ज्या मतदारांना लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यांच्यावर सध्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. उमेदवार त्यांना मतदारराजा म्हणत असले तरीही त्यांची अवस्था फकिरासारखी झाली आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे. टंचाईची तीव्रता झपाट्याने वाढत चालली आहे. उन्हाचा पाराही आता चांगलाच वाढला आहे. दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. निवडणुकांमुळे कसेतरी पुढारी मात्र चेहऱ्यावरचा रंग उडेपर्यंत जोरात फिरत आहेत. तर दुसरीकडे मतदार गावात पाण्याचा थेंब नसल्याने रानोमाळ भटकत आहेत. टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागू नये म्हणून उमेदवारही दुपारी नाहीतर रात्री गावात जाऊन मतदारांना साकडे घालताना दिसत आहेत. तर टंचाईचा मुद्दा काढला की, आचारसंहितेमुळे विलंब होत असेल. मात्र पाणी मिळेल, असे सांगितले जात आहे. खरेतर टंचाईच्या कामांना आचारसंहितेची अडचण नाही. मात्र तरीही गोरगरीब, भाबड्या जनतेला हेच कारण ऐकावे लागत आहे. आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय कडेकोट बंदोबस्तात आहे. तेथे पोलीस कुणालाच आतमध्ये एन्ट्री करू देत नसल्याने टंचाईचा प्रश्न घेऊन येणारे बिचारे आल्या पावली परत जात होते.जिल्हा परिषदेत गेल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविणार आहोत, एवढेच ऐकायला मिळते. त्यामुळे उद्विग्नपणे नागरिक ‘आचारसंहितेत आम्ही पाणीच प्यायचे नाही का’, असा सवाल करीत आहेत.२८ नळयोजना दुरुस्ती, १00 विंधन विहिरींचे प्रस्तावहिंगोली जिल्हा परिषदेकडून दुरुस्ती व पूरक नळयोजनांचे जवळपास २८ प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर अद्याप निर्णय नाही.नव्याने विंधन विहिरींचेही शंभरावर प्रस्ताव दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. पहिलेच मार्गी नसल्याने यांचे काय होणार, हा तर त्याहून गंभीर प्रश्न आहे.हिंगोली जिल्ह्यातील अधिग्रहणांची संख्याही आता वाढली आहे. जवळपास १७ अधिग्रहणे ही टँकरसाठी करण्यात आली आहेत. तर याशिवाय १५४ जलस्त्रोतांचे अधिग्रहण गावातील टंचाई दूर करण्यासाठी करण्यात आले आहे. यात सर्वाधिक ४२ अधिग्रहणे वसमतमध्ये आहेत. तर हिंगोली २७, कळमनुरी ३८, सेनगाव २५, औंढा नागनाथ २२ अशी संख्या आहे. मात्र अनेक गावांत अशा स्त्रोतांचीही मर्यादा पडत असून गावाच्या शिवारातील काही स्त्रोत असल्याने पायपीट करावी लागत आहे. त्याचा फटका बसत आहे.टंचाईच्या झळा वाढल्या असून आता ३६ हजार ६४८ लोकसंख्या टँकरचे पाणी पित आहे. यात हिंगोली-३000, कळमनुरी-११२८३, सेनगाव-१४५७0, वसमत ३0२५, औंढा ४७७0 अशी तालुकानिहाय संख्या आहे.टँकर पोहोचले २६ वरहिंगोली जिल्ह्यात उपाययोजनांपैकी टँकर ही उपाययोजना तेवढी काही ठिकाणी जलदगतीने केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टँकरर्सची संख्या आता २६ वर पोहोचली आहे. त्याद्वारे दररोज ६0 खेपा मंजूर आहेत. १५ गावांना टँकर लागले आहेत. यात हिंगोलीत ३ गावांसाठी ४, कळमनुरीत ६ गावांसाठी ८, सेनगावात ३ गावांसाठी ८, वसमतला एकएक गावासाठी दोन, औंढा नागनाथ तालुक्यातील २ गावे व तीन वाड्यांसाठी ४ टँकर सुरू आहेत.हिंगोलीत कनका, लोहगाव, कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवनी खु., पोतरा, सिंदगी, हातमाली, सेनगावात जयपूर, कहाकर खु. व सेनगाव, वसमतला बाभूळगाव, औंढ्यात रामेश्वर, येहळेगाव सोळंके या दोन गावांसह संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, लक्ष्मणनाईक तांडा या गावांत टँकर सुरू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईElectionनिवडणूक