शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत वाढणार जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:39 IST

जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात १५ हजार करण्याचे उद्दिष्ट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असून, जलसंपदा विभागाच्या वतीने एकूण पाच तलावांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी एका लावाचे काम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याने यात २.७३ दलघमी पाणीसाठवण होणार असून, ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर इतर चार तलावांचेही काम येत्या काही दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात १५ हजार करण्याचे उद्दिष्ट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असून, जलसंपदा विभागाच्या वतीने एकूण पाच तलावांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी एका लावाचे काम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याने यात २.७३ दलघमी पाणीसाठवण होणार असून, ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर इतर चार तलावांचेही काम येत्या काही दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे.जिल्ह्याचे एकूण ४ लाख २१ हजार लागवडीखाली क्षेत्र असून, ३६ हजार ७०० एवढे सिंचनाखाली क्षेत्र आहे. तर १० हजार ६१५. ७५ हेक्टरवर फळबागा आहेत. मात्र पाणीच नसल्याने बऱ्याच शेतकºयांनी फळबागा तोडून टाकल्या आहेत. आता दोन वर्षांत जिल्ह्याचे सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. यामध्ये राज्यपालांनी विशेष करुन लक्ष घातल्यामुळे पाणीपातळी वाढविण्यासाठी प्रशासन लक्ष देत आहे. आजघडिला जलसंपदा विभागाच्या वतीने हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण, अंभेरी, हळदवाडी, बोराळा, पिंपळखुटा या पाच तलावांचे काम हाती घेतलेले आहे. यापैकी नवलगव्हाण येथील तलावाचे काम अंतिम टप्यात आल्याने यात जवळपास ४९० हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे. तर अंभेरी आणि हळदवाडी येथील तलावाचे काम मावेजामुळे अडले होते. त्याची अजून भूसपांदन प्रक्रिया सुुरु आहे.ती प्रक्रिया पूर्ण होताच शेतकºयांना मावेजा देऊनच तलावाच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. हे दोन तलाव पूर्ण झाल्यास हळदवाडी तलावात १.६८ द.ल.घ.मी तर अंभेरी येथील तलावात १.७७ द. ल. घ. मी पाणी साठवण होऊन ५८६ हेक्टर जमिनीचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे.पिंपळखुटा येथील प्रकल्प चार प्रकल्पापेक्षा मोठा असल्याने यात ११. २० द.ल.घ.मी एवढी पाणी साठवण होणार असून, १ हजार ४४१ हेक्टर सिंचनक्षेत्र वाढणार आहे.या तलावाचे मोजमाप आॅक्टोबरमध्ये करणे प्रस्तावित आहे. तर बोराळा येथील तलावाचे जुलैमध्ये मोजमाप होऊन शेतकºयांना मावेजा मिळाल्यानंतर गतीने कामास प्रारंभ केला जाणार आहे.जलसंपदा विभागाकडे मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध असून, केवळ भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणेच गरजेचे आहे. जिल्ह्याचा सिंचनाचा टक्का वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लक्ष दिल्याने आठ ते दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रकल्पाच्या कामांना गती आली असल्याचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. मगर यांनी सांगितले.मागील अनेक वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. पाणीच नसल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतजमिनी पडिक ठेवल्या आहेत. मात्र आता मोठ- मोठे प्रकल्प होणार असल्याने पुन्हा लागवडीखाली क्षेत्र वाढणार आहे. तर पूर्णा नदीवर औंढा तालुक्यात पोटा येथे,वसमत तालुक्यात जोडपिंपरी आणि हिंगोली तालुक्यात पिंपळखुटा येथे उच्चपातळी बंधारे प्रस्तावित आहेत. तेथे जवळपास २७ द.ल.घ.मी. पाणीसाठा होवून ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. संकल्प चित्रसंघटना नाशिक येथे संकल्पनाचे काम सुरु आहे.पोटा बंधाºयाच्या संकल्पनास संघटनेची मंजुरीही मिळालेली आहे. तर इतर दोनचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच सुकळी, डिग्रस कºहाळे येथेही दोन साठवण तलाव होणार आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी