शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दोन वर्षांत वाढणार जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:39 IST

जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात १५ हजार करण्याचे उद्दिष्ट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असून, जलसंपदा विभागाच्या वतीने एकूण पाच तलावांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी एका लावाचे काम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याने यात २.७३ दलघमी पाणीसाठवण होणार असून, ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर इतर चार तलावांचेही काम येत्या काही दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र येत्या दोन वर्षात १५ हजार करण्याचे उद्दिष्ट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले आहे. त्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु असून, जलसंपदा विभागाच्या वतीने एकूण पाच तलावांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी एका लावाचे काम पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावर असल्याने यात २.७३ दलघमी पाणीसाठवण होणार असून, ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तर इतर चार तलावांचेही काम येत्या काही दिवसांत सुरु होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून मिळाली आहे.जिल्ह्याचे एकूण ४ लाख २१ हजार लागवडीखाली क्षेत्र असून, ३६ हजार ७०० एवढे सिंचनाखाली क्षेत्र आहे. तर १० हजार ६१५. ७५ हेक्टरवर फळबागा आहेत. मात्र पाणीच नसल्याने बऱ्याच शेतकºयांनी फळबागा तोडून टाकल्या आहेत. आता दोन वर्षांत जिल्ह्याचे सिंचनाचे क्षेत्र वाढणार आहे. यामध्ये राज्यपालांनी विशेष करुन लक्ष घातल्यामुळे पाणीपातळी वाढविण्यासाठी प्रशासन लक्ष देत आहे. आजघडिला जलसंपदा विभागाच्या वतीने हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण, अंभेरी, हळदवाडी, बोराळा, पिंपळखुटा या पाच तलावांचे काम हाती घेतलेले आहे. यापैकी नवलगव्हाण येथील तलावाचे काम अंतिम टप्यात आल्याने यात जवळपास ४९० हेक्टर शेती ओलीताखाली येणार आहे. तर अंभेरी आणि हळदवाडी येथील तलावाचे काम मावेजामुळे अडले होते. त्याची अजून भूसपांदन प्रक्रिया सुुरु आहे.ती प्रक्रिया पूर्ण होताच शेतकºयांना मावेजा देऊनच तलावाच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. हे दोन तलाव पूर्ण झाल्यास हळदवाडी तलावात १.६८ द.ल.घ.मी तर अंभेरी येथील तलावात १.७७ द. ल. घ. मी पाणी साठवण होऊन ५८६ हेक्टर जमिनीचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे.पिंपळखुटा येथील प्रकल्प चार प्रकल्पापेक्षा मोठा असल्याने यात ११. २० द.ल.घ.मी एवढी पाणी साठवण होणार असून, १ हजार ४४१ हेक्टर सिंचनक्षेत्र वाढणार आहे.या तलावाचे मोजमाप आॅक्टोबरमध्ये करणे प्रस्तावित आहे. तर बोराळा येथील तलावाचे जुलैमध्ये मोजमाप होऊन शेतकºयांना मावेजा मिळाल्यानंतर गतीने कामास प्रारंभ केला जाणार आहे.जलसंपदा विभागाकडे मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध असून, केवळ भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणेच गरजेचे आहे. जिल्ह्याचा सिंचनाचा टक्का वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लक्ष दिल्याने आठ ते दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या प्रकल्पाच्या कामांना गती आली असल्याचे कार्यकारी अभियंता व्ही. एम. मगर यांनी सांगितले.मागील अनेक वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झालेले आहे. पाणीच नसल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतजमिनी पडिक ठेवल्या आहेत. मात्र आता मोठ- मोठे प्रकल्प होणार असल्याने पुन्हा लागवडीखाली क्षेत्र वाढणार आहे. तर पूर्णा नदीवर औंढा तालुक्यात पोटा येथे,वसमत तालुक्यात जोडपिंपरी आणि हिंगोली तालुक्यात पिंपळखुटा येथे उच्चपातळी बंधारे प्रस्तावित आहेत. तेथे जवळपास २७ द.ल.घ.मी. पाणीसाठा होवून ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. संकल्प चित्रसंघटना नाशिक येथे संकल्पनाचे काम सुरु आहे.पोटा बंधाºयाच्या संकल्पनास संघटनेची मंजुरीही मिळालेली आहे. तर इतर दोनचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच सुकळी, डिग्रस कºहाळे येथेही दोन साठवण तलाव होणार आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी