शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

CoronaVirus : हिंगोलीत सोशल डिस्टनसिंगला तिलांजली; वाढत्या गर्दी पुढे प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 6:15 PM

नागरिकांकडून प्रशासनाच्या योजनांचा बोजवारा

ठळक मुद्देभाजीपाला आणि इतर खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा नियोजन करीत असून विविध उपाययोजना करत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या वेळेत भाजीपाला, व फळविक्री तसेच किराणा साहित्य खरेदीसाठी १० एप्रिल रोजी मुभा देण्यात आली होती. परंतु यावेळी सोशल डिस्टन्स पाळले गेले नाही. त्यामुळे नागरिकांनी हम नही सुधरेंगे जणू असा काही संदेश दिल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. लोकांची गर्दी अन् नागरिकांनी सोशल डिस्टन्सला तिलांजली यामुळे मात्र प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात किराणा, भाजीपाला, फळविक्रीसाठी मुभा देण्यात आली होती. यावेळी सोशल डिस्टन्स ठेवूनच खरेदी करावी असा संदेशही जिल्हा प्रशासनाने दिला होता. विशेष म्हणजे हिंगोली शहरातील मुख्य पाच ठिकाणी यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या पाचही ठिकाणी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार न. प. चे मुख्याधिकारी रामदास पाटील आणि हिंगोली शहर ठाण्याचे पोनि अखिल सय्यद यांनी नियोजन करून आखणीही केली होती. तसेच भाजी-फळ विक्रेते, किराणा मेडिकल आदींनी ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, विक्रेत्यांनी स्वत: मास्क, तोंडाला बांधवा अन्यथा दंड ठोठावला जाईल असा कडक इशाराही दिला होता. परंतु अनेक ठिकाणी आदेशाची पायमल्ली होताना दिसून आली.

नागरिकांनी सोशल डिस्टन्स तर पाळले नव्हतेच, शिवाय अनेकांच्या तोंडांना रूमाल किंवा मास्कही दिसून आले नाहीत. त्यामुळे नागरिक कोरोना सारख्या आजाराला गंभीरतेने का घेत नसावे असा प्रश्न निर्माण होत असून प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. १० एप्रिलला जिल्हाभरात ठिकठिकाणी भाजीपाला, किराणा साहित्य खरेदी करण्साठी सर्वत्र गर्दी जमली होती. यावेळी अनेकांनी नियम पाळल्याचेही दिसून आले. परंतु काही नागरिकांनी कुठलीच दक्षता घेतली नव्हती.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचीच पायमल्ली होताना दिसून येत आहे. ही गंभीर बाब असून यामुळे अनेक प्रशासकीय अधिकाºयांनी खंत व्यक्त केली आहे. हिंगोली शहरातील मोकळ्या जागेत पाच ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी आला होता. परंतु यापूर्वीच भाजीविक्रेत्यांना नियमावली घालून देण्यात आली होती. सोशल डिस्टन्सचे नियम प्रत्येकांनीच पाळावे असे आवाहनही करण्यात आले होते.

विशेष म्हणजे भाजीपाला खरेदीसाठी येताना नागरिकांनी कुठलेच वाहन घेऊन येऊ नये, खरेदीसाठी पायीच यावे असे सांगूनही शहरात मात्र वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहने घेऊन येणाºयांवर थेट गुन्हे दाखल केले जातील तसेच वाहन जप्त करून दंड ठोठाण्याचे आदेश होते. परंतु शहरातील पाचही ठिकाणी मात्र ठिकठिकाणी वाहनांची वर्दळ दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली