शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

खरेदीही बंद : बारदान्यासह उद्दिष्ट संपले, तूर उत्पादकांना पैशांची चिंता

By admin | Updated: June 11, 2017 19:12 IST

शेतकरी सलग तीन वर्षापासून नेहमीच विविध संकटाना तोंड देत आहे. यंदा तर मुबलक प्रमाणात तुरीचे उत्पादन होऊनही कधी तूर

ऑनलाइन लोकमत हिंगोली, दि. 11 -  शेतकरी सलग तीन वर्षापासून नेहमीच विविध संकटाना तोंड देत आहे. यंदा तर मुबलक प्रमाणात तुरीचे उत्पादन होऊनही कधी तूर विक्रीची तर कधी तुरीचे पैसे मिळविण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अजूनही २ हजारांवर शेतकऱ्यांना तूर विक्रीचा छदामही मिळाला नाही. तर बारादाना व उद्दिष्टही संपल्याने उर्वरित तुरीचे मातेरे होण्याची भीती कायम आहे. तूर खरेदीबाबत शासन वेगवेगळे आदेश काढत असल्याने, मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र सरकारने दीड लाख टन तूर खरेदीचा आदेश काढला होता. आता तेवढे उद्दिष्टही पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. आता हिंगोलीतील बारदानाही संपल्याने तूर खरेदीला बे्रक लागला आहेत. नवीन शेतकऱ्यांचा निदान माल तरी घरी आहे. मात्र आतार्यंत या केंद्रावर तूर दिल्यावर नाफेड व खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांच्या हाती छदामही दिला नाही. ३० एप्रिल ते ८ मेपर्यंत नाफेडने खरेदी केली होती. या तुरीसह १६ ते २६ मेपर्यंत ६ हजार ८३० क्विंटल ५० किलो आणि २९ मे ते ९ जूनपर्यंत ९ हजार २२६ क्विंटल ५० किलो खरेदी विक्री संघाने तूर घेतली. मात्र या तुरीचे शेतकऱ्यांना अजूनही धनादेश दिलेले नाहीत. त्यातच कृउबाने नोंदणीचा फंडा वापरुन शेतकऱ्यांना शांत केले होते. आता उद्दिष्टही संपल्याने पुढील आदेशाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे. अधून-मधून पाऊस येत असल्याने, खरिपाच्या पेरणीसाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु पैसेच नसल्याने अडचण निर्माण झाली. आजघडीला तूर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ८ कोटी १० लाख ८७ हजार रुपयांची गरज असल्याचे खरेदी विक्री संघाच्या वतीने सांगितले. उसनवारीवर जोर : शेतकऱ्यामध्ये संभ्रम मागील वर्षी खरिपात निर्सगाने शेतकऱ्यांना साथ दिल्यामुळे तुरीचे उत्पादन चांगले झाले. परंतु तूर विकण्यासाठी मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागता. बाहेर भाव नाही अन् हमीभावाच्या ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नाही. विकलेल्या मालाचे पैसे नाहीत. त्यामुळे उसनवारी केल्याशिवाय पर्याय नाही. मध्यंतरी खरेदी विक्री संघाला नाफेड विभागाकडून १ लाख रुपये मिळाले होते. यामध्ये हमाली व इतर खर्चच पूर्ण झाला. मिळालेल्या रक्कमेतून शेतकऱ्यांना पैसेच मिळू न शकल्याने शेतकरी संभ्रामवस्थेत सापडले आहेत. आदेशाकडे लागले लक्षकृउबाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोलाविले जात होते. परंतु उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पुढील आदेश येईपर्यंत तूर खरेदी बंद राहणार असल्याचे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गोेविंद भवर यांनी सांगितले.