शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST

देशभरात मार्च, २०२० पासून कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. या आजारापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला ...

देशभरात मार्च, २०२० पासून कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. या आजारापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातही १ ते ७ मार्चदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली होती. ८ मार्चपासून यात शिथिलता दिली असली तरी शाळा, महाविद्यालये बंद ठेवावेत, असे आदेशात नमूद आहे. दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत. परीक्षा जवळ आल्या, तरी ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे गरजेचे असून, वर्ग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी.आर. हेंबाडे, प्रा.जी.आर. भोयर, सुधाकर मेटकर, पी.पी. सिरसाठ, रतन भोपाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मुख्याध्यापक संघाचेही निवेदन

हिंगोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघानेही दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. निवेदनावर के.डी.महाजन, अ.मन्नान, सुधाकर सूर्यवाड, आब्बास पठाण, ए.एस. मईंग आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.