शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

Earth Day Special : पर्यावरणाची काळजी घेतली तर, पृथ्वीसोबतच आरोग्यही जपण्यास मदत होइल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 3:41 PM

आज संपूर्ण जगभरामध्ये 'जागतिक वसुंधरा दिवस' साजरा करण्यात येत आहे. खरं तर एका दिवसापुरता वसुंधरा दीन साजरा करून काहीही साध्य होणार नाही.

(Image Credit : skipprichard.com)

आज संपूर्ण जगभरामध्ये 'जागतिक वसुंधरा दिवस' साजरा करण्यात येत आहे. खरं तर एका दिवसापुरता वसुंधरा दीन साजरा करून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी प्रत्येक दिवशी आपली जबाबदारी ओळखून वागणं गरजेचं असतं. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखणं, वातावरण प्रदूषणविरहीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणं यांसारख्या गोष्टी आचरणात आणल्यामुळे पर्यावरण उत्तम राखण्यास मदत होते. पण तुम्हाला माहीत आहे का? सध्या मानवाने प्रदूषणाची एवढी हानी केली आहे की, आपण सर्वचजण प्रदुषित वायूमध्ये श्वास घेत आहोत. जे आपल्याला अनेक आजारांच्या विळख्यात अडकविण्यासाठी तयार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, संपूर्ण जगभरामध्ये 102 असे आजार आहेत, ज्यांमध्ये 85 आजार होण्यामागील मुख्य कारण हे प्रदूषण आहे. अशातच पृथ्वीवर शांत आणि हेल्दी जीवन जगण्यासाठी वायू आणि जलप्रदूषणापासून बचाव करण्यासाठी काही उपाय करणं फायदेशीर ठरतं. 

कोण-कोणते आहेत आजार?

मलेरिया, कॅन्सरचे काही प्रकार, पोटासंबंधिच्या समस्या आणि श्वसनाशी संबधित इन्फेक्शन, अस्थमा यांसारखे आजार प्रदूषित वातावरणात राहिल्याने होतात. पर्यावरण विशेषज्ञांनुसार, वातावरणामध्ये पसरणाऱ्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत. जर वाढत्या प्रदूषणावर वेळीच आळा घालण्यात आला नाही तर यामुळे इतरही अनेक परिणामांचा सामना करावा लागू शकतो. 

(Image Credit : NRDC)

जल प्रदूषण अत्यंत घातक 

स्वच्छ पाण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही मानकं तयार केली आहेत. त्यांच्यानुसार, 100 ते 150 स्तर टीडीएस असणारं पाणी स्वच्छ असतं. तुमच्या घरामध्ये जर आरओ (रिवर्स ऑसमोसिस) किंवा यूवी सिस्टिम असेल तर त्या तपासून घ्या. अनेकदा मिनरल वॉटर किंवा सप्लाय करण्यात आलेलं पाणी देखील पूर्णपणे शुद्ध नसतं. यामध्ये शरीराला नुकसान पोहोचवणारे जीवाणू गियार्डिया (Giardia) असतात. अनेकदा कंपन्या पाणी स्वच्छ करण्यासाठी नदी, नाले, तसेच भूमिगत स्त्रोत इत्यांदीमधून पाणी आणतात. हे पाणी स्वच्छ करण्यासाठी कोएगुलेंट (coagulants) केमिकल वापरण्यात येतं. हे केमिकल पाण्यामध्ये असणारे घाण स्वच्छ करतात. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी असतं. 

(Image Credit : NRDC)

वायु प्रदूषणामुळे वाढतात श्वसनाचे विकार

आपल्याला जगण्यासाठी श्वास घेणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु आपण प्रत्येक दिवशी प्रदूषित वातावरणामध्ये श्वास घेत असू तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. यामुळे अनेकांना श्वसानाच्या अनेक विकारांचा सामना करावा लागतो. हवेमध्ये अस्तित्वात असलेलं कार्बन मोनोऑक्साइड एखाद्या विषाप्रमाणे असतं. अशातच आपल्याला हा प्रयत्न करणं गरजेचं असतं की, घरातून बाहेर पडताना चांगल्या गुणवत्तेचा मास्क नक्की वेअर करा. 

कचऱ्याचा ढिगारा

आसपास जमा झालेली घाण आणि कचऱ्यामुळे वातावरण खराब होतं. वर्तमानमध्ये सर्वात जास्त प्रयोग करण्यात येणार प्लास्टिक अत्यंत हानिकारक आहे. अनेक संशोधनांमधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, जर आपल्या आजूबाजूचं वातावरण दूषित असेल तर यामुळे अनेक आजार होतात. गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांवरही या सर्व गोष्टींचा परिणाम होत असतो. 

आहारामुळेही होतो परिणाम

शरीराला स्वस्थ आणि उर्जावान बनायचं असेल तर पौष्टिक आहाराचं सेवन गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही प्रदूषित वातावरणामध्ये पौष्टिक आहाराचं सेवन करत असाल तर यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकंपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :Earthपृथ्वी