शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

भारतात कितपत पसरलाय कोरोनाचा नवा स्ट्रेन? सरकार 'या' मार्गानं माहिती मिळवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 16:33 IST

CoronaVirus News & Latest Updates : याद्वारे कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनवर काम केलं जाईल. टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ चे जिनोम सर्विलांस करणं गरजेचं आहे. 

ब्रिटनमध्ये पसरलेला व्हायरसचा नवीन स्ट्रेन भारतात किती प्रमाणात पसरला आहे.  हे पाहण्यासाठी जीनोम सिक्वेंसिंगचा वापर केला जाऊ शकतो.  कोविड १९ साठी तयार झालेल्या टास्क फोर्सने यासाठी उपाय सुचवला आहे. 'प्रॉस्‍पेक्टिव सर्विलांस' अंतर्गत सर्व राज्यातील पॉझिटिव्ह केसेसमध्ये ५ टक्के जीनोम सीक्वेंसिंगची चाचणी केली जाईल. त्यासाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलअंतर्गत  जीनोम सर्विलांस कंसोर्टीयम INSACOG तयार करण्यात आलं आहे. याद्वारे कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनवर काम केलं जाईल. टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार कोविड१९ चे जिनोम सर्विलांस करणं गरजेचं आहे. 

भारतात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ट्रेसिंग गरजेचं 

कोविड टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार म्यूटेशननंर ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये बदल होणं गरजेचं आहे. या बैठकीमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक आहे. यावर अधिक जोर देण्यात आला होता. त्यासाठी संक्रमित लोकांना ओळखून त्यांना आधी आयसोलेट करायला हवं.  जेणेकरून भारतात इतर ठिकाणी हा व्हायरस पसरणार नाही. सर्विलांसच्या योजनेअंतर्गत २१  ते २३ डिसेंबरच्या मध्ये भारतात आलेल्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार आहे. 

विमानतळावर ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यांनाच बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली. शनिवारी नॅशनल टास्क फोर्सने नवीन स्ट्रेनला  लक्षात घेता कोविडची ट्रीटमेंट आणि प्रोटोकॉल, टेस्टिंग आणि सर्विलांसवर चर्चा केली. या बैठकीचे प्रतिनिधत्व नीती आयोगाचे सदस्य विनोद पॉल आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे प्रमुख बलराम भार्गव यांनी केले होते.

चिंताजनक! कोरोना पुन्हा नवा अवतार घेणार?; AIIMS च्या संचालकांचा सर्तकतेचा इशारा

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यासाठी जिनोमीक निरिक्षण केलं जाणं गरजेचं आहे.  तसंच  सोशल डिस्टेंसिंग, सतत हात धुत राहणं, मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. दरम्यान काल दिवसभरात देशात १८ हजार ७३२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. १ जुलैपासून प्रथमच देशात इतक्या कमी संख्येनं कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १ कोटी १ लाख ८७ हजार ८५० वर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशात २७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १ लाख ४७ हजार ६२२ वर पोहोचली. देशात आतापर्यंत ९७ लाख ६१ हजार ५३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्याच्या घडीला २ लाख ७८ हजार ६९० जणांवर उपचार सुरू आहे.

सावधान! तुम्हीसुद्धा जेवल्यानंतर लगेच पाणी पीता? ही सवय ठरू शकते 'या' ४ समस्यांचं कारण

देशात सर्वाधित कोरोना रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा १९ लाखांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा आकडा ५० हजारांच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात २ हजार ८५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ६० जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली आणि केरळला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. सध्याच्या घडीला देशातील सर्व राज्यांमधील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य