शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 1:13 PM

आरोग्य जपण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्वेळी हेल्दी पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. खासकरून ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यासाठी डाएट फॉलो करत असतील त्यांनी या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक ठरतं.

(Image Credit : Healthfully)

आरोग्य जपण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग्वेळी हेल्दी पदार्थांचं सेवन करणं अत्यंत आवश्यक असतं. खासकरून ज्या व्यक्ती वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा त्यासाठी डाएट फॉलो करत असतील त्यांनी या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक ठरतं. जर तुम्ही कमी वेळात जास्त वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खाण्यासोबतच खाण्याची योग्य वेळही माहीत असणं गरजेचं आहे. परंतु, कामाचं प्रेशर आणि वेळ न मिळाल्यामुळे जास्तीत जास्त लोक लंच म्हणजेच दुपारचं जेवण उशीरा करतात आणि त्यांची हिच सवय त्यांचं वजन वाढवण्यासाठी कारण ठरते. 

दुपारी जेवण करण्याची सर्वात खराब वेळ काय आहे?

अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, दुपारचं जेवण 3 वाजल्यानंतर जेवणाऱ्या लोकांमध्ये वजन कमी होण्याची प्रक्रिया कमी होते. हे संशोधन स्पेनमधील जवळपास 1200 पेक्षा जास्त अधिक वजन असणाऱ्या लोकांवर करण्यात आलं आहे. संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्ती वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत होत्या. संशोधनादरम्यान असं आढळून आलं की, जे लोक 3 वाजल्यानंतर दुपारचं जेवण करतात. त्यांच वजन लगेच कमी होत नाही तर वाढतं. 

या संशोधनातून खासकरून विशेष जेनेटिक असणाऱ्या लोकांना सहभागी करण्यात आले होते. तसेच 2013मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या अहवालामध्ये ही गोष्ट समोर आली होती की, दुपारी 3 वाजल्यानंतर जेवण करणाऱ्या लोकांचं वजन लगेच कमी होत नाही. 

दुपारच्या जेवणाच्या वेळेमुळे काय फरक पडतो?

इंटरनल क्लॉक सर्केडियन रिदम शरीराच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या क्रियेवर नियंत्रण ठेवते. इन्सुलिन हार्मोन्सवरही याचा परिणाम होतो. तसेच जेव्हा शरीरामध्ये इन्सुलिन सेन्सिटिविटी लो होते, त्यावेळी वजन कमी करणं अवघड होतं. 

जेवण जेवण्याची योग्य वेळ काय आहे?

हार्वर्ड यूनिवर्सिटी द्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, कधीही जवल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतात. ज्या व्यक्ती योग्य वेळी जेवत नाहीत, त्यांना वजन कमी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दररोज एका ठरलेल्या वेळी जेवण जेवल्याने शरीराची सर्केडिअन क्लॉक योग्य पद्धतीने काम करते. 

संशोधनामध्ये सांगण्यात आले आहे की, योग्य वेळी जेवल्याने मेटाबॉलिज्म, लठ्ठपणा आणि स्लिप सायकल योग्य पद्धतीने काम करतं. तुम्हीही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर योग्य वेळी सुरुवात करा. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स