शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

पावसाळ्यात या पदार्थांमुळे वाढत वजन, वाढू नये म्हणून फॉलो करा या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 9:30 PM

पावसाचा हंगाम सुरु झाल्यावर गरमा गरम भजी, समोसे, वडे असे तळलेले पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. पावसाळा म्हटलं की या सर्वांचा आस्वाद घेणं आलंच पण तुम्ही याचे किती सेवन कराताय यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे.

पावसाचा हंगाम सुरु झाल्यावर गरमा गरम भजी, समोसे, वडे असे तळलेले पदार्थ खाण्याची आपल्याला इच्छा होते. पावसाळा म्हटलं की या सर्वांचा आस्वाद घेणं आलंच पण तुम्ही याचे किती सेवन कराताय यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही खाच. याचा पुरेपुर आनंद घ्या पण आरोग्याकडे लक्ष देऊन. असे पदार्थ सतत खाल्ल्यामुळे तुमचे वजनही जास्त प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे वेळीच तोंडाला आवर घाला.

सिझनल फळे खापावसाळ्यात अनेक प्रकारची फळे मिळतात. ही तुमच्या फिटनेससाठी अत्यंत महत्वाची असतात. ही फळे अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असतात. याचा वजन कमी करण्यात फायदा होतो. त्यामुळे पावसाळ्यात चिकू, लीची, जांभळ अशी फळं खा. ही फळं खाल्ल्याने तेलकट पदार्थ खाण्याची तल्लफही कमी करतात. तसेच ही पावसाळ्या दरम्यान तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात.

थोडं थोडं खापावसाळ्यात तुमच्या घरी गरमागरम भज्या बनत असतील. तुम्ही त्या नक्की खा पण एकाचवेळेत सर्व संपवू नका. थोडं थोडं खा. यामुळे हे पदार्थ सहज पचतात व भुकही कमी लागते. तसेच तुम्ही हे फक्त आठवड्यातून एकदाच खाण्याचा प्रयत्न करा.

भरपूर पाणी प्यापावसाळा आहे म्हणून तहान कमी लागते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाणी पिणे कमी केले पाहीजे. भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील टॉक्सीन्स बाहेर फेकले जातात. तसेच तुम्हाला भूकही कमी लागते.

हेल्दी सुप प्यापावसाळ्यात तुम्हाला काही गरमागरम खाण्याचे मन करतच असेल तर तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा भाज्यांचे गरमागरम सुप प्या. लक्ष ठेवा की तुम्ही यात मसालेदार पदार्थांचा वापर करत नाही आहात.

कमी साखरेची चहापावसाळ्यात आल्याचा चहा म्हणजे आनंदच. पण वारंवार चहा प्यायची सवय असेल तर त्यात साखर कमी टाका किंवा टाकूच नका. साखरेमुळे तुमचे वजन वाढते. त्यामुळे पावसाळ्याच आल्याचा चहा प्याच पण साखरेपासून दूर राहा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स