शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
3
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
4
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
5
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
6
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
7
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
8
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
9
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
10
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
11
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
12
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
13
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
14
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
15
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
16
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
17
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
18
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
19
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
20
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! लस घेतली म्हणून रिलॅक्स राहणं पडू शकतं महागात; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

By manali.bagul | Updated: February 23, 2021 12:13 IST

CoronaVirus news & latest Updates : मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून कठोर पाऊलं उचलली जाण्याची शक्यता आहे. कारण जानेवारी महिन्यात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर लोक बिंधास्तपणे वापरत आहेत.  लस घेतली म्हणजे आपण कोरोनापासून बचावलो असं अजिबात नाही. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात  कोरोनाचा धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. 

ह्युमन बिहेविअर नियतकालिकेत प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार दाट वस्ती आणि जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका टळणार नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चायनीय युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंगच्या सहकार्याने साऊथॅम्प्टन विद्यापीठाने याबाबत अभ्यास केला आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी चीनमध्ये लसीकरण (Vaccination) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा एकत्रित अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून कमी, मध्यम व उच्च  लोकसंख्येच्या  शहरांवर कोरोनाच्या होणाऱ्या परिणामाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यातून समोर आलेल्या माहितीनुसार जोपर्यंत नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होत नाही तोपर्यंत मध्यम आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये कोरोनाच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाबरोबरच सोशल डिस्टन्सिंग हेदेखील तितकंच महत्वाचं आहे.  कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत जर लसीकरण योग्य पद्धतीनं राबवले  गेले तर सोशल डिस्टेंसिंगची आवश्यकता भासणार नाही.  

मध्यम आणि उच्च घनतेची लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) निर्माण होण्यासाठी लसीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन्ही गोष्टी एकत्रित राबवणं आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचा (Social Distancing) पर्यायावर अल्प कालावधीसाठी कठोरपणे अंमलात आणला तर त्याचे परिणाम मध्यम ते दिर्घ मुदतीपर्यंत दिसून येतील, असे संशोधकांनी स्पष्ट केलं.

२०२११ च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या १.८४ कोटी आहे. याठिकाणी धारावीप्रमाणे अधिक दाटीवाटीच्या भागातही लोकांचं वास्तव्य आहे. तुलनेनं दिल्लीची लोकसंख्या ही 1.9 कोटी असून घनतेनुसार प्रतिचौरस किलोमीटरमध्ये 382 लोक राहतात. त्यामुळे या संशोधनानुसार लसीकरणानंतरही मुंबईवरील कोरोनाचं संकट इतक्यात दूर होणार नाही असं दिसून येत आहे.

दरम्यान राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांचे निदान आणि १८ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे.  राज्यात रविवारी ६,९७१ रुग्ण आणि ३५ बाधितांचा मृत्यू झाला हाेता. त्या तुलनेत साेमवारी नवीन बाधित तसेच मृत्यूंचे प्रमाण काहीसेे कमी झालेे. साेमवारी दिवसभरात ५,०३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; हादरवणारी आकडेवारी आली समोर

तर आतापर्यंत एकूण १९,९९,९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९६ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५७,९३,४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१३.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२४,०५४ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १,८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.४६ टक्के आहे. चिंताजनक! आधीपेक्षा अधिक वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; बचावासाठी CDC नं सांगितला प्रभावी उपाय 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस