शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

झोप उडवत आहे मोबाईल; तरूणपिढी 'टेक्नोफेरेंस'च्या जाळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:22 IST

सध्या प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनचा सर्रास वापर होत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. प्रत्येक कामासाठी हातातल्या मोबाईलचा वापर करण्यात येतो. मोबाईलच्या वापराचे खरं तर अनेक फायदे आहेत पण त्याहीपेक्षा जास्त दुष्परिणामही आहेत.

(Image Credit : MIMS Community)

सध्या प्रत्येक गोष्टीसाठी स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनचा सर्रास वापर होत असल्याचे आपल्याला पहायला मिळते. प्रत्येक कामासाठी हातातल्या मोबाईलचा वापर करण्यात येतो. मोबाईलच्या वापराचे खरं तर अनेक फायदे आहेत पण त्याहीपेक्षा जास्त दुष्परिणामही आहेत. त्यामुळे अनेकदा मोबाईलचा वापर कामापुरताच करण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञांकडून देण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? मोबाईलच्या अतिवापराने शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाइलच्या अतिवापराने आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम होत असेल तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

18 ते 24 वयापर्यंतच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येचं म्हणणं आहे की, त्यांना मोबाइलमुळे सतत थकवा जाणव असतो. एवढचं नव्हे तर यामुळे त्यांच्या कामावरही परिणाम होत असतो. वैज्ञानिकांच्या भाषेत याला 'टेक्नोफेरेंस' असं म्हटलं जातं. टेक्नोफेरेंस म्हणजे अशी स्थिती जेव्हा मोबाईल फोनमुळे आपल्या दिनक्रमावर विपरित परिणाम होत असतात. सध्या लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंत अनेक व्यक्ती टेक्नोफेरेंसच्या शिकार होत आहेत. 

क्वीन्सलँड यूनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलजीने एक संशोधन केलं होतं. हा रिसर्च ऑस्ट्रेलियामधील काही व्यक्तींच्या निरिक्षणातून करण्यात आला. यामागील मुख्य उद्देश म्हणजे, खरचं मोबाईलचा उपयोग करणं हे ऑस्ट्रेलियामध्ये समस्येचं कारण बनत आहे का? या संशोधनानुसार, 24 टक्के महिला आणि 15 टक्के पुरूषांवर मोबाईलचा वापर करण्याचा वाईट परिणाम दिसून येत आहे. एवढचं नाही तर , 18 ते 24 वयोगटातील 40.9 टक्के लोक टेक्नोफोरंसने त्रस्त आहेत. तसेच 25 ते 29 वयोगटातील 23.5 टक्के लोक टेक्नोफेरेंसने त्रस्त आहेत. 

संशोधकांच्या टिमने जवळपास 18 वर्षांपासून ते 83 वर्षांपर्यंतच्या 700 मोबाईल यूजर्सना या संशोधनामध्ये सहभागी करून घेतलं. या सर्वेमध्ये लोकांना विचारण्यात आलं की, खरचं मोबाईल फोनच्या वापराने त्यांची प्रॉडक्टिविटी कमी होत आहे? त्यांना थकवा येतो? यामुळे कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात का? किंवा ड्रायविंग करताना काही समस्यांचा सामना करावा लागतो का? प्रत्येक 5 पैकी एक महिला आणि 8 पैकी एका पुरूषाचं असं म्हणणं आहे की, मोबाईल फोनचा तासन्तास वापर केल्यामुळे त्यांना कमी झोप येते किंवा झोपेच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच संशोधनातून अशा व्यक्तींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

टिप : वरील सर्व गोष्टी एका संशोधनामधून सिद्ध झाल्या असून आम्ही त्या फक्त माहिती म्हणूनच वाचकांपर्यंत पोहोचवत असून यामधून कोणताही दावा करत नाही. 

टॅग्स :MobileमोबाइलHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स