शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करताय? तुम्ही होऊ शकता टाइप 2 डायबिटीजचे शिकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 11:39 AM

शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता.

शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता. कारण रात्रीच्या जेवणातून मिळाणारी ऊर्जा आणि पोषक तत्व सकाळपर्यंत शरीराच्या इतर क्रियांमध्ये खर्च होऊन जातात. ज्यामुळे सकाळी फार भूक लागते. ऑफिसला जाणं असो किंवा शाळेत जाणं, नाहीतर घरातील कामच असली तरिही सकाळच्या धावपळीमुळे आपल्यापैकी अनेकजण सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात. याचा शरीरावर लगेच कोणता प्रभाव दिसून येत नाही परंतु, कालांतराने शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया नाश्त्याकेडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला होणारे नुकसान...

डोकेदुखीने त्रस्त

जर तुम्ही नेहमी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी फार कमी होते. कारण त्यावेळी तुम्ही 8 ते 10 तास काही खात नाही. त्यामुळे डोक्यामध्ये असे काही हार्मोन्सचे उत्सर्जन सुरु होते जे डोकेदुखीसाठी जबाबदार ठरतात. 

टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक

ज्या व्यक्ती नेहमी सकाळच्या नाश्त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा धावपळीमध्ये अर्धवट नाश्ता करून निघून जातात, त्यांना टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो आणि डिप्रेशन, टेन्शन, अस्वस्थपणा यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. ब्लड शुगरची लेव्हल सतत असंतुलित राहिल्यामुळे शरीरातील एनर्जी लेव्हलवरही परिणाम होतो. याचे परिणाम शरीरासाठी घातक ठरू शकतात. 

दिवसभर सुस्ती आणि थकवा

जर तुम्ही सकाळचा नाश्ता अर्धवट सोडून जात असाल तर तुम्हाला सतत थकवा जाणवतो. जरी तुम्ही रात्री भरपेट जेवण केलं असेल तरिही सकाळी पोट नव्याने पोषक तत्वांसाठी तयार असते. नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिवसभरासाठी कमी ऊर्जा मिळते. परिणामी आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. 

स्थुलपणा वाढतो

अनेक लोकांचा हा समज असतो की, कमी जेवल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक लोकं खाण टाळतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का? नाश्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचा स्तुलपणा वाढण्याचीही शक्यता अधिक असते. हे लठ्ठपणापेक्षाही फार गंभीर आहे. कारण लठ्ठपणामध्ये तुमचं पोट आणि चरबी वाढते. परंतु स्थुलपणामध्ये तुमचं शरीर आतून कमजोर होतं. 

रोगप्रतिकारक शक्ती कमी होते

आहार तज्ज्ञांनी सांगितलं की, पोटभर नाश्ता करणं फार गरजेचं असतं. यामुळे शरीरामध्ये पूर्ण दिवस एनर्जी राहते. परंतु नाश्ता न केल्यामुळे एनर्जीसोबतच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते. कारण उपाशी राहिल्यामुळे तुमच्या शरीरातील सेल्स डॅमेज होऊ लागतात. त्यामुळे शरीरावर वायरस, बॅक्टेरिया, फंगल इन्फेक्शन यांसारख्या अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. 

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स