शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

भात आणि चपातीचं एकत्र सेवन आरोग्यास हानिकारक ठरतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:16 AM

भात आणि चपाती  एकत्र खाण्याची पद्धत भारतात फार जुनी आणि जास्त पाळली जाणारी आहे. जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्र खातात.

(Image Credit : Dr Shikha's NutriHealth)

भात आणि चपाती  एकत्र खाण्याची पद्धत भारतात फार जुनी आणि जास्त पाळली जाणारी आहे. जास्तीत जास्त लोक जेव्हाही जेवण करतात तेव्हा भात आणि चपाती एकत्र खातात. पण ज्यावेळी पचन तंत्र कमजोर होऊ लागतं किंवा वजन कमी करण्याचा विषय निघतो, तेव्हा लोकांना या प्रश्नाबाबत जाणून घ्यायचं असतं. डाएट एक्सपर्ट्स सांगतात की, एकत्र भात आणि चपाती खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. चला जाणून घेऊ याबाबत आणखी काही गोष्टी...

भात-चपाती एकत्र का खाऊ नये?

(Image Credit : Reddit)

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, भात-चपाती एकत्र का खाऊ नये? असा प्रश्न विचारला गेल्यावर याचा थेट संबंध कॅलरी काऊंटशी जोडला जातो. कारण जेव्हा भात आणि चपाती एकत्र खाण्यात येते तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात कॅलरी घेत असता. आणि तुम्ही अधिक कॅलरी असलेला आहार घेता तेव्हा पचन तंत्रांवर अधिक जोर पडतो.

(Image Credit : fitnessstay)

भात आणि चपाती एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया कमजोर होते. तसेच शरीरात फॅट जमा होऊ लागतं आणि यानेच पुढे लठ्ठपणाची समस्या होते. तुम्हीही असंच काहीसं करत असाल आणि तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर ही पद्धत वेळीच बंद करा. काही रिसर्चमधूनही ही बाब समोर आली की, भात आणि चपाती जेव्हाही खायची असेल तर दोन्हीपैकी एकच एकावेळी खावं.

रात्रीच्या जेवणात काय असावं?

वजन कमी करणाऱ्यांना पडणार हा आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर फार चिंतेची बाब नाही. कारण याचं उत्तर सोपं आहे. रात्री जेवण हे नेहमी पचायला हलकं असंच करावं. ही बाब तुम्हाला कळाली तर तुम्ही भात आणि चपाती यातील निवड करण्यास मोकळे होऊ शकता.

(Image Credit : Bon Appetit)

डाएट एक्सपर्ट्सही हेच सांगतात की, भाताच्या तुलनेत चपती पचायला हलकी आहे. जर तुम्ही रात्री चपाती खात असाल तर ती सहज पचते. पण जर रात्री तुम्ही भात खात असाल तर तुम्हाला चांगली झोप येणार नाही. चांगली झोप न येणे आणि पचनक्रिया विस्कळीत होणे, यामुळे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो.

रात्री भात का खाऊ नये?

भात खाल्ल्याने अनेकांचं पोट फुगतं. Water retention ची समस्या असलेल्या लोकांनी तर अजिबात भात खाऊ नये असे सांगितले जाते. कारण भात खाल्ल्याने त्यांना अधिक समस्या होऊ शकते. तसेच त्यांना भात पचण्यासही अधिक वेळ लागतो. 

(Image Credit : Nutree)

अनेकांना भाताची अ‍ॅलर्जी असते. डायबिटीसच्या रूग्णांनी भात खाऊ नये असे सांगितले जाते. तसेच अस्थमा असलेल्या लोकांनी सुद्धा भात खाऊ नये. याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्न