शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Covid-19, Oxygen: 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने मोबदला द्यावा'; समितीच्या अहवालात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 17:22 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतच्या अहवालानंतर संसदीय समितीची केंद्राकडे मागणी

Covid-19: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला देण्याची मागणी संसदीय समितीने केंद्राकडे केली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विषयक संसदीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह राज्यांना ऑक्सिजनमुळे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करण्याची आणि मृतांच्या पीडित कुटुंबांना योग्य नुकसानभरपाई देण्याची शिफारस केली आहे.

ऑक्सिजनची कमतरता, लस विकसित करणे आणि साथीच्या आजाराबाबत केलेले व्यवस्थापन अशा विविध पैलूंचे विश्लेषण करून समितीने नुकताच आपला अहवाल सादर केला. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत प्रतिबंधात्मक उपाय गांभीर्याने आणि वेळीच अंमलात आणले असते, तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की जर सरकारने महामारीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर हा विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याचे ओळखले असते आणि ते रोखण्यासाठी योग्य धोरणे अंमलात आणली असती तर त्याचे परिणाम कमी गंभीर झाले असते आणि अनेकांचे जीव वाचले असते.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणारे मृत्यू शोधण्यासाठी कोणतीही निश्चित मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, असे अहवालात म्हटले आहे. समितीने नमूद केले की वैद्यकीय नोंदींमध्ये मृत्यूचे कारण म्हणून ऑक्सिजनची कमतरता नमूद केलेले नाही. समितीने सांगितले की केंद्र सरकारने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या नोंदींसाठी राज्यांना विनंती केली, त्यास २० राज्यांनी प्रतिसाद दिला, परंतु त्यापैकी कोणीही याची पुष्टी केली नाही. समितीने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समतोल व व्यवस्थापित करण्यात सरकार पूर्णपणे यशस्वी झाले नाही. त्या काळात त्याची मागणी वाढतच गेली, ज्यामुळे अभूतपूर्व वैद्यकीय संकट निर्माण झाले.

जगातील कोविड-19 मुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचे समितीला आढळून आले. मोठ्या लोकसंख्येमुळे देशात महामारीच्या काळात मोठे आव्हान होते. कमिटीने नमूद केले की, खराब आरोग्य पायाभूत सुविधा आणि अपुर्‍या आरोग्य कर्मचार्‍यांमुळे देशात प्रचंड दिसून आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसDeathमृत्यूOxygen Cylinderऑक्सिजन