- डॉ. दीपक कुलकर्णी(लेखक त्वचारोगतज्ज्ञ आहेत.)
लहान मुलांची त्वचा प्रौढांपेक्षा पातळ व नाजूक असते, तसेच त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असल्यामुळे लहान-मोठ्या रोगांना ते बळी पडण्याची शक्यता फार मोठी असते. दुर्दैवाने त्वचेच्या योग्य निगेबद्दल पुरेशी शास्त्रशुद्ध माहिती समाजात प्रचलित नसल्याने अनेक अडचणी येतात. ही माहिती कळावी यासाठी हा लेखप्रपंच.त्वचेची स्वच्छता : साबणाचे काम त्वचेतील अनावश्यक तेलकटपणा काढून टाकणे व रोगजंतूंना आटोक्यात ठेवणे होय. कोणत्याही सर्वसाधारण साबणामुळे बहुतांशी रोगजंतू नाहीसे होतात व तेलकटपणा कमी होतो. त्वचेवरील सर्वच जंतूंना मारून टाकण्याची व त्वचा पूर्णपणे 'निजंर्तुक' करण्याची मुळात काहीच आवश्यकता नसते. बरेच जंतू त्वचेवर नैसर्गिकरीत्या निवास करतात व ते निरुपद्रवी असतात. त्यामुळे दिवसातून एकदा सर्वसाधारण साबणाने अंघोळ घालणे पुरेसे आहे. त्यामुळे डॉक्टरांनी खास सल्ला दिला असल्याशिवाय, उगाचच जाहिराती पाहून, नियमित वापरासाठी कोणताही औषधी साबण वापरणे गैर आहे. उलटपक्षी अशा औषधी साबणामुळे त्वचेच्या कोरडेपणात वाढ होऊ शकते व त्वचेची उन्हाला तोंड देण्याची क्षमताही कमी होऊ शकते. ज्या बालकांना वारंवार त्वचेवर जंतुसंसर्ग होत असेल तेवढ्यांनाच डॉक्टरांच्या सल्ल्याने जंतुनाशक साबण अथवा असे द्रव्य वापरावे.थंडीमध्ये, कोरड्या कातडीसाठी असलेले साबण आपण बाळांना वापरू शकतो. अशा साबणांमध्ये स्निग्धता जास्त असते व त्यामुळे त्वचेला दाह होत नाही. हल्ली २८ल्लीि३ ुं१२ नावाच्या अल्कलीविरहित वड्या मिळतात. या महाग असल्या तरी तीव्र कोरडेपणावर फार उपयुक्त ठरतात. लहान मुलांना बऱ्याच वेळा डाळीच्या पिठाने अंघोळ घातली जाते. पिठामुळे तेलकटपणा जरी कमी होत असला तरी त्यातील जाडसर कणांमुळे त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. तीव्र कोरडेपणावर स्वस्तातील उपाय म्हणजे साबण न वापरता फक्त पाण्याने अथवा दुधाने मालीश करून स्नान घालणे. पीठ वापरावयाचे असेलच तर ते वस्त्रगाळ असावे व दुधात मिसळून वापरावे. पिठाच्या वापरामुळे लव फक्त तात्पुरती जाते, कायमची नाही, हे ठाऊक असले पाहिजे. अंघोळीनंतर कातडीच्या घडीमध्ये (जांघ/काख/मान) साबणाचा अंश अथवा ओलसरपणा राहू देऊ नये. अन्यथा त्या ठिकाणी चोळण अथवा डायपर रॅश असे विकार होऊ शकतात. ओलसरपणा पुसताना मऊ टॉवेलने अंग टिपून घ्यावे. कातडीवर पडणाºया घड्या नीट उघडून ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी. पावडरमुळे त्वचा सुकी राहण्यास मदत होते. त्यामुळे कातडीच्या घड्यांमध्ये साधी पावडर टाकायला हरकत नाही. पावडर टाकण्यापूर्वी त्वचा पूर्ण कोरडी करून घ्यावी. शक्यतो स्टार्चविरहित पावडरच वापराव्यात. कारण त्यांच्यामुळे क्वचित बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. बाळाची नखे फार वेगाने वाढतात. ती वेळोवेळी कापावीत. डोक्याला सौम्य शाम्पू वापरावा. साबणही वापरला तरी चालेल. अंघोळीनंतर केसाला तेल लावण्यास काही हरकत नाही.