शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

पायांची दुर्गंधी येण्याचं मुख्य कारण आणि समस्या दूर करण्याचे योग्य उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:16 IST

काही लोक जसेही पायातून शूज काढतात त्यांच्या आजूबाजूला बसलेले लोक तिथून कलटी मारतात किंवा त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघतात.

(Image Credit : wonderopolis.org)

काही लोक जसेही पायातून शूज काढतात त्यांच्या आजूबाजूला बसलेले लोक तिथून कलटी मारतात किंवा त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघतात. याचं कारण असंत पायांची दुर्गंधी येणे. ज्या लोकांना ही समस्या होते त्यांना अनेकदा चारचौघात लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. अनेकांना हे लक्षात येत नाही की, खूप उपाय करूनही पायांची दुर्गंधी का येते? आज याच समस्येबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय असतं कारण?

(Image Credit : health.clevelandclinic.org)

पायांची दुर्गंधी येण्याचं मुख्य कारण असतं ओलावा येणे. घाम येतो हे सर्वांनाच माहीत असतं, पण त्यासोबत एक वेगळाच ओलावा येता. हा ओलावा आणि घाम यात फरक असतो. घाम आपल्याला शरीरावर तिथे येतो जिथे त्वचेवर रोमछिद्रे असतात किंवा केस असतात. पण एक खासप्रकारचा ओलावा तळहात आणि तळपायांवर येतो. या त्वचेवर रोमछिद्रे किंवा केस नसतात.

घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. घाम हा रोमछिद्रांमधून येतो. ही नैसर्गिक प्रक्रिया आरोग्यासाठी चांगली असते. गरम वातावरणात घाम येणे किंवा एक्सरसाइज करताना घाम येणे सामान्य बाब आहे.

धोक्याची घंटा

(Image Credit : talkspace.com)

तळपाय किंवा तळहातांवर खासप्रकारचा ओलावा येण्याची समस्या त्या लोकांना अधिक होते जे फार चिंता करणारे असतात. तज्ज्ञ सांगतात की, तळपायाला किंवा तळहाताला ओलावा येणं अनेकदा याकडे इशारा करतात की, तुम्ही एखाद्या मानसिक दबावात आहात.

मेंटल हेल्थ

जर फार काळापासून तुम्हाला एखादं टेन्शन असेल किंवा स्ट्रेस असेल तर याचे आपल्या शरीरावर नकारात्मक प्रभाव दिसून येतात. त्यामुळे वेळीच टेन्शन आणि स्ट्रेस करण्याचा प्रयत्न करा. पाय आणि तळहातावर येणारा ओलावा मेंटल हेल्थबाबत याप्रकारचा संदेश देण्याचं काम करतो.

कुणाला होते समस्या?

(Image Credit : drweil.com)

आयुर्वेदानुसार, पाय आणि तळहातांवर ओलावा येण्याची समस्या जास्तीत जास्त चिंता करणाऱ्या लोकांमध्ये बघायला मिळते. हे लोक विचार अधिक करतात, पण जेवढा विचार तेवढा ते परफॉर्म करू शकत नाहीत. तसेच त्यांच्या डोक्यात सतत काहीना काही विचार सुरूच असतात.

कशी होते क्रिया

(Image Credit : toolsofmen.com)

सतत विचारात गुंतून राहिल्याने हे लोक अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकत नाही. त्यामुळे त्यांना इच्छेनुसार रिझल्ट मिळू शकत नाही. त्यामुळे ते अधिक तणावात येतात. या स्थितीत त्यांच्या तळपाय आणि तळहातांवर ओलावा येण्याची समस्या वाढते. कारण पाय अनेकदा शूजमध्ये बंद राहत असल्याने पायांची दुर्गंधी येते.

कशी कराल समस्या दूर?

-  ही समस्या दूर करण्यासाठी सर्वातआधी टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. आपली कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यावर भर द्या. जेणेकरून तुमच्या मेंदूवर भार कमी पडेल आणि तुम्हाला हलकं व आनंदी वाटेल.

- एक्सरसाइज आणि वॉक सुरू करा. याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मेंदूमध्ये योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतं. याने तणाव कमी होण्यास मदत मिळते.

- जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. फळं आणि भाज्यांचं अधिक सेवन करा. एक्सरसाइज केल्याने मेंदूत हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. याने तणाव कमी होतो आणि मूड चांगला राहतो. 

-  जर हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज करूनही तुमची पायांची दुर्गंधी दूर होत नसेल तर अशा स्थितीत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य