शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

खाल्ल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर सावधान,'या' गंभीर आजारांना पडू शकता बळी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 10:57 AM

जेवत असताना किंवा जेवण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा पाण्याचं सेवन करत असतो.

जेवत असताना किंवा जेवण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा पाण्याचं सेवन करत असतो. असे फार कमी लोकं असतात त्यांना खाण्याच्या दरम्यान कधी पाणी प्यायचं आणि कधी पाणी नाही प्यायचं हे माहीत असतं. जेवणानंतर पाण्याचे सेवन करतं असताना ते कधी करायचं हे माहित नसल्यामुळे  नकळतपणे पोटाच्या विकारांना सामोरं जावं लागतं. त्यासाठी काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घ्या पाणी अयोग्य वेळी प्यायल्याने कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात.

(image credit- mordern ghana)

आयुर्वेदानुसार आपण जे काही खात असतो ते अन्न नाभीच्या विरूद्ध बाजूला जठराग्नीमध्ये पचत असतो. तसंच हा जठर अग्नी जेवल्यानंतर एक तास सक्रीय राहत असतो. त्यामुळे  भूक लागल्यानंतर लगेच जेवल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्यास जठराग्नी हा शांत होत असतो. त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो. म्हणून असं म्हणतात की जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं नसतं. 

जेवणात समावेश असलेले व्हिटामीन्स आणि इतर पोषक तत्व शरीरात शोषून घेण्यासाठी  थोडावेळ देणं गरजेचं  असतं. तसंच जर खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने  आपल्या पचनक्रीयेवर त्याचा परीणाम होत असतो. त्यामुळे काही खाल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिणं टाळायला हवं. 

न्यूट्रिशनिस्टच्यामते  जेवण केल्यानंतर ते पचण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत  असतो. त्यानंतर खाल्लेलं अन्न मलाच्या स्वरूपात तयार होत असतं. या दरम्यान पाणी  जेवल्यानंतर लगेचच प्यायल्यास खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. तसंच खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे अपचन, गॅस, एसिडीटी  अशा पोटाच्या समस्या उद्भवतात. तापमान प्रभावित होऊन आजारी पडण्याची शक्यता असते. 

(image credit-east coast daily english)

जर तुम्ही खाल्ल्यानंतर लगेचचं पाण्याचं सेवन करत असाल तर अन्न मोठ्या प्रमाणात पोटात पडून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण वाढून मधूमेह होण्याची शक्यता असते. तसंच रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. जर तुम्ही गोड खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पित असाल तर ही गोष्ट शरीरासाठी घातक ठरू शकते. कारण त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी वाढण्याचा धोका उद्भवू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स